शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतच्या ९० गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई : कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 18:12 IST

कर्जत तालुक्यात पावसाअभावी भीषण दुष्काळाची चाहूल लागू लागली आहे.

मिरजगाव : कर्जत तालुक्यात पावसाअभावी भीषण दुष्काळाची चाहूल लागू लागली आहे. तालुक्यात अनेक गावामध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचायत समितीने पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणी टंचाई जाणवणार आहे.तालुक्यात गेल्यावर्षी पाऊसच न झाल्याने पुढील आठ महिने भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. पंचायत समितीने तालुक्यातील भांबोरा हे गाव सोडल्यास ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणीटंचाई निवारण उपाययोजनांचा कृती आराखड्यात समावेश केला आहे. त्यावर सभापती व उपसभापती यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हा कृती आराखडा महसूल विभागाला सादर करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहे.दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी तालुका महसूल प्रशासनाने बैठक घेतली. या बैठकीत दुष्काळी स्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली. यावेळी प्रांतधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण पाटील, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी कुलदीप चौरे व सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.कर्जत तालुक्यातील नऊ गावांमध्ये सद्य:स्थितीत तीव्र पाणीटंचाई आहे. यामध्ये टाकळी खंडेश्वरी,पाटेगाव/हंडाळवाडी,खंडाळा, बहिरोबावाडी, नागमठाण, दिघी, कोभंळी,चापडगाव यांचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये सादर आहेत.कृती आराखड्यात पिण्याच्या पाण्यासाठी लागणाºया सर्व उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. कृती आराखड्यात सुचविलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याबाबत अडचणी येणार नाही याची दक्षता घेतली जाईल.-दत्तात्रय दराडे, गटविकास अधिकारी, कर्जत.

 

 

कर्जतच्या ९० गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई : कृती आराखडा तयारमिरजगाव : कर्जत तालुक्यात पावसाअभावी भीषण दुष्काळाची चाहूल लागू लागली आहे. तालुक्यात अनेक गावामध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचायत समितीने पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणी टंचाई जाणवणार आहे.तालुक्यात गेल्यावर्षी पाऊसच न झाल्याने पुढील आठ महिने भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. पंचायत समितीने तालुक्यातील भांबोरा हे गाव सोडल्यास ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणीटंचाई निवारण उपाययोजनांचा कृती आराखड्यात समावेश केला आहे. त्यावर सभापती व उपसभापती यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हा कृती आराखडा महसूल विभागाला सादर करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहे.दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी तालुका महसूल प्रशासनाने बैठक घेतली. या बैठकीत दुष्काळी स्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली. यावेळी प्रांतधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण पाटील, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी कुलदीप चौरे व सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.कर्जत तालुक्यातील नऊ गावांमध्ये सद्य:स्थितीत तीव्र पाणीटंचाई आहे. यामध्ये टाकळी खंडेश्वरी,पाटेगाव/हंडाळवाडी,खंडाळा, बहिरोबावाडी, नागमठाण, दिघी, कोभंळी,चापडगाव यांचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये सादर आहेत.कृती आराखड्यात पिण्याच्या पाण्यासाठी लागणाºया सर्व उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. कृती आराखड्यात सुचविलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याबाबत अडचणी येणार नाही याची दक्षता घेतली जाईल.-दत्तात्रय दराडे, गटविकास अधिकारी, कर्जत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत