शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

रेमडेसिविर इंजेक्शन संजीवनी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST

कोपरगाव (अहमदनगर) : गेल्या काही दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची मोठी मागणी वाढली आहे. पुढील दोन - तीन दिवसांत ...

कोपरगाव (अहमदनगर) : गेल्या काही दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची मोठी मागणी वाढली आहे. पुढील दोन - तीन दिवसांत या इंजेक्शनचा तुटवडा कमी होईल. रेमडेसिविर इंजेक्शन हे संजीवनी नाही. त्याच्या वापरातून फक्त फुफ्फुसातील इन्फेक्शन कमी होते. एचआरसीटीचा स्कोर वाढला की, डॉक्टर लगेच रेमडेसिविर लिहून देतात. त्यामुळे नातेवाईक सैरभैर होतात. त्यामुळे गरज असलेल्या रुग्णासाठीच रेमडेसिविरचा वापर करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

कोपरगाव शहरात आढावा घेण्यासाठी पालकमंत्री शनिवारी ( दि. १७ ) सकाळी आले होते. यावेळी त्यांनी कोविड सेंटरला भेटी दिल्या. तसेच कृष्णाई मंगल कार्यालयातील बैठकीत आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, कोरोनासाठी आमदारांना १ कोटींचा निधी दिला आहे. त्यातून त्यांनी सिटीस्कॅन मशीन उपलब्ध करून द्यावे. कोरोनावर नियंत्रण मिळवायचे असेल तर त्यासाठी बाधित रुग्णांची संख्या कमी करणे महत्त्वाचेे आहे. शिर्डी संस्थानची दोन हॉस्पिटल मिळून सुमारे ४५० बेड्चे कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच ते सहा तालुक्यातील नागरिकांना तेथे उपचार घेता येईल. गेल्यावर्षीप्रमाणे गावागावात स्थापन केलेल्या ग्रामसमितीच्या, शहरातील प्रभाग समित्या काम करताना दिसत नाहीत. त्यांनी काम करण्याची गरज आहे. त्यामुळेदेखील कोरोनावर नियंत्रण मिळू शकते.

.......

पालकमंत्र्यांनी नगराध्यक्ष वहाडणेंची री पकडली....

नगराध्यक्ष विजय वहाडणे आपल्या भाषणात म्हणाले, हे संकट सर्वांच्याच दारावर येऊन थांबले आले आहे. त्यामुळे याचे राजकारण न करता एकत्र येत काम करण्याची वेळ आहे. त्यामुळे कुणीही एकामेकांवर टीका टिपण्णी करायची नाही, असे म्हटले. त्यानंतर पालकमंत्री यांनी आपल्या भाषणात वहाडणे यांच्या वक्तव्याची री ओढून ही वेळ राजकारण करण्याची नसून सोबत काम करण्याची आहे, असे म्हटले.

........

शिवसैनिकांची नाराजी...

कृष्णाई मंगल कार्यालयात बैठक झाली. पण ज्येष्ठ शिवसैनिकांना माहीत देखील नाही. म्हणायला सरकार आमचे आहे. पण शिवसैनिकांना काडीचा उपयोग नाही. या अगोदर युती सरकार होते. कोपरगाव भाजपने पूरेपूर फायदा करून घेतला आणि आता आघाडी सरकारचा फायदा राष्ट्रवादी घेत आहे. सरकार कोणाचेही असो अधिकाऱ्यांना फक्त काळे-कोल्हेच माहीत आहेत. आम्हा शिवसैनिकांना कोणतेही निमंत्रण दिले जात नाही. तालुक्यात पक्ष जिवंत ठेवण्यात बऱ्याच शिवसैनिकांचे योगदान आहे. पण त्याचा विसर सर्वांना पडला आहे. या संदर्भात मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इमेल केला असून लॉकडाऊन उठल्यानंतर भेट घेऊन विषय त्यांच्या कानावर घालणार असल्याचे म्हणत शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.

............

१७हसन मुश्रीफ