शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

कृषी अधीक्षकपदावरुन दोन मंत्र्यांची ताकद पणाला

By admin | Updated: March 17, 2016 23:43 IST

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर आपलाच माणूस बसविण्यासाठी दोन मंत्र्यांनी ताकद पणाला लावली आहे़

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर आपलाच माणूस बसविण्यासाठी दोन मंत्र्यांनी ताकद पणाला लावली आहे़ कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी सध्याचे कृषी उपसंचालक आऱ के ़ गायकवाड यांना अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारण्याचे दिलेले आदेश गुंडाळून दुसऱ्या मंत्र्यांनी आपल्याच माणसाला खुर्चीवर बसविल्याची चर्चा कृषी विभागात खुलेआम सुरु आहे़तत्कालीन कृषी अधीक्षक अधिकारी अंकुश माने यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अकोला येथील रमेश गोसावी यांना पदोन्नती देण्यात आली़ मात्र, गोसावी हजर होताच त्यांना दमबाजी करुन रजेवर पाठविण्यात आले़ त्यांनी प्रारंभी १४ दिवसांची रजा घेतली होती़ मात्र, ते अद्याप रुजू झाले नाहीत़ त्यांच्या रिक्त जागेवर आत्माचे संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे हे यांची नियुक्ती झाली. मात्र, बऱ्हाटे यांना कोणताही आदेश नसताना ते या खुर्चीत बसून कारभार हाकीत आहेत़ कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्या आदेशानुसार कृषी आयुक्तांनी कृषी उपसंचालक आऱ के ़ गायकवाड यांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर नियुक्ती दिली़ मात्र, बऱ्हाटे हे गायकवाड यांच्याकडे पदभार देत नाहीत़ बऱ्हाटे यांना दुसऱ्या मंत्र्यांचा पाठिंबा आहे़ त्यामुळे बऱ्हाटे खुर्ची सोडत नाहीत, अशी चर्चा कृषी विभागात रंगली आहे़गोसावींना धमकी कोणी दिलीरजेवर गेलेले कृषी अधीक्षक गोसावी हे कृषीमंत्र्यांच्या जवळचे मानले जातात़ माने यांच्या बदलीनंतर गोसावींना नगरला नियुक्ती दिली़ मात्र, गोसावी यांनी पदभार स्वीकारताच त्यांना दुसऱ्या मंत्र्याने दम भरला़ म्हणून ते रजेवर गेल्याची चर्चा कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये आहे़ ही चर्चा चोरीछुपके नाही, हे विशेष!जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश भाऊसाहेब बऱ्हाटे यांना लेखी स्वरुपात दिले नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे़ याबाबत बऱ्हाटे यांना विचारले असता ते म्हणाले, कृषी आयुक्तांनी मला पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत़ हे आदेश दोघांनाही आहेत का असे विचारले असता बऱ्हाटे हो म्हणाले़कृषी कार्यालयात तोडफोडबुधवारी दुपारी तीन वाजता एका कर्मचाऱ्याने सीसीटीव्ही कॅमेरा तोडल्याची घटना घडली़ या घटनेलाही दोघा अधिकाऱ्यांमधील वर्चस्वाची झालर असल्याचे बोलले जात आहे़ बऱ्हाटे यांनी पदभार न सोडल्यास कृषी विभागात आता दंडुके घेऊन यावे लागेल, अशी परिस्थिती ओढावल्याचे कर्मचारी बोलत आहेत़