शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
2
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
3
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
4
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
5
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
6
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
7
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
8
Chaturmas 2025: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
9
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
10
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
11
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
12
कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती
13
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
14
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video)
15
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
16
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
17
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
18
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
19
एकेकाळी दारुचे पाट वाहिलेल्या दिल्लीत, प्रचंड बिअर टंचाई; भलेभले ब्रँड शोधूनही सापडत नाहीत...
20
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या

अभियांत्रिकीचा देशप्रगतीत बहुमोल वाटा- राजकुमार देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:49 IST

अभियंत्यांचे देशप्रगतीतील योगदान, अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन, भविष्यात अभियांत्रिकीसमोरील आव्हाने, बदल अशा सर्वच बाजूंनी नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार देशपांडे यांच्याशी साधलेला हा संवाद.

अभियंता दिन/संडे मुलाखत/

चंद्रकांत शेळके/अहमदनगर : आधुनिक भारतातील अभियंत्यांचे प्रेरणास्थान डॉ. मोक्षगुण्डम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस (१५ सप्टेंबर) भारतात अभियंता दिन म्हणून साजरा होतो. या पार्श्वभूमीवर अभियंत्यांचे देशप्रगतीतील योगदान, अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन, भविष्यात अभियांत्रिकीसमोरील आव्हाने, बदल अशा सर्वच बाजूंनी नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार देशपांडे यांच्याशी साधलेला हा संवाद.अभियांत्रिकीमुळे समाजाची, देशाची प्रगती कशी साधली जाते?आज भारताने या बाबतीत बराच मोठा पल्ला गाठला आहे. भारताची यशस्वी मंगळ मोहीम हे त्याचेच एक उदाहरण आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम फत्ते करणारा भारत हा आशिया खंडातील पहिला देश ठरला, कारण येथील अभियंते कौशल्यपूर्ण आहेत. उपग्रहांच्या आधारे चालणारी जीपीएस सिस्टिम भारताने विकसीत केली असून यासाठी भारताला आता गुगलवर अवलंबून राहण्याची गरज नाही. हे सर्व भारताच्या प्रगतीतील मैलाचे दगड आहेत.सध्या भारतात अभियंत्यांची स्थिती कशी आहे?सध्या भारतातून अनेक अभियंते दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडतात. परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अभियंत्यांचे फक्त पुस्तकी ज्ञान उपयोगी पडणार नसून त्यास प्रात्यक्षिकाची आणि त्याहूनही अधिक महत्वाचे म्हणजे कौशल्याची जोड देणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षात अभियांत्रिकीची ध्येयधोरणे कशी राहिली?भारताने गेल्या काही वर्षात आखलेली ध्येयधोरणे ही परदेशातही वाखाणली गेली आहेत. डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी प्रकल्प, मेक ईन इंडिया, ई-क्रांती, ई-गव्हर्नन्स, डिजिटल लॉकर, स्टार्ट अप हे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. त्यातून नक्कीच देशप्रगतीत हातभार लागेल.अभियांत्रिकी समोरील आव्हाने कोणती? अभियांत्रिकी शिक्षणपद्धतीत बदल आवश्यक आहेत का?खरं तर अभियंते हे देशसेवकच आहेत. देशापुढील समस्या, आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी त्यांचे कौशल्य वापरायला हवे. नैसर्गिक आपत्तीत उपाययोजना करणे, इंधनाचे मर्यादित स्त्रोत लक्षात घेता अपारंपरिक उर्जा स्त्रोताचा वापर, प्रदूषण नियंत्रण, भूकंपरोधक घरे असा सामाजिक प्रश्नांचा अभ्यास, त्यावर उपाययोजना करणे ही काही आव्हाने अभियंत्यांसमोर आहेत. कौशल्य हा यशस्वी इंजिनिअर्सचा मूलमंत्र आहे. ‘प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग’, स्किलबेस्ड इंजिनिअरिंग, इंडस्ट्री ओरिएंटेड लर्निंग यावर यापुढील काळात शिक्षणसंस्थांनी विचार करणे गरजेचे आहे. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखत