शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

विधानसभेचे अध्यक्षपद कॉंग्रेसकडेच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST

अहमदनगर : विधिमंडळाच्या सोमवारी पार पडलेल्या अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी चांगले काम केले आहे. ...

अहमदनगर : विधिमंडळाच्या सोमवारी पार पडलेल्या अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी चांगले काम केले आहे. याचा अर्थ विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला किंवा भास्कर जाधव यांना देण्याचा कोणताही विचार नाही. काँग्रेसमध्येही अनेक भास्कर जाधव आहेत, असे सांगत विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

महसूलमंत्री थोरात यांनी शनिवारी अहमदनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून जाधव यांच्या कामाचे सध्या कौतुक होत आहे. त्यानंतर त्यांना अध्यक्षपद देण्याची चर्चा सुरू आहे. तसेच वनमंत्री संजय राठोड यांच्या रिक्त जागेवर काँग्रेसला मंत्रीपद व शिवसेनेला अध्यक्षपद देण्याबाबत चर्चा सुरू आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, जाधव यांनी अधिवेशनात चांगलेच काम केले. म्हणून त्यांनाच हे पद द्यावे, असे काही नाही. काँग्रेसमध्येही सक्षमपणे काम करू शकणारे नेते आहेत. शिवाय जागा वाटपात हे पद काँग्रेसकडे आहे. त्यामध्ये बदल करण्यासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही. तसा कोणताही विचार नाही. अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशात होऊ शकली नाही. त्यासाठी बरीच मोठी प्रक्रिया आहे. त्यात कोरोनामुळे अधिवेशन दोनच दिवसांचे होते. दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. शुक्रवारी मी आणि मंत्री नितीन राऊत आपापल्या कामासाठी दिल्लीत होतो. अध्यक्षपद निवड किंवा अदलाबदलीच्या विषयांचा या दौऱ्याशी कोणताही संबंध नव्हता. पूर्वी माझ्या एकट्यावरच कामाचा ताण जास्त होता. पक्षातील आणि सरकारमधीलही महत्त्वाची पदे आणि जबाबदाऱ्या माझ्याकडेच होत्या. त्यामुळे पक्षाने तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांना त्या पदाचा राजीनामा देऊन प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. यामुळे या पदावरील पक्षाचा दावा गेलेला नाही. अध्यक्षपद काँग्रेसकडेच असून जेव्हा निवडणूक होईल, त्यावेळी त्या पदावर सक्षम नेता दिला जाईल. तसे उमेदवार आमच्या पक्षात आहेत, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

----------

इंधन दरवाढीने अटलबिहारींचा आत्मा दुखावला असेल

देशात काँग्रेसची सत्ता असताना पेट्रोलचे दर सात पैशांनी वाढले होते. त्यावेळी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी लोकसभेवर बैलगाडीचा मोर्चा काढला होता. तोच व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. आज शंभर रुपयांच्या पुढे पेट्रोल गेल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांचा आत्मा दुखावला असेल, असे सांगत थोरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली. महागाईमुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात कोरोनाची स्थिती भयावह होती. नाशिकचा अपघात वगळता राज्यात कोरोना नियंत्रणात सरकारला मोठे यश आल्याचे ते म्हणाले.

------------

सहकार मंत्रालयाचा हेतू समजला नाही

केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आले आहे. या खात्याचा हेतू मात्र कळाला नाही. रिझर्व्ह बँकेचे सर्वच बँकांवर यापुढील काळात नियंत्रण राहणार आहेत. चेअरमन, संचालक यांचे अधिकार कमी करून टाकले आहेत. हे मात्र सहकाराच्या तत्त्वाला धरून नाही. त्यांचे काही चुकले असेल तर शिक्षा झाली पाहिजे. मात्र, सहकार टिकला पाहिजे. नव्या मंत्रालयामुळे सहकार अधिक टिकला तर चांगलेच आहे, असे थोरात म्हणाले.