शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

लघुपट, माहितीपट निर्मितीला हवे निर्मात्यांचे पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 14:10 IST

अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उच्च प्रतिचा कॅमेरा असणारे मोबाईल, कॅमेरा आवाक्यात आणि सहज बाजारात उपलब्ध होत असल्याने आजकालच्या तरूणांना मनाला भावलेला आणि वेगळा वाटणारा विषय चित्रीत करायला जास्त आवडतो. त्यामुळे आजच्या युवकांचा लघुपट आणि माहितीपट निर्मितीकडे कल वाढताना दिसत आहे. हे करताना तरुणांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतो. यासाठी निर्मात्यांकडून पाठबळ मिळायला हवे.

अभिव्यक्ती ही मानवी जीवनाची महत्त्वाची गरज आहे. आपल्या मनाला भावलेल्या, अनुभवलेल्या आणि आपण अभ्यासलेल्या अनेक गोष्टी आणि आपले विचार लोकांपुढे मांडण्यासाठी प्रत्येक जण आज प्रयत्नशील असतो. त्यासाठी तो वेगवेगळी मार्ग निवडत असतो, कविता, लेख, चित्र अशा वेगवेगळ्या माध्यमातून तो आपला विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी धडपडत असतो. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे उच्च प्रतिचा कॅमेरा असणारे मोबाईल, कॅमेरा आवाक्यात आणि सहज बाजारात उपलब्ध होत असल्याने आजकालच्या तरूणांना मनाला भावलेला आणि वेगळा वाटणारा विषय चित्रीत करायला जास्त आवडतो. त्यामुळे आजच्या युवकांचा लघुपट आणि माहितीपट निर्मितीकडे कल वाढताना दिसत आहे. एखाद्या घटनेबद्दल आणि हकिकतीबद्दल वास्तव माहिती दर्शविणारा चित्रपट म्हणजे माहितीपट. याची निर्मिती प्रक्रिया संशोधनावर आधारित असल्याने ते खात्रीशीर आणि ऐतिहासिक ठेवा बनतात. माहितीपट बनविण्यासाठी कुठलेही बंदिस्त स्वरूप नाही आणि त्यासाठी वेळेची मर्यादाही नाही. उत्तम माहितीपट बनविण्यासाठी निवडलेल्या विषयाच्या संदर्भात असणारे साहित्य, अभ्यासक, त्यागोष्टी अनुभवणारे वेगवेगळे लोक यांच्याव्दारे माहिती मिळवून संशोधन करणे, त्याची मांडणी करून चित्रीकरण करणे, मुलाखती घेणे आणि सर्व जमवलेल्या माहितेचे संकलन करणे अशा प्रकारची प्रक्रिया केली जाते. महाविद्यालयीन जीवनामध्ये माहितीपट बनविण्याची इच्छा असंख्य तरुणांमध्ये पहाण्यास मिळते. सांस्कृतिक आणि कलेचा वारसा असलेल्या नगर शहरामध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने ग्रामीण संस्कृती, परंपरा, जगण्यातली वेगळे अनुभव यांची सांगड घालून वेगवेगळे विषय मांडणारे माहितीपट ते प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येताना दिसतात. वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे विविध शहरांमध्ये आयोजित होत असल्याने अनेक माहितीपट प्रेक्षकांना अभ्यासता आणि अनुभवायला मिळतात.अहमदनगरसारख्या शहरात शिकणारा विद्यार्थी ग्रामीण भागातला असला तरी समाजामधील अनेक दुर्लक्षित प्रश्न माहितीपटाच्या माध्यमातून मांडण्यासाठी धडपडताना दिसतो. परंतू निर्मितीसाठी लागणाºया अनेक तांत्रिक गोष्टी इथे सहज उपलब्ध होत नसल्याने त्यांना अनेक आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे निर्मात्यांनी त्यांच्या पाठिशी उभा राहून प्रोत्साहन दिले तर नक्कीच नवीन दिग्दर्शक आणि विद्यार्थी वेगवेगळे विषय माहितीपटाद्वारे मांडू शकतील.आजही आपल्या समाजामध्ये असणारे अनेक घटक संस्कृती, परंपरा, कला दुर्लक्षित आणि अडगळीला पडलेल्या आहेत. त्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचा कायम माझा प्रयत्न असतो. आदिवासी संस्कृतीचा अभ्यास करीत असताना त्या लोकांचे जीवन, निसर्गाविषयी असणारा आदर, परंपरा, कला त्यांचे जगण्यातले अनेक प्रश्न पाहता हे वास्तव जगापुढे आणणे मला जास्त गरजेचे वाटत होते. याचे सादरीकरण वास्तववादी असावे म्हणून ही 'पडाळ' नावाचा माहितीपट मी बनविला. यातून आदिवासींच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. अनेक राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात याचे सादरीकरणही करण्यात आले. चित्रीकरणाच्या वेळी अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. या समस्यांवर मात करायची असेल तर निर्मार्त्यांनी लघुपट, माहितीपट निर्मितीला भक्कम पाठबळ द्यायला हवे. यातून समाज जीवनातील सत्य, वास्तव स्वरुपातील प्रश्न सुटण्यास निश्चित मदत होईल, असे मला वाटते. यापुढेही वेगळे आणि दुर्लक्षित विषय प्रेक्षकांच्या भेटीला येतील, यात शंका नाही.

-शुभम राजेंद्र तांगडे,  लेखक, दिग्दर्शक. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcinemaसिनेमा