शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

रब्बीचे खंडित झालेले आवर्तन पुन्हा मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:20 IST

कोपरगाव : गोदावरी डाव्या कालव्यातून ४ जानेवारीला सोडण्यात आलेले आवर्तन बिगरसिंचन वगळता शेतीसाठी फक्त आठ दिवस सुरू राहिले. त्यानंतर ...

कोपरगाव : गोदावरी डाव्या कालव्यातून ४ जानेवारीला सोडण्यात आलेले आवर्तन बिगरसिंचन वगळता शेतीसाठी फक्त आठ दिवस सुरू राहिले. त्यानंतर हे आवर्तन १५ जानेवारीला बंद करण्यात आले. त्यामुळे हे आवर्तन फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मिळावे. उन्हाळा आवर्तनाच्या तारखा घोषित कराव्यात, या मागणीचे नुकतेच शेतकरी तुषार विध्वंस व प्रवीण शिंदे यांनी कोपरगाव पाटबंधारे उपविभागाकडे निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले, मुळात सध्याचा कालावधी ऊसतोडणीचा व रब्बीच्या पिकांच्या आंबवणीचा असतो. त्यामुळे या कालावधीमध्ये शक्यतो शेतकरी पाणी कमी प्रमाणातच मागणी करतात. मुळात हे पाणी डिसेंबर २०२० मध्ये मिळणे अपेक्षित होते. ज्यावेळेस आपल्या विभागामार्फत कोपरगाव नगर परिषदेच्या विनंतीवरून पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळेस आम्ही आपल्या विभागात आवर्तन लगेच रब्बीला जोडून द्यावे, अशी विनंती निवेदनाच्या स्वरूपात केली होती. परंतु, त्या निवेदनाचा विचार झाला नाही. डिसेंबर महिन्यात पेरणीच्या काळातच जास्त पाण्याची आवश्यकता असते. परंतु, आवश्यक असणारे पाणी मिळाले नाही. सध्याचे रब्बीचे आवर्तन बंद झाले. त्यामुळे रब्बीच्या नियोजनातील पाणी शिल्लक आहे. उन्हाळ्यात तीन आवर्तनांच्या पाण्यास धक्का न लावता रब्बीच्या शिल्लक पाण्यातून १० ते १५ फेब्रुवारी २०२१ च्या दरम्यान शेतकऱ्यांना आवर्तन द्यावे. म्हणजे, शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच प्रस्तावित उन्हाळी हंगामासाठीच्या आवर्तनाच्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात, जेणेकरून उन्हाळी हंगामासाठी शेतकरी आपले बारमाही पिकांचे नियोजन करू शकतील.