शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची लोकाभिमुखता वाढली-राधाकृष्ण विखे; आश्वीत प्रचारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 14:00 IST

सामान्य माणसाच्या हिताची धोरणे आणि गावांचा विकास करण्याचा दृष्टिकोन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे. मराठा आरक्षणापासून ते अल्पसंख्याक समाज घटकांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे युती सरकारची लोकाभिमुखता वाढली असल्याचा विश्वास गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला. शिर्डी मतदारसंघातील आश्वी खुर्द येथे निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत विखे बोलत होते. 

आश्वी : सामान्य माणसाच्या हिताची धोरणे आणि गावांचा विकास करण्याचा दृष्टिकोन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आहे. मराठा आरक्षणापासून ते अल्पसंख्याक समाज घटकांसाठी घेतलेल्या निर्णयामुळे युती सरकारची लोकाभिमुखता वाढली असल्याचा विश्वास गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला. शिर्डी मतदारसंघातील आश्वी खुर्द येथे निवडणूक प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत विखे बोलत होते. थोरात समर्थक आणि संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल बजाबा गायकवाड आणि बाबासाहेब भवर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. शाळीग्राम होडगर, आण्णासाहेब भोसले, बाळासाहेब गायकवाड, बाळासाहेब भवर, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी निघुते आदी उपस्थित होते.विखे म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोगाची स्थापना करून हा विषय यशस्वीपणे सोडविला. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही  सरकारने भूमिका घेतली. सरकारने सामान्य माणसांसाठी विविध योजनांचे निर्णय घेतले. आपल्या मतदारसंघात या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली.शिर्डी विधानसभा मतदारसंघात या गावांचा समावेश झाल्यानंतर सुरू झालेली विकासाची प्रक्रिया अखंडितपणे समाजासाठी सुरू आहे. यात आपण कुठेही कमी पडलो नाही. होडगर म्हणाले, विखे पाटील परिवाराने तिसºया पिढीपर्यंत सामाजिक बांधिलकी जपली. बाळासाहेब गायकवाड म्हणाले, विखे यांनी आपल्या सर्व राजकीय सामाजिक वाटचालीत दलित वंचित अल्पसंख्याक समाजाला बरोबर घेऊन काम केले. विकास करण्याची दृष्टी त्यांच्याकडे असल्याने शिर्डी मतदारसंघासह आश्वी परिसरातील गावांना नवा चेहरा मिळाला आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019