शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पाऊस गायब; पिकांवर किडींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 12:46 IST

पुढील पाच दिवस पाऊस दांडी मारणार असल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे.

राहुरी : पुढील पाच दिवस पाऊस दांडी मारणार असल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृ षी विद्यापीठाने हवामानानुसार पिकांवर औषध फवारणीचा सल्ला दिला आहे़ रोग-किडींचा प्रादुर्भाव आटोक्यात येण्यासाठी शेतकरी चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करीत आहे.हवामान अंदाजावर आधारित राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सल्ला दिला आहे़ हुमणीचा ऊस पिकावर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे़ हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनील ०़३ टक्के दाणेदार कीटकनाशक ३३ किलो प्रति हेक्टर या प्रमाणावर पसरावे़ कपाशीचे पीक ७० दिवसांचे झाल्यानंतर शेंडे खुडावेत़ त्यामुळे वाढ होऊन फलधारणा होईल़ पिठ्या ढेकूण नियंत्रणासाठी बिव्हेरिया बसियाना ७५ मिली १० लीटर पाण्यात मिसळून कपाशीवर फवारणी करावी़ बोंड अळीच्या नियंत्रणासाठी एच़एऩपी़व्ही़ हे जैविक विषाणू हेक्टरी ५०० एल़ ई़ १५ मिली १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी़ज्वारी पिकावर मावा तुडतुडे याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास व्हर्टीसिलीयम लेकॅनी ७५ मिली १५ लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी असा सल्ला कृ षी विद्यापीठाने दिला आहे़ सोयाबीन पिकातील मोठमोठे तण हाताने काढून घ्यावे़ सोयाबीनवरील स्पोडोप्टेरा, हिरवी उंट अळी, गर्डल बीटलच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनट्रनीलीप्रोल १८़५ टक्के प्रवाही ३ मिली, प-ल्युबेन्डामाईड ३९़३५ टक्के प्रवाही २ मिली अथवा लफेनुरॉन ५़४ टक्के प्रवाही १२ मिली प्रति १० लीटर पाण्यातून फवारावे, असा सल्ला देण्यात आला आहे़कांद्यावरील करपा व टाक्या यांच्या एकत्रित रोग व कीड नियंत्रणासाठी कांदा लागवडीनंतर ३० गॅ्रम डायथेन एम-४५ अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ इ़सी १० मिली प्रति १० लीटर पाण्यातून फवारणी करावी, असा सल्ला विद्यापीठाने दिला आहे.भारत मौसम विज्ञान विभागाच्या अंदाजानुसार अहमदनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवसात कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १७ ते २० अंश सेल्सिअस राहील़ आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आर्द्रता ७४ ते ७७ टक्के राहील. किमान आर्द्रता ४९ ते ५७ टक्के राहील. वा-याचा ताशी वेग ७ ते ११ किलोमीटर राहील, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील सहाय्यक प्राध्यापक डॉ. रवींद्र आंधळे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी