शहरं
Join us  
Trending Stories
1
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
2
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
3
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
4
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
5
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
6
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
7
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
8
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
9
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
10
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
11
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
12
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली
13
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
14
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
15
Navratri 2025: देवीचे वाहन सिंह आणि लक्ष्मीचे घुबड का? त्यामागे आहे महत्त्वपूर्ण कारण!
16
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
17
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
18
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
19
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
20
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?

१९ कारखान्यांचे गाळपासाठी प्रस्ताव

By admin | Updated: September 30, 2014 23:21 IST

अहमदनगर : दुष्काळाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाऱ्यासाठी उसाचा वापर झाला. यामुळे जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या उसापैकी साधारण २० ते २५ टक्के ऊस संपला आहे.

अहमदनगर : दुष्काळाच्या काळात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाऱ्यासाठी उसाचा वापर झाला. यामुळे जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या उसापैकी साधारण २० ते २५ टक्के ऊस संपला आहे. याचा परिणाम गाळपावर होण्याची शक्यता असली तरी शंभर लाख मेट्रीक टन उसाचे गाळप होण्याची शक्यता सहसंचालक साखर यांच्या कार्यालयाकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, १९ कारखान्यांकडून गाळप परवान्यासाठी सहसंचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर झाले आहेत. जिल्ह्यात पारनेर आणि नगर वगळता १४ सहकारी व ६ खासगी असे २० साखर कारखाने आहेत. या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात यंदा पावसाअभावी उसाची टंचाई जाणवणार आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १ लाख २२ हजार हेक्टर उसाचे क्षेत्र गृहीत धरण्यात आलेले आहे. या क्षेत्रातून शंभर लाख मेट्रीक टन गाळप होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी विभागात २० कारखान्यांनी केलेल्या गाळपात ९२ लाख ९२ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले होते. साधारण जानेवारी ते मार्च २०१३ या दरम्यान झालेली गारपीट आणि त्यानंतर निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा फटका शेतात उभ्या असणाऱ्या उसाला बसला. यामुळे उपलब्ध उसापैकी सुमारे २० ते २५ टक्के ऊस संपला आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामासाठी ३७ हजार ९१७ हेक्टरवर आडसाली, ३३ हजार ४०५ पूर्वहंगामी, ४६ हजार ४६३ सुरू आणि ६० हजार २१४ खोडवा आहे. यंदा परिस्थिती विपरीत होती. जुलै महिन्यापर्यंत चाऱ्यासाठी उसाचा वापर करण्यात आला. यामुळे सर्व कारख्यान्यांच्या कार्यक्षेत्रात कमी अधिक उभ्या उसाचे क्षेत्र घटले आहे. याचा परिणाम गाळपावर होणार आहे. अशा परिस्थितीत शंभर मेट्रीक टन गाळप होईल असा अंदाज प्रादेशिक सहसंचालक विभागाला आहे. १९ कारखान्यांकडून गाळप परवान्यासाठी सहाय्यक संचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर केलेले आहेत. यातून १२ प्रस्ताव साखर आयुक्त पुणे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. उर्वरित कारखान्यांच्या प्रस्तावात त्रुटी असल्याने त्यांची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यात साधारण १५ आॅक्टोबरपर्यंत सर्व कारखान्यांचे बॉयलर पेटणार आहेत. (प्रतिनिधी)