शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

रणरागिणींचे आत्मक्लेश आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2016 00:15 IST

पारनेर : दोन वर्षे उलटूनही पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथील निर्भयावर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणाचा निवाडा जलदगतीने करावा,

पारनेर : दोन वर्षे उलटूनही पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथील निर्भयावर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणाचा निवाडा जलदगतीने करावा, या प्रमुख मागणीसाठी पारनेर तालुक्यातील शेकडो रणरागिणींनी सोमवारी पारनेर येथे आत्मक्लेष आंदोलन केले.लोणी मावळा येथील नववीत शिक्षण घेणाऱ्या निर्भयावर अत्याचार करून तिचा खून झाला होता. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करून जलदगती न्यायालयात खटला चालविण्याची विनंती केली होती. त्यावरून खटला जलदगती न्यायालयात सुरू आहे तसेच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम काम पाहत आहेत. परंतु हे प्रकरण जलदगतीने चालवून न्याय द्यावा, या मागणीसाठी सह्याद्री प्रतिष्ठान, पारनेर तालुका पत्रकार संघ, किसान युनियन परिवाराच्यावतीने आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले.ग्रामीण साहित्यिक संजय कळमकर म्हणाले, सध्याची पिढी सोशल मीडियात हरवली आहे. त्यामुळे ही पिढी सैराट बनत चालली आहे. त्यात आता संस्कारावर गप्पा मारणारे साहित्यिक कुठे आहेत? असा टोला त्यांनी लगावला. बाजार समितीचे माजी सभापती काशीनाथ दाते म्हणाले, लोणी मावळा येथील मुलीवरील अत्याचाराचा प्रकार गंभीर होता. त्याचा निकाल लवकर लागण्यासाठी सह्याद्री परिवाराने घेतलेला पुढाकार योग्य आहे. जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल झावरे म्हणाले, एखाद्या पीडितेला न्याय लवकर न देणे हा अन्याय असून न्यायालयाने समाजमनाचा विचार करावा.संयोजक शिवाजी शिर्के म्हणाले, लोणी मावळातील निर्भयाला दोन वर्षांपासून न्याय मिळाला नाही. दोन वर्षांत फक्त दोनवेळा सुनावणी झाली. परंतु जलदगतीऐवजी जास्त धिम्या गतीने न्यायालयात याची सुनावणी असल्याचे सांगितले. आता न्याय लवकर मिळालाच पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, पत्रकार शिवाजी शिर्के, डॉ.भास्कर शिरोळे, रामदास भोसले, नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिकेत औटी, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वाघमारे, सुरेश पठारे, अर्जुन भालेकर, शैलेंद्र औटी, महिला व बालकल्याण सभापती सुरेखा भालेकर, नगरसेविका शशिकला शेरकर, सुधामती कवाद, बबन कवाद, नागेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र मुळे, नजीर तांबोळी आदी हजर होते. पारनेर शहरात मंगळवारी आंदोलनाचा विषय चर्चिला गेला. (तालुका प्रतिनिधी)पारनेर येथील आत्मक्लेश आंदोलनात स्नेहल औटी, तृप्ती चेडे, प्रियंका क्षीरसागर, रूपाली दिघे, माधुरी चव्हाण, ज्योती लंके, संगीता चव्हाण या महाविद्यालयीन युवतींनी आक्रमकपणे मुलींवरील अत्याचाराबाबत भूमिका मांडून न्यायासाठी आम्ही दोन वर्षे लढा देत असून न्यायासाठी किती निर्भयांचा बळी जाणार? असा संतप्त सवालही त्यांनी केला. उपसरपंच सुवर्णा शेंडकर व निर्भयाच्या मावशी म्हणाल्या, आम्हाला लवकर न्याय द्या, आता दारूबंदी झाल्याशिवाय असे अत्याचार थांबणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.आत्मक्लेष आंदोलनात पोलीस उपअधिक्षक आनंद भोइटे, प्रांताधिकारी संतोश भोर, तहसीलदार भारती सागरे,पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर आदींनी लोणी मावळा प्रकरण न्यायप्रविष्ठ असून याबाबत सतरा आॅगस्टपासून सुनावणी सुरू होणार असल्याचे सांगितले. तसेच याप्रकरणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले.