शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
2
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
3
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
4
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
5
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
6
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
7
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
8
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
9
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
10
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
11
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: पवार-ठाकरेंशी फोनवर काय बोलणे झाले? CM फडणवीसांनी सगळेच सांगितले
12
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
13
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
14
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
15
घर खरेदीदारांसाठी मोठी बातमी! घर बांधणे आणि खरेदी करणे स्वस्त होणार? कोणाला होणार सर्वाधिक फायदा?
16
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?
17
“शेतकरी कर्जमाफी फाइलवर सही करण्यास फडणवीस-शिंदे-पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का?”: सपकाळ
18
नवऱ्याच्या हत्येचा कट रचला, बॉयफ्रेंडही सामील झाला; पण 'त्या' WhatsApp मेसेजमुळे पत्नीचा डाव उघड झाला!
19
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
20
Airtel नं आपल्या स्वस्त रिचार्ज प्लानमध्ये केला मोठा बदल; पूर्वीपेक्षा कमी मिळणार डेटा, पाहा डिटेल्स

पदवीधर मतदारांची विशेष मोहिमेकडे पाठ

By admin | Updated: July 25, 2016 00:08 IST

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेकडे मतदारांनी पाठ फिरविली आहे़

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेकडे मतदारांनी पाठ फिरविली आहे़ जिल्हाभरात दुसऱ्या दिवशी राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत एक हजार मतदारांनी अर्ज सादर केले असून, माहिती न देणाऱ्या मतदारांचा आकडा ‘जैसे थे’ आहे़ त्यामुळे ऐन निवडणुकीच्यावेळी मोठा पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत़नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक डिसेंबरमध्ये होत आहे़ निवडणुकीची पूर्वतयारी जिल्हा निवडणूक शाखेकडून सुरू करण्यात आली आहे़ त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात मतदारयादी अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे़ या मोहिमेंतर्गत ज्या मतदारांचे जुन्या यादीत नाव आहे, त्यांनी छायाचित्रासह २० मुद्यांची माहिती सादर करणे अपेक्षित आहे़ मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून वेळोवेळी सूचना देवूनही अद्याप माहिती प्राप्त झाली नाही़ आतापर्यंत ७९ हजार मतदारांपैकी २५ हजार मतदारांचीच माहिती प्राप्त झाली आहे़ उर्वरित ५४ हजार मतदारांनी अद्याप छायाचित्र व इतर माहिती प्रशासनाकडे दिली नाही़ त्यामुळे जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने मंडलस्तरावर विशेष मोहीम हाती घेतली़ या मोहिमेचा रविवारी दुसरा दिवस होता़ पहिल्या दिवशी १ हजार १५७ अर्ज प्राप्त झाले़ दुसऱ्या दिवशीही माहिती देण्यासाठी मतदार घराबाहेर पडले नाहीत़ दिवसभरात १ हजार २५ मतदारांनीच छायाचित्र व इतर २० मुद्यांची माहिती दिली असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी दिली़ जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ही मोहीम राबविण्यात आली आहे़ महसूलच्या सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांनी शासकीय सुटी न घेता मोहीम राबविली़ मात्र मतदार माहिती घेऊन आले नाहीत़ त्याचबरोबर गावातून रिक्षाही फिरविण्यात आली़ परंतु मतदारांमध्ये निरुत्साही वातावरण असल्याचे यावरून स्पष्ट होते़ काही ठिकाणी तरी कर्मचाऱ्यांनी मतदारांच्या घरी जावून माहिती घेतली असल्याचे याविषयी माहिती देताना उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी सांगितले़ ते म्हणाले, जिल्ह्यात प्रभावीपणे ही मोहीम राबविण्यात आली़ माहिती न देणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे़ छायाचित्रासह मतदारयादी अद्ययावत करणे बंनधकारक आहे़ परंतु, जिल्ह्यात मतदारांकडून प्रतिसाद मिळत नाही़ मात्र निवडणुका जवळ आल्यानंतर हेच मतदार तक्रारी करतात़ त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विशेष मोहीम हाती घेण्यात आली़ (प्रतिनिधी)