शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

पक्षातील योगदान सिद्ध करा

By admin | Updated: July 13, 2016 00:36 IST

अहमदनगर : पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चिंता कुणी करू नये, आपापले तालुके सांभाळा, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत प्रत्येकाला पक्षातील योगदान सिध्द करावे लागेल,

अहमदनगर : पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची चिंता कुणी करू नये, आपापले तालुके सांभाळा, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत प्रत्येकाला पक्षातील योगदान सिध्द करावे लागेल, तरच पदे मिळतील, असे माजी विधानसभा अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते दिलीप वळसे यांनी मंगळवारी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावले़ तसेच उठसूठ विरोधकांवर टीका करणाऱ्यांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला़राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते़ जिल्ह्यातील पक्षबांधणीवर वळसे यांनी नाराजी व्यक्त केली़ दुष्काळात शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले, या बहुतांश नेत्यांनी मारलेल्या फुशारकीवर वळसे यांनी थेट भाष्य केले़ ते म्हणाले, सामान्य माणसाच्या मदतीला धावून जाण्याची पक्षाची संस्कृती आहे़ सामान्यांच्या प्रश्नासाठी एकत्रित लढा उभारला जाणार असून, प्रत्येकाने जबाबदारीने काम करा, ज्यांना पदे मिळाली (आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, जि़ प़ सदस्य, बाजार समिती सदस्य,माजी आमदार आदी पदे) त्यांनी पदाचा उपयोग पक्षासाठी केला का? पदाच्या माध्यमातून पक्ष कार्यकर्त्यांची कोणती महत्वाची कामे तडीस नेली़ पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्याला बळ दिले़ तालुक्यात पक्ष वाढीसाठी काय कार्य केले, याचा हिशोब आता पक्षाला द्यावा लागणार आहे, असे सांगून हा मुद्दा महत्वाचा आहे, याची नोंद करून ठेवा, असे सांगण्यास वळसे विसरले नाहीत़ वळसे यांच्या आक्रमक भाषणामुळे सभागृहात काहीवेळ स्मशान शांतता पसरली़ बैठकीत बोटावर मोजण्या इतक्याच नेत्यांना भाषणाची संधी मिळाली़ त्यात राजेंद्र फाळके यांनी महादेव जाणकरांनी अजित पवार यांची औकात काढली, त्यांच्या निषेध करा, असा ठराव मांडला़ त्यावर नेत्यांची आणि विरोधकांची चिंता तुम्ही करू नका, ते सक्षम आहेत, तुम्ही फक्त पक्षाचे काम नेटाने करा़ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला वेळ आहे़ पण, जिल्ह्यातील आठ महत्वाच्या पालिकांच्या निवडणुका आहेत, त्यांची मोर्चेबांधणी करा, असे सांगून वळसे यांनी व्यासपीठावर कटाक्ष टाकत काका, दादा आपल्याही नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी तालुक्याला जावे लागेल, असे सांगितले़ केवळ भाषण ठोकून काहीही साध्य होणार नाही, असे सुनावत साधे एक कामे दिले ते पूर्ण होत नाही़ प्रत्येक तालुक्यात पक्षाचे किती कार्यकर्ते आहेत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ प्रश्नाचे उत्तर एकानेही दिले नाही़ वळसे यांनीच पुन्हा किती शंभर आहेत का? असा प्रश्न केला़ त्यावर मात्र सर्वच नेत्यांनी माना डोलवून होकार दिला़ जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, आमदार अरुणकाका जगताप, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, पांडुरंग अभंग, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, आ़ राहुल जगताप, विठ्ठलराव लंघे, संग्राम कोते, राजेंद्र फाळके, अरुण कडू, प्रताप ढाकणे, सुजित झावरे, शिवाजी गाडे आदी यावेळी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)यंदा नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार आहे़ त्यामुळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष, अशा दोन्ही आघाड्यांवर पक्षाला काम करावे लागेल़ नगराध्यक्ष पदासाठी कुणी सांगितले म्हणून अमुक एकाला उमेदवारी दिली, असे होणार नाही़ त्याची लोकप्रियता किती आहे, याचा विचार करून सक्षम उमेदवारालाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे वळसे यांनी यावेळी जाहीर केले़ बैठकीनंतर श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, राहुरी, संगमनेर, देवळाली प्रवरा आणि शिर्डी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी पालिकांच्या निवडणूक संदर्भात बंद खोलीत चर्चा केली़