शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

महावितरणाच्या कार्यालयावर ‘प्रहार’चा आसूड मोर्चा

By चंद्रकांत शेळके | Updated: June 5, 2023 19:47 IST

प्रहार संघटनेकडून सोमवारी महावितरणाच्या कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला.

अहमदनगर: शेतकरी वर्गाला दिवसा बारा तास वीज देण्यात यावी, तसेच जे रोहित्र नादुरुस्त होतात, ते ४८ तासांत बदलून देण्यात यावेत, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी महावितरणाच्या कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, जिल्हा संघटक तुकाराम शिंगटे, विजय भंडारे, सुरेशराव लांबे, ऋषिकेश इरुळे, लक्ष्मीताई देशमुख, दादासाहेब काकडे, जयसिंग उगले, रामजी शिदोरे, सुदाम निकत, सुरेश सुपेकर, भगवान भोगाडे, सुरेशराव लांबे, मुकुंदराव आंधळे, रावसाहेब भोर, नानासाहेब पारधे, गोरक्ष पालवे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. असे असताना त्यांना वेळेवर वीज न मिळाल्याने पाणी असूनही त्यांची पिके वाया जातात. रात्री वीज असेल तर जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्यांना धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज गरजेची आहे. याशिवाय अनेक ठिकाणी वीजतारा लोंबकळलेल्या आहेत. आंबीलवाडी फाटा, वंदे मळा येथील रोहित्रांवर क्षमतेपेक्षा जास्त भार असून शेतामध्ये खांब वाकले आहेत. अनेक रोहित्रांची केबल जळालेली असून ते पावसाळ्याआधी बदलून मिळावी, अशा मागण्यांचे निवेदन पूर्वीच देण्यात आले होते. परंतु दखल न घेतल्याने प्रहार संघटनेकडून सोमवारी महावितरणाच्या कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. महावितरणचे आश्वासनयाबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व कामे होण्याबाबत लेखी आश्वासन दिले. निंबोडी गावठाण येथे नवीन रोहित्र तातडीने मंजूर करण्यात आले आहे. रोहित्राची केबल, वाकलेले खांब, तारांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करू. ठेकेदारांबरोबर तशा बैठका घेऊ, असे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmahavitaranमहावितरण