शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

कुकडीचे आवर्तन लांबले : शेतक-यांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 16:14 IST

कुकडी कालव्याचे आवर्तन थेट १० नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गणेशोत्सव काळात भरपूर पाऊस येऊन, वेळेवर कांदा लागवडी होतील, असे शेतक-यांचे अपेक्षित नियजन होते.

निघोज : कुकडी कालव्याचे आवर्तन थेट १० नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने बागायती पट्ट्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गणेशोत्सव काळात भरपूर पाऊस येऊन, वेळेवर कांदा लागवडी होतील, असे शेतक-यांचे अपेक्षित नियजन होते. परंतु गणेशोत्सवात पाऊस न झाल्याने लागवडी योग्य झालेली कांद्याची रोपे पाण्याअभावी लावायचे कशी? असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.परिसरात पाऊस नसतानाच आता कुकडीचे आवर्तन लांबले आहे. नेहमी कालवा भरून वाहणा-या निघोज बागायती पट्टयात दहा वर्षात पहिल्यांदाच पाण्याअभावी कांदा लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतक-यांनी कुकडीच्या आवर्तनाचे पाणी मिळण्यासाठी पाणी मागणी अर्ज निघोजच्या कुकडी सिंचन शाखेत वेळेत सादर करावेत, असे आवाहन कुकडी पाटबंधारे उपविभागच्या सहायक अभियंता एस.यु.डुंबरे व निघोजचे सिंचन शाखाधिकारी एम. ए. दिघे यांनी केले आहे.

कुकडी पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत येणा-या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ टिएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे शेतक-यांनी पिकांचे नियोजन करावे. शेतक-यांनी अर्ज भरून पाण्याची मागणी करून पाण्याचे काटकसरीने नियोजन करावे. पाण्याची मागणी असल्यास आम्हाला सरकारी पातळीवर पाठपुरावा करता येतो. दसºयाला पाऊस झाल्यास पाणी लवकरही सोडण्यात येऊ शकते.-एस.यु.डुंबरे, सहाय्यक कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग नारायणगाव.

निघोज परिसर कृषी फलोद्यान संस्थेच्या वतीने शेतक-यांना पाण्याचे महत्त्व पटवून देऊन कुकडी पाटबंधारे विभागाकडे पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाण्याची मागणी करण्यासाठी जनजागृती करणार आहे. शेतक-यांची पाण्याची मागणी असल्यास आम्हालाही शासकीय पातळीवर भांडता येते. - माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, अध्यक्ष, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्था.

निघोज परिसर कृषी फलोद्यान संस्थेच्या वतीने शेतक-यांना पाण्याचे महत्त्व पटवून देऊन कुकडी पाटबंधारे विभागाकडे पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पाण्याची मागणी करण्यासाठी जनजागृती करणार आहे. शेतक-यांची पाण्याची मागणी असल्यास आम्हालाही शासकीय पातळीवर भांडता येते. - माजी सरपंच चंद्रकांत लामखडे, अध्यक्ष, निघोज परिसर कृषी फलोद्यान सहकारी संस्था.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर