शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार शिगेला; अमित शहा, शरद पवार यांच्या शनिवारी सांगता सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 13:34 IST

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार शनिवारी (दि़ १९) सायंकाळी ५ वाजता संपणार आहे़. प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक ...

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार शनिवारी (दि़ १९) सायंकाळी ५ वाजता संपणार आहे़. प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत़. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत- जामखेड मतदारसंघातील प्रचाराचा समारोप केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेने होणार आहे़. दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या या सांगता सभेकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे़. कर्जत -जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ केंद्रीयमंत्री अमित शहा यांची शनिवारी दुपारी कर्जत येथे सभा होत आहे़. राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची कर्जत येथे सकाळी सभा आहे़. अन्य मतदारसंघात प्रचाराने जोर धरला आहे़. प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे़. ज्या भागात आपण पोहोचू शकलो नाही, तिथे जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांचा भर आहे़. काहींनी शेवटच्या दिवशी रॅली काढून शक्तिप्रदर्शन करण्याचे नियोजन केले आहे़. उमेदवारांकडून गावोगावी काढण्यात येणा-या प्रचार फे-यांनी वातावरण ढवळून निघाले आहे़.  सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेला प्रचाराचा दणदणाट रात्री दहापर्यंत कायम असतो़. सकाळच्या सत्रात पदयात्रा, दुपारी बैठका आणि सायंकाळी पुन्हा प्रचार फे-या, रात्री उशिरापर्यंत बैठका, अशी उमेदवारांची दिनचर्या आहे़. परंतु, प्रचाराला कमी वेळ राहिल्याने वेळेचा खुबीने वापर करीत शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याची काळजी घेतली जात आहे़. बहुतांश मतदारसंघात युवा संवाद, महिला मेळावा, ज्येष्ठांच्या मेळाव्यांची मांंदियाळी आहे़. निवडणुकीतील बॅलेटपेपरवरील क्रमांक आणि चिन्ह हे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध समाजाच्या बैठका, कॉर्नर सभा, मतदारांच्या गाठीभेटींना प्राधान्य दिले जात आहे़. शेवटच्या टप्प्यात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची धडपड सुरू आहे़. उमेदवाराला स्वत: ला ते शक्य नसले, तरी कार्यकर्ते नातेवाईक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत़. एकगठ्ठा मते असलेल्या भागात पुन्हा पुन्हा जाऊन संपर्कात राहण्याचे प्रयत्न सुरू आहेत़. प्रचाराचा धुरळा खाली बसल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांच्या बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे़.  

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019