शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोटात कोसळधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:14 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे या प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दाेन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारी (दि.२२) ...

अहमदनगर : जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे या प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दाेन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारी (दि.२२) सायंकाळी संपलेल्या चोवीस तासात धरणांच्या पाणलोटात तब्बल आठ इंच पावसाची नोंद झाली. त्यामुळे तीनही धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

अकोले तालुक्यातील भंडारदरा, निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळला. घाटघर, रतनवाडी आणि पांजरे येथे आठ इंचाहून अधिक पाऊस पडला. भंडारदरा येथेही सुमारे आठ इंच पाऊस झाला. कळसुबाई परिसरातून वाहणाऱ्या कृष्णावंती नदीच्या विसर्गात मोठी वाढ झाल्याने वाकी येथील ११२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत असून, या तलावावरून ११२ क्युसेकने पाणी निळवंडे धरणाच्या दिशेने झेपावत आहे.

गुरुवारी सायंकाळी संपलेल्या ३६ तासांत भंडारदरा धरणात १ टीएमसीपेक्षा अधिक म्हणजेच १ हजार ७१ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. त्यामुळे भंडारदरा धरणातील पाणीसाठा ६ हजार ४५९ दशलक्ष घनफूट इतका वाढला. निळवंडे धरणातील पाणीसाठा गुरुवारी सकाळी सहा वाजता १ हजार ७७० दशलक्ष घनफूट इतका नोंदविला गेला होता.

राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरणाकडे १० हजार ३४२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे मुळा धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ नोंदवली गेली. गुरुवारी ११ हजार ३८६ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली असून, ४४ टक्के धरण भरले आहे. त्यामुळे यंदा मुळा धरण शंभर टक्के भरेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

.................

धरण पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)

मुळा ११ हजार ३८६

भंडारदरा ६ हजार २३९

निळवंडे १ हजार ७७०

कुकडी ९ हजार ८९०

..................

भंडारदरा पाणलोटातील पाऊस (मिमीमध्ये)

घाटघर २१२

पांजरे २१०

रतनवाडी २०७

भंडारदरा १९०

वाकी १६० मिमी

..............

गोदावरीतील विसर्ग बंद

कोपरगाव : नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारी (दि. २२) सकाळी १० वाजता नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात ६ हजार ३१० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. दुपारी १२ वाजता हा विसर्ग बंद करून गोदावरीच्या डाव्या कालव्यात २०० क्युसेक व उजव्या कालव्यात ३०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.