शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेआधी ‘निळवंडे’च्या निधीचा निर्णय

By admin | Updated: August 10, 2014 23:29 IST

शिर्डी : निळवंडे कालव्यांच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत राज्य शासन आचारसंहिता लागण्यापूर्वी सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली़

शिर्डी : जिरायत भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत राज्य शासन आचारसंहिता लागण्यापूर्वी सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली़ गोदावरी आणि निळवंडे कालव्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता केंद्राच्या निधीच्या तरतुदीवरच अवलंबून न राहाता शिर्डी संस्थान किंवा कर्ज रोख्यांच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करू किं वा यासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करील, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले़ खडकेवाके येथे उभारलेल्या फळे, भाजीपाला निर्यात सुविधा व प्रक्रिया केंद्राचा लोकार्पण सोहळा रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला़ यावेळी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. केंद्राचा निधी मिळवण्यासाठी एआयडीपीच्या सोळा परवानग्या मिळाल्या आहेत़ उर्वरित एक-दोन परवानग्यासाठी आपण केंद्राकडे पाठपुरावा करणार आहोत़ त्यानंतर केंद्राचा नव्वद टक्के निधी मिळू शकेल, असे ते म्हणाले. तत्पूर्वी या कार्यक्रमात कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी निळवंडे कालव्यांच्या निधीसाठी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली़ साईसमाधी शताब्दीसाठी पाण्याची आवश्यकता असून बंद पाईपद्वारे निळवंडे धरणातील पाणी आणतांना शिर्डी बरोबरच दुष्काळी गावातील पाणी योजनांनाही याचा उपयोग होईल,यासाठी संस्थानकडून कर्जाऊ पाचशे कोटी रूपये घेता येतील, असेही विखे यांनी सुचवले़ शिवाय सध्या गोदावरीचा ओेव्हरफ्लो सुरू असून यातून पिण्याबरोबरच शेतीसाठीही आवर्तन सोडावे, अशी मागणीही विखे यांनी केली़ याप्रसंगी पणन राज्यमंत्री सुरेश धस, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे आदी उपस्थित होते़(तालुका प्रतिनिधी) आंदोलकांना अटक...निळवंडे कालव्यांना निधी मिळावा यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलने करणाऱ्या निळवंडे कालवे कृती समितीचे नानासाहेब शेळके, नानासाहेब जवरे आदींसह काही कार्यकर्ते सभामंडपात उपस्थित होते़ यावेळी पोलिसांनी घोषणाबाजीची शक्यता लक्षात घेऊन त्यांना बाहेर जाण्यास सांगितले़ याला नकार देताच पोलिसांनी लाठीमार करून कार्यकर्त्यांना बाहेर नेले़ यानंतर कृषिमंत्री विखे यांनी या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणली़ मुख्यमंत्री व विखे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत निळवंडे संदर्भात त्यांचे म्हणणे ऐकून घेतले़ यानंतर जवळपास पंधरा ते वीस कार्यकर्त्यांना अटक करून श्रीरामपूर येथे हलवण्यात आले़