शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

घरावर काळे झेंडे लावत महाआघाडी सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST

तालुक्यातील कळस येथील मराठा महासंघाचे कार्यकर्ते भाऊसाहेब पुंजा वाकचौरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने १०२ व्या घटनादुरुस्तीचा हवाला देत ...

तालुक्यातील कळस येथील मराठा महासंघाचे कार्यकर्ते भाऊसाहेब पुंजा वाकचौरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने १०२ व्या घटनादुरुस्तीचा हवाला देत मराठा आरक्षण रद्दबादल केले. राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे लाखो मराठा युवकांचे भवितव्य धोक्यात आले. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा निर्णय हा १४ व्या घटनादुरुस्तीपूर्वीचा असल्याने हे पुराव्यानिशी न्यायालयाला पटवून देण्यात सरकारला यश मिळाले होते. मग तेच पुरावे, तेच वकील राज्य सरकार बदलल्यानंतर न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडण्यात अपयशी का ठरले, हाच खरा प्रश्न आहे.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार तब्बल १० वर्षे सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे या पक्षातील दिग्गज नेत्यांना कधीही वाटले नाही.

फडणवीसांनी मराठा आंदोलनाला अत्यंत संयमाने हाताळले.

१९८१ पासून राज्यात कोणाची सत्ता होती? १९९३ ला ओबीसी १४ टक्केवरून ३० टक्के आरक्षण कोणी वाढवले? १९९५ ला शंभरच्या वर जाती कमिशनचा रिपोर्ट नसताना ओबीसीत कोणी घातला? २००८ ला बापट कमिशन कोणाच्या काळात झाले? २०१४ ला ईएसबीसी मराठा आरक्षण अध्यादेश कोणाच्या काळात झाला? तेव्हा आयोगाच्या शिफारशी का घेतल्या नाहीत? एवढी वर्षे मराठा आरक्षण प्रश्न का सोडवला नाहीत? आघाडीच्या काळात एका तरी आयोगाचा रिपोर्ट मराठा आरक्षण द्या म्हणून आला का? युती सरकारच्या काळात गायकवाड आयोग नेमला तेंव्हा सेना सोबत सत्तेत होती ना? उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवताना बाजू भक्कम मांडली तेंव्हा ते टिकले ना? आता सर्वोच्च न्यायालयात तुम्ही आरक्षण टिकवले नाहीत म्हणून आरक्षण देणारे दोषी कसे? विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एखादी विशेष समिती गठीत केली असती आणि त्यांना विशेषाधिकार दिले असते तर त्यांनी गेल्या वेळीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवून दाखविले असते.

१४ अकोले