शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चार तासातच राजूरची पाणी योजना बंद

By admin | Updated: July 1, 2016 00:30 IST

राजूर : नव्याने दुरुस्त करण्यात आलेली जुन्या विहिरीवरील येथील पाणी पुरवठा योजना अवघ्या चार तासातच बंद पडल्यामुळे राजूरकरांवरील पाणी टंचाईचे संकट अद्यापही कायम आहे.

राजूर : नव्याने दुरुस्त करण्यात आलेली जुन्या विहिरीवरील येथील पाणी पुरवठा योजना अवघ्या चार तासातच बंद पडल्यामुळे राजूरकरांवरील पाणी टंचाईचे संकट अद्यापही कायम आहे. दरम्यान बंद पडलेली पाणी पुरवठा योजना तत्काळ सुरू करून गावाला कायमस्वरुपी पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी राजूर विकास आघाडीने गुरुवारी येथील कोल्हार घोटी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.गेल्या दहा दिवसांपासून येथील बंद पडलेली पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात यावी यासाठी विकास आघाडीच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे कोल्हार घोटी रस्त्यावर सभेत रूपांतर झाले.या सभेत बोलताना भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे म्हणाले की, युती शासनाच्या काळात १९९५ मध्ये राजूर पाणी पुरवठा योजना मंजूरकरण्यात आली. मात्र ही योजना चालविण्यास स्थानिक प्रशासनाला अनेक वेळा अपयश आले. गावाला पाणी पुरविणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असताना सत्ताधारी मात्र शासनाला दोष देण्याचे काम करू नये , असे सांगतानाच पाणी पुरवठा मंत्र्यांना शिष्टमंडळ भेटून राजूरचा पाणी प्रश्न कायमचा सोडविणार असल्याचे ते म्हणाले.जि.प. सदस्य डॉ. किरण लहामटे म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गावाला २४ तास पाणी देण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. मात्र दहा दिवसांपासून बंद असलेला पाणी पुरवठा अद्यापही सुरळीत झाला नाही. ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशाराही डॉ.लहामटे यांनी दिला. यावेळी विकास आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख, विनय सावंत, माजी उपसरपंच काशिनाथ भडांगे आदींनीही आपल्या मनोगतातून स्थानिक प्रशासनावर टीकास्त्र सोडले. (वार्ताहर)