शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीचा देशप्रगतीत बहुमोल वाटा- राजकुमार देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 11:49 IST

अभियंत्यांचे देशप्रगतीतील योगदान, अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन, भविष्यात अभियांत्रिकीसमोरील आव्हाने, बदल अशा सर्वच बाजूंनी नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार देशपांडे यांच्याशी साधलेला हा संवाद.

अभियंता दिन/संडे मुलाखत/

चंद्रकांत शेळके/अहमदनगर : आधुनिक भारतातील अभियंत्यांचे प्रेरणास्थान डॉ. मोक्षगुण्डम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस (१५ सप्टेंबर) भारतात अभियंता दिन म्हणून साजरा होतो. या पार्श्वभूमीवर अभियंत्यांचे देशप्रगतीतील योगदान, अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन, भविष्यात अभियांत्रिकीसमोरील आव्हाने, बदल अशा सर्वच बाजूंनी नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार देशपांडे यांच्याशी साधलेला हा संवाद.अभियांत्रिकीमुळे समाजाची, देशाची प्रगती कशी साधली जाते?आज भारताने या बाबतीत बराच मोठा पल्ला गाठला आहे. भारताची यशस्वी मंगळ मोहीम हे त्याचेच एक उदाहरण आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम फत्ते करणारा भारत हा आशिया खंडातील पहिला देश ठरला, कारण येथील अभियंते कौशल्यपूर्ण आहेत. उपग्रहांच्या आधारे चालणारी जीपीएस सिस्टिम भारताने विकसीत केली असून यासाठी भारताला आता गुगलवर अवलंबून राहण्याची गरज नाही. हे सर्व भारताच्या प्रगतीतील मैलाचे दगड आहेत.सध्या भारतात अभियंत्यांची स्थिती कशी आहे?सध्या भारतातून अनेक अभियंते दरवर्षी पदव्या घेऊन बाहेर पडतात. परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अभियंत्यांचे फक्त पुस्तकी ज्ञान उपयोगी पडणार नसून त्यास प्रात्यक्षिकाची आणि त्याहूनही अधिक महत्वाचे म्हणजे कौशल्याची जोड देणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षात अभियांत्रिकीची ध्येयधोरणे कशी राहिली?भारताने गेल्या काही वर्षात आखलेली ध्येयधोरणे ही परदेशातही वाखाणली गेली आहेत. डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी प्रकल्प, मेक ईन इंडिया, ई-क्रांती, ई-गव्हर्नन्स, डिजिटल लॉकर, स्टार्ट अप हे काही महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. त्यातून नक्कीच देशप्रगतीत हातभार लागेल.अभियांत्रिकी समोरील आव्हाने कोणती? अभियांत्रिकी शिक्षणपद्धतीत बदल आवश्यक आहेत का?खरं तर अभियंते हे देशसेवकच आहेत. देशापुढील समस्या, आव्हानांचा सामना करण्यासाठी त्यांनी त्यांचे कौशल्य वापरायला हवे. नैसर्गिक आपत्तीत उपाययोजना करणे, इंधनाचे मर्यादित स्त्रोत लक्षात घेता अपारंपरिक उर्जा स्त्रोताचा वापर, प्रदूषण नियंत्रण, भूकंपरोधक घरे असा सामाजिक प्रश्नांचा अभ्यास, त्यावर उपाययोजना करणे ही काही आव्हाने अभियंत्यांसमोर आहेत. कौशल्य हा यशस्वी इंजिनिअर्सचा मूलमंत्र आहे. ‘प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग’, स्किलबेस्ड इंजिनिअरिंग, इंडस्ट्री ओरिएंटेड लर्निंग यावर यापुढील काळात शिक्षणसंस्थांनी विचार करणे गरजेचे आहे. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरinterviewमुलाखत