शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल युगातही रांजणी-माथणी ‘आउट ऑफ कव्हरेज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:35 IST

केडगाव : नगर तालुक्यातील रांजणी-माथणी ही दोन्ही गावे मोबाईलला रेंज मिळत नसल्याने अद्यापही ‘आउट ऑफ कव्हरेज एरिया’त आहे. ...

केडगाव : नगर तालुक्यातील रांजणी-माथणी ही दोन्ही गावे मोबाईलला रेंज मिळत नसल्याने अद्यापही ‘आउट ऑफ कव्हरेज एरिया’त आहे. यामुळे ऑनलाईन कामांचा खेळखंडोबा होत असून गावातील शैक्षणिक, शासकीय कामांचा पुरता बोजवारा उडाला.

गर्भगिरीच्या डोंगरात वसलेली रांजणी व माथणी ही दोन जुळी वाटणारी गावे. मोबाईल टॉवर नसल्याने जगाच्या संपर्कापासून खूप दूर आहेत. दोन्ही गावांनी गावरान पद्धतीचा अस्सल खवा तयार करण्यात नावलौकीक मिळविला आहे. येथील खव्याला राज्यभरातून मागणी असते. ग्रामीण नाट्य चळवळीचीशी अतूट नाळ असल्यामुळे येथील कलावंत व त्यांची नाट्यकला अलौकीक आहे. दोन्ही गावात सरासरी दीड ते दोन हजार लोकसंख्या आहे. येथील ६० टक्के गावकरी दुग्ध व्यवसाय, नोकरी, भाजीपाला विक्री, इतर रोजगाराच्या निमित्ताने नगर शहराशी रोज ये-जा करतो. गावात कधीच कोणाचा मोबाईलद्वारे संपर्क होत नाही. वर्षभर शालेय मुलांचे शिक्षणही ऑनलाईन सुरू आहे. यूट्यूब किंवा इतर व्हिडोओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून शाळा बंद असतानाही इतर ठिकाणी मुलांचे शिक्षण अविरत सुरू राहिले. मात्र त्याला ही दोन गावे अपवाद ठरली. इतकेच नाही ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयातून आता ऑनलाईन दाखले मिळण्याची सुविधा राज्य सरकारने राज्यभरात सुरू केली. मात्र या दोन गावात मोबाईलला रेंजच मिळत नसल्याने या सर्व शासकीय सुविधांपासून ही गावे वंचित आहेत. दोन्ही गावातील काही विशिष्ट डोंगरमाथ्यावर थोडीफार रेंज मिळते.

-----

अन‌् अनेकांना जीव गमवावा लागला..

गावात दुग्ध व्यवसाय जोमात असल्याने प्रत्येकाच्या घरापुढे पशुधन आहे. गुरे चारण्यासाठी गेलेल्या काहींना अचानक शारिरीक त्रास होतो. काहींना हृदयविकाराचे झटके येण्याचे गंभीर प्रकार घडले. मात्र अशा संकटात कोणाशी संपर्क न झाल्याने त्यांना नाहक जीव गमावण्याची वेळ आली आहे.

---------

रांजणी गावात मोबाईलला रेंज यावी यासाठी आम्ही ग्रामपंचायतीचा अनेकदा ठराव घेऊन तो जिल्हा प्रशासनाला पाठविला. स्थानिक आमदार, खासदार यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजविले. इतकेच नाही तर जिओ व बीएसएनएलच्या कार्यालयांना अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र कोणीच याकडे लक्ष दिले नाही.

-बाळासाहेब चेमटे,

सरपंच, रांजणी

------

माथणी गावात सर्वांकडे मोबाईल फोन असूनही रेंज नसल्याने तो कधीच खणखणत नाही. मोबाईल कंपन्यांन्या अनेकदा पत्र दिले. निवेदन दिले. खासदारांकडेही पाठपुरावा केला. मात्र आमची मागणी अद्याप कोणीच गांभीर्याने घेतली नाही.

-महेश वाघ,

माजी उपसरपंच, माथणी