शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

कुकडीचे आवर्तन लांबले : शेतक-यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 16:14 IST

कुकडी कालव्याचे आवर्तन थेट १० नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गणेशोत्सव काळात भरपूर पाऊस येऊन, वेळेवर कांदा लागवडी होतील, असे शेतक-यांचे अपेक्षित नियजन होते.

निघोज : कुकडी कालव्याचे आवर्तन थेट १० नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गणेशोत्सव काळात भरपूर पाऊस येऊन, वेळेवर कांदा लागवडी होतील, असे शेतक-यांचे अपेक्षित नियजन होते. परंतु गणेशोत्सवात पाऊस न झाल्याने लागवडी योग्य झालेली कांद्याची रोपे पाण्याअभावी लावायचे कशी? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.परिसरात पाऊस नसतानाच आता कुकडीचे आवर्तन लांबले आहे. नेहमी कालवा भरून वाहणा-या निघोज बागायती पट्टयात दहा वर्षात पहिल्यांदाच पाण्याअभावी कांदा लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतक-यांनी कुकडीच्या आवर्तनाचे पाणी मिळण्यासाठी पाणी मागणी अर्ज निघोजच्या कुकडी सिंचन शाखेत वेळेत सादर करावेत, असे आवाहन कुकडी पाटबंधारे उपविभागच्या सहायक अभियंता एस.यु.डुंबरे व निघोजचे सिंचन शाखाधिकारी एम. ए. दिघे यांनी केले आहे.

कुकडी पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत येणा-या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टिएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे शेतक-यांनी पिकांचे नियोजन करावे. शेतक-यांनी अर्ज भरून पाण्याची मागणी करून पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे. पाण्याची मागणी असल्यास आम्हाला सरकारी पातळीवर पाठपुरावा करता येतो. दसºयाला पाऊस झाल्यास पाणी लवकरही सोडण्यात येऊ शकते.-एस.यु.डुंबरे, सहाय्यक कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव.

निघोज परिसर कृषी फलोद्यान संस्थेच्या वतीने शेतक-यांना पाण्याचे महत्त्व पटवून देऊन कुकडी पाटबंधारे विभागाकडे पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाण्याची मागणी करण्यासाठी जनजागृती करणार आहे. शेतक-यांची पाण्याची मागणी असल्यास आम्हालाही शासकीय पातळीवर भांडता येते. - माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, अध्यक्ष, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्था.

निघोज परिसर कृषी फलोद्यान संस्थेच्या वतीने शेतक-यांना पाण्याचे महत्त्व पटवून देऊन कुकडी पाटबंधारे विभागाकडे पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाण्याची मागणी करण्यासाठी जनजागृती करणार आहे. शेतक-यांची पाण्याची मागणी असल्यास आम्हालाही शासकीय पातळीवर भांडता येते. - माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, अध्यक्ष, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्था.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर