शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

कोपरगावात पालिका कर्मचा-यांना रजेचा संसर्ग: प्रशासकीय कामाचा बट्ट्याबोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 19:31 IST

नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी सतत आजारपणाच्या रजेवर जात असल्याने प्रशासकीय कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे विकास कामे ठप्प होऊन नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

रियाज सय्यदकोपरगाव : नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी सतत आजारपणाच्या रजेवर जात असल्याने प्रशासकीय कामाचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे विकास कामे ठप्प होऊन नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. रजेवर जाणा-या अधिकारी व कर्मचा-यांना असा कोणता आजार जडला? हा मात्र संशोधनाचा विषय आहे.पालिकेत आधीच मनुष्यबळाची वाणवा आहे. शहराचा विस्तार बघता पालिकेला आणखी सक्षम अधिकारी व कर्मचा-यांची आवश्यकता आहे. पाणी पुरवठा विभागाचे सहायक अभियंता प्रवीण लोखंडे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने ३ महिन्यांपासून हे पद रिक्त आहे. पाणी पुरवठ्याचे पर्यवेक्षक विश्वास धुमाळ दीड-दोन महिन्यांपासून आजारपणाच्या रजेवर आहेत. कनिष्ठ अभियंता श्रीकांत बगाड देखील महिनाभरापासून रजेवर गेल्याने रामभरोसे कारभार सुरू आहे. बांधकाम अभियंता विजय पाटील यांच्याकडे पाणी पुरवठ्याचा तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे. आधीच त्यांच्यावर बांधकामसह अतिक्रमण विरोधी पथक प्रमुखाची जबाबदारी आहे. सरकारी कामानिमित्त पाटील यांना बाहेरगावी जावे लागते. बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता एस.एम.ताजवे दीड महिन्यींपासून रजा टाकून गेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ कनिष्ठ अभियंता श्रीकांत साठे हे देखील महिन्यापासून रजेवर आहेत. आरोग्य निरीक्षक पी.एम. चव्हाण यांची अचानक टपाल विभागात बदली केल्याने कोपरगावकरांचे आरोग्य वा-यावर आहे.

तोकडा कर्मचारी वर्ग

नगरपालिकेत मुख्याधिकारी, सहायक कार्यालयीन पर्यवेक्षक, सहायक लेखापाल, बांधकाम नगर अभियंता, पाणी पुरवठा उपअभियंता, सहायक कर निरीक्षक, कनिष्ठ पर्यवेक्षक, ग्रंथपाल, कनिष्ठ विद्युत पर्यवेक्षक, सहायक खरेदी पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, मार्केट लिपिक, आस्थापना लिपिक, सभा लिपिक, दप्तर लिपिक, आवक-जावक लिपिक, ग्रंथालय लिपिक, कनिष्ठ प्रोग्रामर, संगणक चालक, न्यायालय लिपिक, २ वैद्यकीय अधिकारी, राज्य उपजिवीका अभियान लिपिक असा तोकडा स्टाफ आहे.

प्रशासन चालविण्याची जबाबदारी मुख्याधिका-यांवर आहे. नवीन अभियंत्यांना तात्पुरत्या नियुत्या देण्याचा अधिकार त्यांना आहे. पण, कुठलीही गोष्ट गांभीर्याने घेतली जात नाही. ही त्यांची बेफिकिरी आहे. प्रशासनाच्या गलथानपणामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. पालिकेविषयी तक्रारी वाढून लोकप्रतिनिधी बदनाम होत आहेत. ठेकेदाराची बिले अदा न केल्याने पाणी पुरवठा जलवाहिनीचे ‘लिकेज’ निघत नाहीत. आरोग्य निरीक्षक पी.एम.चव्हाण यांची बदली केल्याचे मला माहीत सुध्दा केले नाही. मुख्याधिका-यांच्या मनमानीला अधिकारी व कर्मचारी कंटाळले आहेत.-विजय वहाडणे, नगराध्यक्ष

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव