शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणांचा तुटवडा कमी करा

By admin | Updated: May 25, 2014 00:31 IST

खरीप हंगाम : राधाकृष्ण विखे यांचे अधिकार्‍यांना निर्देश

बाभळेश्वर : शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणांची उपलब्धता करून देण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्या सहकार्याने आणि खासगी कंपन्यांकडून शेतकर्‍यांकडून बीजप्रक्रिया केलेले बियाणे उपलब्ध करून सोयाबीन बियाणांचा तुटवडा कमी करण्यासाठी कृषी अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली़ अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ बैठकीनंतर मंत्री विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ या बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल भंडारी, उपायुक्त रवींद्र ठाकरे, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ रवीप्रकाश दाणी, आत्माचे संचालक एम़ व्ही़ देशमुख, विभागीय कृषी संचालक अशोक लोखंडे यांच्यासही कृषी विभागातील अधिकारी आणि बियाणे कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते़ यावेळी मंत्री विखे म्हणाले की, खरीप हंगामातील इतर पिकांच्या लागवडीबरोबरच सोयाबीनचे पीक घेण्यासाठी शेतकर्‍यांचा कल दिसून येतो़ सोयाबीनच्या बियाणांसाठी शेतकर्‍यांची असलेली मागणी आणि बियाणांचा असलेला तुटवडा लक्षात घेऊन, जिल्हा आणि तालुकास्तरावर सोयाबीन बियाणांची उपलब्धता करण्यासाठी कृषी विभागाणे नियोजन केले आहे़ जिल्हा आणि तालुका स्तरावर सर्व कृषी अधिकार्‍यांना गावा-गावात जावून शेतकरी आणि शेतकरी गटाशी चर्चा करून नियोजन करून सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले़ (वार्ताहर)राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बियाणांचा काळा बाजार रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यात मागणी प्रमाणे खतांची उपलब्धता करून देण्यात येईल़ बियाणे आणि खत विक्रेत्यांना उपलब्ध असलेला साठा, झालेली विक्री याबाबतची आकडेवारी दर्शनीभागात फलकावर लावण्याबाबत सूचना मंत्री विखे यांनी केल्या़महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्याकडून ३५ हजार क्विंटल, खासगी कंपनीकडून एक लाख क्विंटल व शेतकर्‍यांकडून बीज प्रक्रिया करून ५० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध होणार असले तरी आणखीही उपलब्धता करावी लागणार आहे़