शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली!

By admin | Updated: October 23, 2014 14:46 IST

संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे़ मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली़

अहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे़ मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली़ त्यामुळे मनसे आता १३ फूट खाली गेली आहे, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष खा़ रामदास आठवले यांनी येथे लगावला. राज्यात भाजपासोबत जाताना सत्तेत दहा टक्के वाटा मिळावा, अशी बोलणी झाली होती़ मात्र, आठपैकी आमची एकही जागा निवडून आली नाही़ त्यामुळे आता किमान दोन मंत्रिपदे आणि महामंडळात आम्हाला सहभाग मिळावा, अशी मागणी केल्याचे खा़ आठवले म्हणाले. विधानसभा निवडणुकीत रिपाइंच्या वाट्याला आठ जागा आल्या होत्या मात्र, अगदी शेवटच्या टप्प्यात आमच्या उमेदवारांना एबी फॉर्म मिळाले़ युतीच्या घोळात हा विलंब झाला़ या आठ जागा अगदी दोन ते चार हजारांच्या फरकाने हातातून गेल्या़ तरी एकही जागा जिंकता आली नाही, याची सल मनात आहे़ एकही जागा आली नसली तरी रिपाइंची मते ही भाजपासाठी प्रत्येक मतदारसंघात ग्रेसमार्क सारखी ठरली आहेत़ विधानसभेत निळा आणि भगवा फडकावा हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते़ मात्र, शिवसेना आणि भाजपामधील नेत्यांच्या इगोमुळे युती तुटली़ युती टिकावी, यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले. राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)