शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

पालेभाज्यांचे दर पुन्हा वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:24 IST

अहमदनगर : जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. बाजारात आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे भावही कमी झाले आहेत. ...

अहमदनगर : जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. बाजारात आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे भावही कमी झाले आहेत. मात्र तीन आठवड्यांपासून पावसाने दडी दिल्याने महिनाभरापूर्वी लागवड केलेल्या भाज्या आता सुकल्या आहेत. परिणामी बाजारात पालेभाज्यांची आवक कमी होत असून भाज्यांचे दर पुन्हा वाढत आहेत.

अहमदनगर शहरात गेल्या १५ दिवसांमध्ये भाज्यांचे दर खूपच कमी झाले होते. पालेभाज्यांच्या जुड्या ५ ते १० रुपयांनाच मिळत होत्या. इतर भाज्याही स्वस्त झाल्या होत्या. नगर शहरात कोणत्याही बाजारात गेले तरी स्वस्त भाजी झाल्याने नागरिक सुखावले होते. मात्र सध्या पावसाने पाठ फिरवली आहे. काही भाज्या सुकल्या आहेत. उत्पादन कमी झाल्याने आवकही कमी झाली आहे. त्यात उपलब्ध भाजीपाला इतर जिल्ह्यात जात असल्याने दर वाढले आहेत. त्यामुळे पालेभाज्या ५ रुपयांनी महाग झाल्या आहेत.

-----------

पालेभाज्यांचे भाव (प्रतिजुडी)

भाजी जून ऑगस्ट

मेथी १० २०

कोथिंबिर १० १५

पालक २० १५

चुका १० १५

पुदिना १० २०

शेपू १० ५

बटाटे १५ २०

----

विक्रेते म्हणतात..

सध्या मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक कमी आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. आधीच कमी भाज्या, त्यात परजिल्ह्यात माल जात असल्याने आता पुन्हा भाज्यांचे दर वाढत आहेत.

- नरेंद्र देशमुख, सावेडी

---------

पाऊस असला की भाज्यांचे दर कमी होतात. सध्या पाऊस नसल्याने महिनाभरापूर्वी लागवड केलेल्या भाज्यांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाज्यांचे दर वाढले आहेत.

-शरद बोबडे, पाईपलाईन रोड

------