शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बाळासाहेबांच्या विरोधानंतरही राधाकृष्ण विखेंची भाजपला मदत : अशोक विखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 12:33 IST

दिवंगत बाळासाहेब विखे हे कॉंग्रेसच्या विचाराशी प्रामाणिक होते. राधाकृष्ण विखे यांनी मात्र सतत स्वार्थासाठी पक्ष बदलण्याच्या तडजोडी केल्या.

अहमदनगर: दिवंगत बाळासाहेब विखे हे कॉंग्रेसच्या विचाराशी प्रामाणिक होते. राधाकृष्ण विखे यांनी मात्र सतत स्वार्थासाठी पक्ष बदलण्याच्या तडजोडी केल्या. शिवसेनेत जाण्याचा प्रस्ताव त्यांचाच होता. विरोधी पक्षनेते असतानाही ते भाजपात उपमुख्यमंत्री बनायला निघाले होते. बाळासाहेबांनीच त्यांना थांबविले होते. मात्र, या माणसाने अखेर जातीयवादी पक्षांची साथ केलीच. ही बाळासाहेब विखे यांच्या विचाराशीही प्रतारणा आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे मोठे बंधू अशोक विखे पाटील यांनी केली आहे.अशोक विखे यांनी राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात उघड राजकीय भूमिका घेतली आहे. नगर मतदारसंघात संग्राम जगताप यांच्या प्रचारात सहभागी होत शरद पवार यांच्यासमोर त्यांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी राधाकृष्ण यांच्यावर टीका केली होती. गुरुवारी ते श्रीरामपूर येथे कॉंग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचार सभेत सहभागी झाले होते.या सभेत ते म्हणाले, मंत्रिपद मिळत होते म्हणून राधाकृष्ण हे शिवसेनेत गेले. पुन्हा कॉंग्रेसमध्ये आले. कॉंग्रेसने त्यांना मंत्रिपद दिले. विरोधी पक्षनेतेपदाचा सन्मान दिला. मात्र, या पदावर असतानाच ते भाजपच्या संपर्कात होते. मध्ये ते भाजपमध्येही चालले होते. तेथे त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचे होते. मात्र, मी आयुष्यभर जातीयवादी पक्षांना विरोध केला असल्याचे सांगत दिवंगत बाळासाहेब विखे यांनी त्यांना थांबविले. मात्र, स्वार्थासाठी राधाकृष्ण यांनी आपल्या मुलाला भाजपमध्ये पाठवत भाजपशी घरोबा केलाच. शरद पवार व आमच्या कुटुंबाचे काहीही वैर नाही. राधाकृष्ण हे तसा दिखावा निर्माण करत आहेत.बाळासाहेब थोरात यांनी पक्षनिष्ठा बाळगून दोन वेळा शालिनी विखे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. एकदा तर राधाकृष्ण विखेंनी आश्वासन देऊनही हे पद थोरात गटाला दिले नाही. त्यांचे संपूर्ण राजकारण हे स्वार्थी व अविश्वासाचे आहे, असे अशोख विखे पाटील या सभेत म्हणाले.मुळा प्रवरा वीज संस्थेत घोटाळा आहे. मात्र, हे सरकार तक्रारींची दखल न घेता याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019