शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

गोदावरी कालव्यांना तातडीने आवर्तन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:19 IST

मागच्या महिन्यात केलेले रब्बीचे आवर्तन लेट झाले होते. गहू, हरभरा, मका काढणीला आले असताना हे आवर्तन सुटले. पिके काढणीला ...

मागच्या महिन्यात केलेले रब्बीचे आवर्तन लेट झाले होते. गहू, हरभरा, मका काढणीला आले असताना हे आवर्तन सुटले. पिके काढणीला आली असताना काही शेतकऱ्यांनी पाणी घेतले नाही. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे उन्हाळी आवर्तन लवकर मिळेल, अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना होती. मात्र, एप्रिल सुरू झाला तरीदेखील अजून पाटबंधारे विभागाने याबाबत गोदावरी कालव्यांना पाणी देण्याची तारीख निश्चित केली नाही. तेव्हा गोदावरी कालव्यांना पाणी कधी मिळेल, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या शेतकऱ्यांचा ऊस, जनावरांचा चारा व भाजीपाला आदी पिके शेतात उभी आहेत. पूर्वी गोदावरी कालव्यांना पाणी सुटल्यानंतर लाभक्षेत्रातील चाऱ्या पूर्ण क्षमतेने वाहिल्या जायच्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील चाऱ्या सुटेल की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे.

पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना ७ नंबर फाॅर्म भरण्यासाठी आवाहन केले होते. त्याप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांनी सात नंबर फाॅर्मदेखील भरलेले आहेत. आता मात्र शेतकऱ्यांना फक्त गोदावरी कालवे कधी सुटतील हीच अपेक्षा‌ आहे. पूर्वी जेऊर कुंभारी, चांदेकसारे, डाऊच खुर्द, कोकमठाण आदी मोठ्या परिसरात हरिसन ब्रँच ह्या चारीची मिनी कालवा म्हणून ओळख होती. गोदावरी कालवा सुटल्यानंतर टेलपर्यंत पाणी गेल्यानंतर लगेच हरिसन ब्रँच चारी सुटली जायची. मात्र, आता पाटबंधाऱ्याच्या नियोजनामुळे परिसरातील ही मिनी कालवा चारीदेखील काही काळच वाहिली जाते.

.............

पिकांची वाढ खुंटली

परिसरात पाणी पातळीत होणारी वाढ खुंटली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. आता मात्र शेतकऱ्यांना गोदावरी कालव्यांच्या आवर्तनातून आतून पाणी मिळाले तरच शेतकऱ्यांची पिके वाचतील, अन्यथा पिके हातातून जातील आणि शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक टंचाईला सामोरे जावे. तेव्हा गोदावरी पाटबंधारे विभागाने तातडीने गोदावरी कालव्यांना उन्हाळी आवर्तन सोडावे, अशी मागणी वक्ते यांनी केली आहे.