शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

‘प्रवरा’ने सहकारासह सामाजिक बांधिलकी जपली

By admin | Updated: August 10, 2014 23:27 IST

प्रवरा मॉडेल हे खऱ्या अर्थाने सामाजिक वातावरण टिकवण्यास कारणीभूत ठरले आहे.

बाभळेश्वर : सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात उभे राहिलेले प्रवरा मॉडेल हे खऱ्या अर्थाने सामाजिक वातावरण टिकवण्यास कारणीभूत ठरले आहे. साहित्यिकांबरोबरच राज्य सरकारनेही सामाजिक बांधिलकीने घेतलेल्या निर्णयामुळे सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाची परंपरा टिकवून ठेवण्यात यश आले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११४ व्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून देण्यात येणारे साहित्य आणि कला गौरव पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मु. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री सुरेश धस, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार भाऊसाहेब कांबळे, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्कर खर्डे, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे आदी याप्रसंगी उपस्थित होते.पद्मश्री विखे पाटील यांच्या नावाने देण्यात येणारा साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार डॉ. म. सु. पाटील यांना, तर कलागौरव पुरस्कार मोमिन कौठेकर यांना प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार भारत सासणे, समाजप्रबोधन पुरस्कार महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास लहवीतकर, प्रवरा परिसर उत्कृष्ट साहित्य पुरस्कार सुदर्शन दहातोंडे, नाट्यसेवा पुरस्कार अनिल क्षीरसागर यांना मुख्यमंत्री चव्हाण आणि फ. मु. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ. विखे पाटलांनी सुरू केलेल्या सहकारी कारखानदारीचा आदर्श राज्यातील इतरांनी घेतला. साखर कारखानदारीबरोबरच शैक्षणिक संकुले उभी राहिल्याने या भागाचा विकास झाला. पद्मश्री विखे पाटलांनी ग्रामीण भागाचे आर्थिक नेतृत्व केले. त्यांची ही परंपरा पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी चालू ठेवली व आता ती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे चालवत आहेत, असे सांगत मंत्री विखे यांच्यामुळे कृषी व पणन खात्याला योग्य दिशा व नेतृत्व मिळाल्याचे चव्हाण म्हणाले. मुळा-प्रवरा वीज संस्थेचे कामगार, अंगणवाडी सेविका, कोतवाल, पोलीस पाटील, शिक्षण सेवक यांच्याही मागण्या मान्य करण्यात आल्या असून, त्या लवकरच पूर्ण केल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाळासाहेब विखे म्हणाले की, जिरायती भागासाठी वरदान असलेल्या निळवंडे प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेऊन दिलासा द्यावा. पाऊस नसल्याने खरीप वाया गेला असून, रब्बीची पेरणी अनेक ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.फ. मु. शिंदे यांनी एकमेकांचे दु:ख वाहून घेणे हा साहित्याचा धर्म असल्याचे सांगत कवितेच्या माध्यमातून राजकारणी व समाजकारणी कसे असतात याबाबत मार्मिक विवेचन केले. (वार्ताहर)