शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

गोदावरी कालव्यांना तातडीने आवर्तन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:19 IST

मागच्या महिन्यात केलेले रब्बीचे आवर्तन लेट झाले होते. गहू, हरभरा, मका काढणीला आले असताना हे आवर्तन सुटले. पिके काढणीला ...

मागच्या महिन्यात केलेले रब्बीचे आवर्तन लेट झाले होते. गहू, हरभरा, मका काढणीला आले असताना हे आवर्तन सुटले. पिके काढणीला आली असताना काही शेतकऱ्यांनी पाणी घेतले नाही. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे उन्हाळी आवर्तन लवकर मिळेल, अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांना होती. मात्र, एप्रिल सुरू झाला तरीदेखील अजून पाटबंधारे विभागाने याबाबत गोदावरी कालव्यांना पाणी देण्याची तारीख निश्चित केली नाही. तेव्हा गोदावरी कालव्यांना पाणी कधी मिळेल, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सध्या शेतकऱ्यांचा ऊस, जनावरांचा चारा व भाजीपाला आदी पिके शेतात उभी आहेत. पूर्वी गोदावरी कालव्यांना पाणी सुटल्यानंतर लाभक्षेत्रातील चाऱ्या पूर्ण क्षमतेने वाहिल्या जायच्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील चाऱ्या सुटेल की नाही, अशी भीती निर्माण झाली आहे.

पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना ७ नंबर फाॅर्म भरण्यासाठी आवाहन केले होते. त्याप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांनी सात नंबर फाॅर्मदेखील भरलेले आहेत. आता मात्र शेतकऱ्यांना फक्त गोदावरी कालवे कधी सुटतील हीच अपेक्षा‌ आहे. पूर्वी जेऊर कुंभारी, चांदेकसारे, डाऊच खुर्द, कोकमठाण आदी मोठ्या परिसरात हरिसन ब्रँच ह्या चारीची मिनी कालवा म्हणून ओळख होती. गोदावरी कालवा सुटल्यानंतर टेलपर्यंत पाणी गेल्यानंतर लगेच हरिसन ब्रँच चारी सुटली जायची. मात्र, आता पाटबंधाऱ्याच्या नियोजनामुळे परिसरातील ही मिनी कालवा चारीदेखील काही काळच वाहिली जाते.

.............

पिकांची वाढ खुंटली

परिसरात पाणी पातळीत होणारी वाढ खुंटली आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. आता मात्र शेतकऱ्यांना गोदावरी कालव्यांच्या आवर्तनातून आतून पाणी मिळाले तरच शेतकऱ्यांची पिके वाचतील, अन्यथा पिके हातातून जातील आणि शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक टंचाईला सामोरे जावे. तेव्हा गोदावरी पाटबंधारे विभागाने तातडीने गोदावरी कालव्यांना उन्हाळी आवर्तन सोडावे, अशी मागणी वक्ते यांनी केली आहे.