शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल युगातही रांजणी-माथणी ‘आउट ऑफ कव्हरेज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:35 IST

केडगाव : नगर तालुक्यातील रांजणी-माथणी ही दोन्ही गावे मोबाईलला रेंज मिळत नसल्याने अद्यापही ‘आउट ऑफ कव्हरेज एरिया’त आहे. ...

केडगाव : नगर तालुक्यातील रांजणी-माथणी ही दोन्ही गावे मोबाईलला रेंज मिळत नसल्याने अद्यापही ‘आउट ऑफ कव्हरेज एरिया’त आहे. यामुळे ऑनलाईन कामांचा खेळखंडोबा होत असून गावातील शैक्षणिक, शासकीय कामांचा पुरता बोजवारा उडाला.

गर्भगिरीच्या डोंगरात वसलेली रांजणी व माथणी ही दोन जुळी वाटणारी गावे. मोबाईल टॉवर नसल्याने जगाच्या संपर्कापासून खूप दूर आहेत. दोन्ही गावांनी गावरान पद्धतीचा अस्सल खवा तयार करण्यात नावलौकीक मिळविला आहे. येथील खव्याला राज्यभरातून मागणी असते. ग्रामीण नाट्य चळवळीचीशी अतूट नाळ असल्यामुळे येथील कलावंत व त्यांची नाट्यकला अलौकीक आहे. दोन्ही गावात सरासरी दीड ते दोन हजार लोकसंख्या आहे. येथील ६० टक्के गावकरी दुग्ध व्यवसाय, नोकरी, भाजीपाला विक्री, इतर रोजगाराच्या निमित्ताने नगर शहराशी रोज ये-जा करतो. गावात कधीच कोणाचा मोबाईलद्वारे संपर्क होत नाही. वर्षभर शालेय मुलांचे शिक्षणही ऑनलाईन सुरू आहे. यूट्यूब किंवा इतर व्हिडोओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून शाळा बंद असतानाही इतर ठिकाणी मुलांचे शिक्षण अविरत सुरू राहिले. मात्र त्याला ही दोन गावे अपवाद ठरली. इतकेच नाही ग्रामपंचायत किंवा तलाठी कार्यालयातून आता ऑनलाईन दाखले मिळण्याची सुविधा राज्य सरकारने राज्यभरात सुरू केली. मात्र या दोन गावात मोबाईलला रेंजच मिळत नसल्याने या सर्व शासकीय सुविधांपासून ही गावे वंचित आहेत. दोन्ही गावातील काही विशिष्ट डोंगरमाथ्यावर थोडीफार रेंज मिळते.

-----

अन‌् अनेकांना जीव गमवावा लागला..

गावात दुग्ध व्यवसाय जोमात असल्याने प्रत्येकाच्या घरापुढे पशुधन आहे. गुरे चारण्यासाठी गेलेल्या काहींना अचानक शारिरीक त्रास होतो. काहींना हृदयविकाराचे झटके येण्याचे गंभीर प्रकार घडले. मात्र अशा संकटात कोणाशी संपर्क न झाल्याने त्यांना नाहक जीव गमावण्याची वेळ आली आहे.

---------

रांजणी गावात मोबाईलला रेंज यावी यासाठी आम्ही ग्रामपंचायतीचा अनेकदा ठराव घेऊन तो जिल्हा प्रशासनाला पाठविला. स्थानिक आमदार, खासदार यांच्या कार्यालयाचे उंबरे झिजविले. इतकेच नाही तर जिओ व बीएसएनएलच्या कार्यालयांना अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र कोणीच याकडे लक्ष दिले नाही.

-बाळासाहेब चेमटे,

सरपंच, रांजणी

------

माथणी गावात सर्वांकडे मोबाईल फोन असूनही रेंज नसल्याने तो कधीच खणखणत नाही. मोबाईल कंपन्यांन्या अनेकदा पत्र दिले. निवेदन दिले. खासदारांकडेही पाठपुरावा केला. मात्र आमची मागणी अद्याप कोणीच गांभीर्याने घेतली नाही.

-महेश वाघ,

माजी उपसरपंच, माथणी