शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"नागरी सेवा-सुविधा पुरवठा करा, अण्णाभाऊंच्या पुतळ्याचे अनावरण करा"

By रोहित टेके | Updated: March 27, 2023 18:19 IST

आरपीआयची मागणी : मुख्याधिकारी गोसावी यांना निवेदन

कोपरगाव (जि. अहमदनगर ): शहरात नगरपरिषदेकडून सध्या पाणीपट्टी, घरपट्टीची अन्यायकारक वसुली होत आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाचे दुरुस्तीचे अर्धवट कामासह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नवीन बसवलेल्या पूर्णकृती पुतळ्यास तडा गेलेला असून त्यांची दुरुस्ती करून त्याचा अनावरण सोहळा करण्याबरोबरच विविध मागण्याचे आरपीआयच्या वतीने सोमवारी (दि.२७) कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हंटले, कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात गोरगरीब व सर्वसामान्य लोक राहतात. अशुद्ध व दुर्गंध युक्त पाणी पुरवठा केला जात आहे. वर्षातून केवळ ५० दिवसच पाणी ते मिळत आहे. स्वच्छ पाणी, आरोग्याच्या सुविधा, रोगराई आजार वाढू नये म्हणून औषध फवारणी, चांगली रस्ते, धुळ रहित गाव अशा अनेक सुविधा अजूनही देऊ शकलेलं नाही आणि दुसरीकडे बळजबरीने घरपट्टी पाणीपट्टी वसूल करत आहे ही अन्यायकारक वागणूक नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना अपेक्षित नाही. नगरपालिकेने चांगले कामे करावी, हातावरचे गोरगरीब नागरिक सुद्धा स्वतःहून सर्व पट्टी भरेल. याचा नगरपालिकेने गांभीर्यपूर्वक विचार करावा अन्यथा मोठ्या प्रमाणात नागरिकांना घेऊन महिला भगिनींना घेऊन नगरपालिकेत आम्ही ठिय्या आंदोलन करणार असल्याचेही निवेदनात म्हंटले आहे. यावेळी आरपीआयचे प्रदेश राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, सचिव दीपक गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, जिल्हा सचिव मनोज काळे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली सोनवणे, कोपरगाव तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे, तालुका उपाध्यक्ष फकीरा चंदनशिव, शहर प्रमुख रामदास कोपरे, अनिस शेख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMuncipal Corporationनगर पालिका