शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

रब्बीचे खंडित झालेले आवर्तन पुन्हा मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:20 IST

कोपरगाव : गोदावरी डाव्या कालव्यातून ४ जानेवारीला सोडण्यात आलेले आवर्तन बिगरसिंचन वगळता शेतीसाठी फक्त आठ दिवस सुरू राहिले. त्यानंतर ...

कोपरगाव : गोदावरी डाव्या कालव्यातून ४ जानेवारीला सोडण्यात आलेले आवर्तन बिगरसिंचन वगळता शेतीसाठी फक्त आठ दिवस सुरू राहिले. त्यानंतर हे आवर्तन १५ जानेवारीला बंद करण्यात आले. त्यामुळे हे आवर्तन फेब्रुवारी महिन्यात पुन्हा मिळावे. उन्हाळा आवर्तनाच्या तारखा घोषित कराव्यात, या मागणीचे नुकतेच शेतकरी तुषार विध्वंस व प्रवीण शिंदे यांनी कोपरगाव पाटबंधारे उपविभागाकडे निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले, मुळात सध्याचा कालावधी ऊसतोडणीचा व रब्बीच्या पिकांच्या आंबवणीचा असतो. त्यामुळे या कालावधीमध्ये शक्यतो शेतकरी पाणी कमी प्रमाणातच मागणी करतात. मुळात हे पाणी डिसेंबर २०२० मध्ये मिळणे अपेक्षित होते. ज्यावेळेस आपल्या विभागामार्फत कोपरगाव नगर परिषदेच्या विनंतीवरून पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळेस आम्ही आपल्या विभागात आवर्तन लगेच रब्बीला जोडून द्यावे, अशी विनंती निवेदनाच्या स्वरूपात केली होती. परंतु, त्या निवेदनाचा विचार झाला नाही. डिसेंबर महिन्यात पेरणीच्या काळातच जास्त पाण्याची आवश्यकता असते. परंतु, आवश्यक असणारे पाणी मिळाले नाही. सध्याचे रब्बीचे आवर्तन बंद झाले. त्यामुळे रब्बीच्या नियोजनातील पाणी शिल्लक आहे. उन्हाळ्यात तीन आवर्तनांच्या पाण्यास धक्का न लावता रब्बीच्या शिल्लक पाण्यातून १० ते १५ फेब्रुवारी २०२१ च्या दरम्यान शेतकऱ्यांना आवर्तन द्यावे. म्हणजे, शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच प्रस्तावित उन्हाळी हंगामासाठीच्या आवर्तनाच्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात, जेणेकरून उन्हाळी हंगामासाठी शेतकरी आपले बारमाही पिकांचे नियोजन करू शकतील.