शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
3
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
5
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
6
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
7
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
8
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
9
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
10
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
11
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
12
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
13
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
14
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
15
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
16
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
17
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
18
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
19
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
20
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल

आचारसंहितेआधी ‘निळवंडे’च्या निधीचा निर्णय

By admin | Updated: August 10, 2014 23:29 IST

शिर्डी : निळवंडे कालव्यांच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत राज्य शासन आचारसंहिता लागण्यापूर्वी सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली़

शिर्डी : जिरायत भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे कालव्यांच्या कामांसाठी आवश्यक असलेल्या निधीबाबत राज्य शासन आचारसंहिता लागण्यापूर्वी सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली़ गोदावरी आणि निळवंडे कालव्यांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याकरिता केंद्राच्या निधीच्या तरतुदीवरच अवलंबून न राहाता शिर्डी संस्थान किंवा कर्ज रोख्यांच्या माध्यमातून आर्थिक तरतूद करू किं वा यासाठी राज्य सरकार निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करील, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले़ खडकेवाके येथे उभारलेल्या फळे, भाजीपाला निर्यात सुविधा व प्रक्रिया केंद्राचा लोकार्पण सोहळा रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला़ यावेळी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. केंद्राचा निधी मिळवण्यासाठी एआयडीपीच्या सोळा परवानग्या मिळाल्या आहेत़ उर्वरित एक-दोन परवानग्यासाठी आपण केंद्राकडे पाठपुरावा करणार आहोत़ त्यानंतर केंद्राचा नव्वद टक्के निधी मिळू शकेल, असे ते म्हणाले. तत्पूर्वी या कार्यक्रमात कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी निळवंडे कालव्यांच्या निधीसाठी ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी केली़ साईसमाधी शताब्दीसाठी पाण्याची आवश्यकता असून बंद पाईपद्वारे निळवंडे धरणातील पाणी आणतांना शिर्डी बरोबरच दुष्काळी गावातील पाणी योजनांनाही याचा उपयोग होईल,यासाठी संस्थानकडून कर्जाऊ पाचशे कोटी रूपये घेता येतील, असेही विखे यांनी सुचवले़ शिवाय सध्या गोदावरीचा ओेव्हरफ्लो सुरू असून यातून पिण्याबरोबरच शेतीसाठीही आवर्तन सोडावे, अशी मागणीही विखे यांनी केली़ याप्रसंगी पणन राज्यमंत्री सुरेश धस, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे आदी उपस्थित होते़(तालुका प्रतिनिधी) आंदोलकांना अटक...निळवंडे कालव्यांना निधी मिळावा यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलने करणाऱ्या निळवंडे कालवे कृती समितीचे नानासाहेब शेळके, नानासाहेब जवरे आदींसह काही कार्यकर्ते सभामंडपात उपस्थित होते़ यावेळी पोलिसांनी घोषणाबाजीची शक्यता लक्षात घेऊन त्यांना बाहेर जाण्यास सांगितले़ याला नकार देताच पोलिसांनी लाठीमार करून कार्यकर्त्यांना बाहेर नेले़ यानंतर कृषिमंत्री विखे यांनी या कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणली़ मुख्यमंत्री व विखे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत निळवंडे संदर्भात त्यांचे म्हणणे ऐकून घेतले़ यानंतर जवळपास पंधरा ते वीस कार्यकर्त्यांना अटक करून श्रीरामपूर येथे हलवण्यात आले़