शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘मुळा’त सलग तीन वर्षे राहिला अतिरिक्त पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:14 IST

राहुरी : दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणात सलग तीन वर्षात पहिल्यांदाच अतिरिक्त पाणीसाठा राहिला आहे. यंदा ...

राहुरी : दक्षिण नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणात सलग तीन वर्षात पहिल्यांदाच अतिरिक्त पाणीसाठा राहिला आहे. यंदा धरणात १ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी साठा अतिरिक्त राहणार आहे. त्याचा वापर पुढील हंगामासाठी करण्यात येणार आहे.

२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून शेतीसाठी उन्हाळी पहिले आवर्तन सुरू आहे. उजवा कालव्याखाली ३० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आल्यानंतर उजवा कालवा बंद करण्यात येणार आहे. डावा कालवा साधारण एक-दोन दिवस सुरू राहणार आहे. तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणे अपेक्षित आहे.

मुळा धरणात सध्या १८ हजार २२६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. तर उपयुक्त पाणीसाठा १३ हजार ७२६ दशलक्ष घनफूट इतका आहे. त्यामध्ये साडेचार हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा राखीव आहे. मुळा धरणातून पाणी आवर्तन संपल्यानंतर सात हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यापैकी उन्हाळी दुसऱ्या आवर्तनासाठी पाच हजार दशलक्ष घनफूट पाणी शेतीसाठी उपयोगात येणार आहे. उरलेले दीड हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा पुढील हंगामासाठी उपयोगात येणार आहे.

....

मुळा धरणाचे दोन्ही कालवे सध्या सुरू आहेत. पुढील हंगामासाठी दीड हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा अतिरिक्त राहण्याची शक्यता आहे. तो पाणीसाठा पुढील हंगामात वापरता येईल. दोन्ही कालव्यांखालील पाणी शेतीसाठी वापरल्यानंतर कालवे बंद होणार आहेत. मे महिन्यात दुसरे उन्हाळी आवर्तन सुरू होईल.

-सायली पाटील, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे खाते, अहमदनगर.