शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर इंजेक्शन संजीवनी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST

कोपरगाव (अहमदनगर) : गेल्या काही दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची मोठी मागणी वाढली आहे. पुढील दोन - तीन दिवसांत ...

कोपरगाव (अहमदनगर) : गेल्या काही दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची मोठी मागणी वाढली आहे. पुढील दोन - तीन दिवसांत या इंजेक्शनचा तुटवडा कमी होईल. रेमडेसिविर इंजेक्शन हे संजीवनी नाही. त्याच्या वापरातून फक्त फुफ्फुसातील इन्फेक्शन कमी होते. एचआरसीटीचा स्कोर वाढला की, डॉक्टर लगेच रेमडेसिविर लिहून देतात. त्यामुळे नातेवाईक सैरभैर होतात. त्यामुळे गरज असलेल्या रुग्णासाठीच रेमडेसिविरचा वापर करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

कोपरगाव शहरात आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शनिवारी ( दि. १७ ) सकाळी आले होते. यावेळी त्यांनी कोविड सेंटरला भेटी दिल्या. तसेच कृष्णाई मंगल कार्यालयातील बैठकीत आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, कोरोनासाठी आमदारांना १ कोटींचा निधी दिला आहे. त्यातून त्यांनी सिटीस्कॅन मशीन उपलब्ध करून द्यावे. कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर त्यासाठी बाधित रुग्णांची संख्या कमी करणे महत्त्वाचेे आहे. शिर्डी संस्थानची दोन हॉस्पिटल मिळून सुमारे ४५० बेड्चे कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच ते सहा तालुक्यातील नागरिकांना तेथे उपचार घेता येईल. गेल्यावर्षीप्रमाणे गावागावात स्थापन केलेल्या ग्रामसमितीच्या, शहरातील प्रभाग समित्या काम करताना दिसत नाहीत. त्यांनी काम करण्याची गरज आहे. त्यामुळेदेखील कोरोनावर नियंत्रण मिळू शकते.

.......

पालकमंत्र्यांनी नगराध्यक्ष वहाडणेंची री पकडली....

नगराध्यक्ष विजय वहाडणे आपल्या भाषणात म्हणाले, हे संकट सर्वांच्याच दारावर येऊन थांबले आले आहे. त्यामुळे याचे राजकारण न करता एकत्र येत काम करण्याची वेळ आहे. त्यामुळे कुणीही एकामेकांवर टीका टिपण्णी करायची नाही, असे म्हटले. त्यानंतर पालकमंत्री यांनी आपल्या भाषणात वहाडणे यांच्या वक्तव्याची री ओढून ही वेळ राजकारण करण्याची नसून सोबत काम करण्याची आहे, असे म्हटले.

........

शिवसैनिकांची नाराजी...

कृष्णाई मंगल कार्यालयात बैठक झाली. पण ज्येष्ठ शिवसैनिकांना माहीत देखील नाही. म्हणायला सरकार आमचे आहे. पण शिवसैनिकांना काडीचा उपयोग नाही. या अगोदर युती सरकार होते. कोपरगाव भाजपने पूरेपूर फायदा करून घेतला आणि आता आघाडी सरकारचा फायदा राष्ट्रवादी घेत आहे. सरकार कोणाचेही असो अधिकाऱ्यांना फक्त काळे-कोल्हेच माहीत आहेत. आम्हा शिवसैनिकांना कोणतेही निमंत्रण दिले जात नाही. तालुक्यात पक्ष जिवंत ठेवण्यात बऱ्याच शिवसैनिकांचे योगदान आहे. पण त्याचा विसर सर्वांना पडला आहे. या संदर्भात मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इमेल केला असून लॉकडाऊन उठल्यानंतर भेट घेऊन विषय त्यांच्या कानावर घालणार असल्याचे म्हणत शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.

............

१७हसन मुश्रीफ