शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

पालेभाज्यांचे दर पुन्हा वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:24 IST

अहमदनगर : जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. बाजारात आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे भावही कमी झाले आहेत. ...

अहमदनगर : जून-जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्याने भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. बाजारात आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे भावही कमी झाले आहेत. मात्र तीन आठवड्यांपासून पावसाने दडी दिल्याने महिनाभरापूर्वी लागवड केलेल्या भाज्या आता सुकल्या आहेत. परिणामी बाजारात पालेभाज्यांची आवक कमी होत असून भाज्यांचे दर पुन्हा वाढत आहेत.

अहमदनगर शहरात गेल्या १५ दिवसांमध्ये भाज्यांचे दर खूपच कमी झाले होते. पालेभाज्यांच्या जुड्या ५ ते १० रुपयांनाच मिळत होत्या. इतर भाज्याही स्वस्त झाल्या होत्या. नगर शहरात कोणत्याही बाजारात गेले तरी स्वस्त भाजी झाल्याने नागरिक सुखावले होते. मात्र सध्या पावसाने पाठ फिरवली आहे. काही भाज्या सुकल्या आहेत. उत्पादन कमी झाल्याने आवकही कमी झाली आहे. त्यात उपलब्ध भाजीपाला इतर जिल्ह्यात जात असल्याने दर वाढले आहेत. त्यामुळे पालेभाज्या ५ रुपयांनी महाग झाल्या आहेत.

-----------

पालेभाज्यांचे भाव (प्रतिजुडी)

भाजी जून ऑगस्ट

मेथी १० २०

कोथिंबिर १० १५

पालक २० १५

चुका १० १५

पुदिना १० २०

शेपू १० ५

बटाटे १५ २०

----

विक्रेते म्हणतात..

सध्या मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक कमी आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव वाढले आहेत. आधीच कमी भाज्या, त्यात परजिल्ह्यात माल जात असल्याने आता पुन्हा भाज्यांचे दर वाढत आहेत.

- नरेंद्र देशमुख, सावेडी

---------

पाऊस असला की भाज्यांचे दर कमी होतात. सध्या पाऊस नसल्याने महिनाभरापूर्वी लागवड केलेल्या भाज्यांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाज्यांचे दर वाढले आहेत.

-शरद बोबडे, पाईपलाईन रोड

------