शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

‘प्रवरा’ने सहकारासह सामाजिक बांधिलकी जपली

By admin | Updated: August 10, 2014 23:27 IST

प्रवरा मॉडेल हे खऱ्या अर्थाने सामाजिक वातावरण टिकवण्यास कारणीभूत ठरले आहे.

बाभळेश्वर : सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात उभे राहिलेले प्रवरा मॉडेल हे खऱ्या अर्थाने सामाजिक वातावरण टिकवण्यास कारणीभूत ठरले आहे. साहित्यिकांबरोबरच राज्य सरकारनेही सामाजिक बांधिलकीने घेतलेल्या निर्णयामुळे सामाजिक, सांस्कृतिक वातावरणाची परंपरा टिकवून ठेवण्यात यश आले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ११४ व्या जयंती सोहळ्याचे औचित्य साधून देण्यात येणारे साहित्य आणि कला गौरव पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. फ. मु. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राज्यमंत्री सुरेश धस, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार भाऊसाहेब कांबळे, विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्कर खर्डे, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे पाटील, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे आदी याप्रसंगी उपस्थित होते.पद्मश्री विखे पाटील यांच्या नावाने देण्यात येणारा साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार डॉ. म. सु. पाटील यांना, तर कलागौरव पुरस्कार मोमिन कौठेकर यांना प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार भारत सासणे, समाजप्रबोधन पुरस्कार महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास लहवीतकर, प्रवरा परिसर उत्कृष्ट साहित्य पुरस्कार सुदर्शन दहातोंडे, नाट्यसेवा पुरस्कार अनिल क्षीरसागर यांना मुख्यमंत्री चव्हाण आणि फ. मु. शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पद्मश्री डॉ. विखे पाटलांनी सुरू केलेल्या सहकारी कारखानदारीचा आदर्श राज्यातील इतरांनी घेतला. साखर कारखानदारीबरोबरच शैक्षणिक संकुले उभी राहिल्याने या भागाचा विकास झाला. पद्मश्री विखे पाटलांनी ग्रामीण भागाचे आर्थिक नेतृत्व केले. त्यांची ही परंपरा पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी चालू ठेवली व आता ती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे चालवत आहेत, असे सांगत मंत्री विखे यांच्यामुळे कृषी व पणन खात्याला योग्य दिशा व नेतृत्व मिळाल्याचे चव्हाण म्हणाले. मुळा-प्रवरा वीज संस्थेचे कामगार, अंगणवाडी सेविका, कोतवाल, पोलीस पाटील, शिक्षण सेवक यांच्याही मागण्या मान्य करण्यात आल्या असून, त्या लवकरच पूर्ण केल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. डॉ. बाळासाहेब विखे म्हणाले की, जिरायती भागासाठी वरदान असलेल्या निळवंडे प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घेऊन दिलासा द्यावा. पाऊस नसल्याने खरीप वाया गेला असून, रब्बीची पेरणी अनेक ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.फ. मु. शिंदे यांनी एकमेकांचे दु:ख वाहून घेणे हा साहित्याचा धर्म असल्याचे सांगत कवितेच्या माध्यमातून राजकारणी व समाजकारणी कसे असतात याबाबत मार्मिक विवेचन केले. (वार्ताहर)