शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

कृषी अधीक्षकपदावरुन दोन मंत्र्यांची ताकद पणाला

By admin | Updated: March 17, 2016 23:43 IST

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर आपलाच माणूस बसविण्यासाठी दोन मंत्र्यांनी ताकद पणाला लावली आहे़

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर आपलाच माणूस बसविण्यासाठी दोन मंत्र्यांनी ताकद पणाला लावली आहे़ कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सध्याचे कृषी उपसंचालक आऱ के ़ गायकवाड यांना अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारण्याचे दिलेले आदेश गुंडाळून दुसऱ्या मंत्र्यांनी आपल्याच माणसाला खुर्चीवर बसविल्याची चर्चा कृषी विभागात खुलेआम सुरु आहे़तत्कालीन कृषी अधीक्षक अधिकारी अंकुश माने यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अकोला येथील रमेश गोसावी यांना पदोन्नती देण्यात आली़ मात्र, गोसावी हजर होताच त्यांना दमबाजी करुन रजेवर पाठविण्यात आले़ त्यांनी प्रारंभी १४ दिवसांची रजा घेतली होती़ मात्र, ते अद्याप रुजू झाले नाहीत़ त्यांच्या रिक्त जागेवर आत्माचे संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे हे यांची नियुक्ती झाली. मात्र, बऱ्हाटे यांना कोणताही आदेश नसताना ते या खुर्चीत बसून कारभार हाकीत आहेत़ कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या आदेशानुसार कृषी आयुक्तांनी कृषी उपसंचालक आऱ के ़ गायकवाड यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर नियुक्ती दिली़ मात्र, बऱ्हाटे हे गायकवाड यांच्याकडे पदभार देत नाहीत़ बऱ्हाटे यांना दुसऱ्या मंत्र्यांचा पाठिंबा आहे़ त्यामुळे बऱ्हाटे खुर्ची सोडत नाहीत, अशी चर्चा कृषी विभागात रंगली आहे़गोसावींना धमकी कोणी दिलीरजेवर गेलेले कृषी अधीक्षक गोसावी हे कृषीमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात़ माने यांच्या बदलीनंतर गोसावींना नगरला नियुक्ती दिली़ मात्र, गोसावी यांनी पदभार स्वीकारताच त्यांना दुसऱ्या मंत्र्याने दम भरला़ म्हणून ते रजेवर गेल्याची चर्चा कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आहे़ ही चर्चा चोरीछुपके नाही, हे विशेष!जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश भाऊसाहेब बऱ्हाटे यांना लेखी स्वरुपात दिले नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे़ याबाबत बऱ्हाटे यांना विचारले असता ते म्हणाले, कृषी आयुक्तांनी मला पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत़ हे आदेश दोघांनाही आहेत का असे विचारले असता बऱ्हाटे हो म्हणाले़कृषी कार्यालयात तोडफोडबुधवारी दुपारी तीन वाजता एका कर्मचाऱ्याने सीसीटीव्ही कॅमेरा तोडल्याची घटना घडली़ या घटनेलाही दोघा अधिकाऱ्यांमधील वर्चस्वाची झालर असल्याचे बोलले जात आहे़ बऱ्हाटे यांनी पदभार न सोडल्यास कृषी विभागात आता दंडुके घेऊन यावे लागेल, अशी परिस्थिती ओढावल्याचे कर्मचारी बोलत आहेत़