शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

कर्जतच्या ९० गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई : कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 18:12 IST

कर्जत तालुक्यात पावसाअभावी भीषण दुष्काळाची चाहूल लागू लागली आहे.

मिरजगाव : कर्जत तालुक्यात पावसाअभावी भीषण दुष्काळाची चाहूल लागू लागली आहे. तालुक्यात अनेक गावामध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचायत समितीने पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणी टंचाई जाणवणार आहे.तालुक्यात गेल्यावर्षी पाऊसच न झाल्याने पुढील आठ महिने भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. पंचायत समितीने तालुक्यातील भांबोरा हे गाव सोडल्यास ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणीटंचाई निवारण उपाययोजनांचा कृती आराखड्यात समावेश केला आहे. त्यावर सभापती व उपसभापती यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हा कृती आराखडा महसूल विभागाला सादर करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहे.दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी तालुका महसूल प्रशासनाने बैठक घेतली. या बैठकीत दुष्काळी स्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली. यावेळी प्रांतधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण पाटील, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी कुलदीप चौरे व सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.कर्जत तालुक्यातील नऊ गावांमध्ये सद्य:स्थितीत तीव्र पाणीटंचाई आहे. यामध्ये टाकळी खंडेश्वरी,पाटेगाव/हंडाळवाडी,खंडाळा, बहिरोबावाडी, नागमठाण, दिघी, कोभंळी,चापडगाव यांचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये सादर आहेत.कृती आराखड्यात पिण्याच्या पाण्यासाठी लागणाºया सर्व उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. कृती आराखड्यात सुचविलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याबाबत अडचणी येणार नाही याची दक्षता घेतली जाईल.-दत्तात्रय दराडे, गटविकास अधिकारी, कर्जत.

 

 

कर्जतच्या ९० गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई : कृती आराखडा तयारमिरजगाव : कर्जत तालुक्यात पावसाअभावी भीषण दुष्काळाची चाहूल लागू लागली आहे. तालुक्यात अनेक गावामध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचायत समितीने पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणी टंचाई जाणवणार आहे.तालुक्यात गेल्यावर्षी पाऊसच न झाल्याने पुढील आठ महिने भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. पंचायत समितीने तालुक्यातील भांबोरा हे गाव सोडल्यास ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणीटंचाई निवारण उपाययोजनांचा कृती आराखड्यात समावेश केला आहे. त्यावर सभापती व उपसभापती यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हा कृती आराखडा महसूल विभागाला सादर करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहे.दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी तालुका महसूल प्रशासनाने बैठक घेतली. या बैठकीत दुष्काळी स्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली. यावेळी प्रांतधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण पाटील, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी कुलदीप चौरे व सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.कर्जत तालुक्यातील नऊ गावांमध्ये सद्य:स्थितीत तीव्र पाणीटंचाई आहे. यामध्ये टाकळी खंडेश्वरी,पाटेगाव/हंडाळवाडी,खंडाळा, बहिरोबावाडी, नागमठाण, दिघी, कोभंळी,चापडगाव यांचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये सादर आहेत.कृती आराखड्यात पिण्याच्या पाण्यासाठी लागणाºया सर्व उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. कृती आराखड्यात सुचविलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याबाबत अडचणी येणार नाही याची दक्षता घेतली जाईल.-दत्तात्रय दराडे, गटविकास अधिकारी, कर्जत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत