शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची मराठीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 11:33 IST

एकीकडे मराठी अस्मितेच्या जतन आणि संवर्धनाचा मुद्दा राज्यकर्त्यांकडून पुढे आणला जात असताना दुसरीकडे मात्र गुणांच्या लालसेपोटी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मराठीऐवजी हिंदी, संस्कृत अशा भाषांना प्राधान्य दिले जात आहे.

भरत मोहोळकरअहमदनगर : एकीकडे मराठी अस्मितेच्या जतन आणि संवर्धनाचा मुद्दा राज्यकर्त्यांकडून पुढे आणला जात असताना दुसरीकडे मात्र गुणांच्या लालसेपोटी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मराठीऐवजी हिंदी, संस्कृत अशा भाषांना प्राधान्य दिले जात आहे.सध्या अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यावेळी विषय निवड करताना मराठी ही आपली मातृभाषा असतानाही बहुतांश विद्यार्थ्यांनी हिंदी व संस्कृत या अधिक गुण मिळवून देणाऱ्या विषयांना प्राधान्य दिल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत समोर आले आहे. काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता, या विद्यार्थ्यांनी सांगितले की, मराठी ही भाषा बोलायला सोपी आहे, परंतु लिहायला व्याकरणामुळे अवघड आहे. त्याचा गुणांकणावर परिणाम होतो. याउलट शंभरपैकी शंभर गुण मिळवून देणारे हिंदी व संस्कृत हे भाषा विषय अधिक सोईस्कर वाटतात. मराठी भाषा विषयाच्या परीक्षेत प्रश्नांची उत्तरेही शुद्धलेखनदृष्ट्या अचूक असावे लागतात. त्यामुळे शुद्धलेखनातील चुकांचा गुणांवर परिणाम होतो. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळेत शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांना मराठी भाषा अवघड जाते. तसेच मराठी भाषा ही महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असल्याने आता बदल स्वीकारणे ही काळाची गरज असल्याचे काही विद्यार्थिनी म्हणाले़ दुसरीकडे हिंदी व इंग्रजी हे विषय अवघड जात असल्याने नाईलाजास्तव मराठी घेत असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. काही विद्यार्थ्यांनी मात्र मराठीच्या बाजूने कल दिला. आम्हाला मराठीचा अभिमान आहे. मराठी बोलायला व समजण्यास सोपी जाते.त्यामुळे अकरावीसाठी मराठी विषय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.मराठीत लिहिताना अनेक चूका होतात. त्यामुळे गुणांवर परिणाम होतो. त्यामुळे मराठीऐवजी हिंदी हा विषय निवडला आहे. -अजिंक्य थोरात, विद्यार्थीमराठी भाषा बोलायला सोपी आहे, परंतु लिहिताना शुद्धलेखनाच्या अनेक चूका घडतात. यामुळे त्याचा गुणांवर परिणाम होतो. म्हणून आपण हिंदी हा जास्त गुण मिळवून देणारा विषय निवडला आहे. -निरज सागावकर, विद्यार्थीमराठी ही आपली मातृभाषा आहे़ त्यामुळे प्रत्येकाला तिचा अभिमान असला पाहिजे. म्हणून मी मराठी हा विषय निवडला आहे. -ओम जवळकर, विद्यार्थीसर्व प्रगत राष्ट्रांच्या शिक्षण प्रणालीचा विचार केला असता तेथील मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते. ज्ञान समजून घेण्यासाठी व आत्मसात करण्यासाठी मातृभाषा हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण दिले जाणारे देश पटकन प्रगती करताना दिसतात. त्यामुळे आपण मराठी भाषेचा स्वीकार करायला हवा. - प्रा. शरद कोरडे, शिक्षक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय