शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

सोयाबीन बियाणांचा तुटवडा कमी करा

By admin | Updated: May 25, 2014 00:31 IST

खरीप हंगाम : राधाकृष्ण विखे यांचे अधिकार्‍यांना निर्देश

बाभळेश्वर : शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणांची उपलब्धता करून देण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्या सहकार्याने आणि खासगी कंपन्यांकडून शेतकर्‍यांकडून बीजप्रक्रिया केलेले बियाणे उपलब्ध करून सोयाबीन बियाणांचा तुटवडा कमी करण्यासाठी कृषी अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली़ अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ बैठकीनंतर मंत्री विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल भंडारी, उपायुक्त रवींद्र ठाकरे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ रवीप्रकाश दाणी, आत्माचे संचालक एम़ व्ही़ देशमुख, विभागीय कृषी संचालक अशोक लोखंडे यांच्यासही कृषी विभागातील अधिकारी आणि बियाणे कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते़ यावेळी मंत्री विखे म्हणाले की, खरीप हंगामातील इतर पिकांच्या लागवडीबरोबरच सोयाबीनचे पीक घेण्यासाठी शेतकर्‍यांचा कल दिसून येतो़ सोयाबीनच्या बियाणांसाठी शेतकर्‍यांची असलेली मागणी आणि बियाणांचा असलेला तुटवडा लक्षात घेऊन, जिल्हा आणि तालुकास्तरावर सोयाबीन बियाणांची उपलब्धता करण्यासाठी कृषी विभागाणे नियोजन केले आहे़ जिल्हा आणि तालुका स्तरावर सर्व कृषी अधिकार्‍यांना गावा-गावात जावून शेतकरी आणि शेतकरी गटाशी चर्चा करून नियोजन करून सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले़ (वार्ताहर)राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बियाणांचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात मागणी प्रमाणे खतांची उपलब्धता करून देण्यात येईल़ बियाणे आणि खत विक्रेत्यांना उपलब्ध असलेला साठा, झालेली विक्री याबाबतची आकडेवारी दर्शनीभागात फलकावर लावण्याबाबत सूचना मंत्री विखे यांनी केल्या़महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्याकडून ३५ हजार क्विंटल, खासगी कंपनीकडून एक लाख क्विंटल व शेतकर्‍यांकडून बीज प्रक्रिया करून ५० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असले तरी आणखीही उपलब्धता करावी लागणार आहे़