शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

कर्जतच्या ९० गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई : कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 18:12 IST

कर्जत तालुक्यात पावसाअभावी भीषण दुष्काळाची चाहूल लागू लागली आहे.

मिरजगाव : कर्जत तालुक्यात पावसाअभावी भीषण दुष्काळाची चाहूल लागू लागली आहे. तालुक्यात अनेक गावामध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचायत समितीने पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणी टंचाई जाणवणार आहे.तालुक्यात गेल्यावर्षी पाऊसच न झाल्याने पुढील आठ महिने भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. पंचायत समितीने तालुक्यातील भांबोरा हे गाव सोडल्यास ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणीटंचाई निवारण उपाययोजनांचा कृती आराखड्यात समावेश केला आहे. त्यावर सभापती व उपसभापती यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हा कृती आराखडा महसूल विभागाला सादर करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहे.दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी तालुका महसूल प्रशासनाने बैठक घेतली. या बैठकीत दुष्काळी स्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली. यावेळी प्रांतधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण पाटील, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी कुलदीप चौरे व सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.कर्जत तालुक्यातील नऊ गावांमध्ये सद्य:स्थितीत तीव्र पाणीटंचाई आहे. यामध्ये टाकळी खंडेश्वरी,पाटेगाव/हंडाळवाडी,खंडाळा, बहिरोबावाडी, नागमठाण, दिघी, कोभंळी,चापडगाव यांचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये सादर आहेत.कृती आराखड्यात पिण्याच्या पाण्यासाठी लागणाºया सर्व उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. कृती आराखड्यात सुचविलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याबाबत अडचणी येणार नाही याची दक्षता घेतली जाईल.-दत्तात्रय दराडे, गटविकास अधिकारी, कर्जत.

 

 

कर्जतच्या ९० गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई : कृती आराखडा तयारमिरजगाव : कर्जत तालुक्यात पावसाअभावी भीषण दुष्काळाची चाहूल लागू लागली आहे. तालुक्यात अनेक गावामध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचायत समितीने पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणी टंचाई जाणवणार आहे.तालुक्यात गेल्यावर्षी पाऊसच न झाल्याने पुढील आठ महिने भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. पंचायत समितीने तालुक्यातील भांबोरा हे गाव सोडल्यास ९० गावे व वाड्यांसाठी संभाव्य पाणीटंचाई निवारण उपाययोजनांचा कृती आराखड्यात समावेश केला आहे. त्यावर सभापती व उपसभापती यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर हा कृती आराखडा महसूल विभागाला सादर करण्यात येणार आहे.जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्यानंतर याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहे.दुष्काळी स्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी तालुका महसूल प्रशासनाने बैठक घेतली. या बैठकीत दुष्काळी स्थितीत करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली. यावेळी प्रांतधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार किरण पाटील, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी कुलदीप चौरे व सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.कर्जत तालुक्यातील नऊ गावांमध्ये सद्य:स्थितीत तीव्र पाणीटंचाई आहे. यामध्ये टाकळी खंडेश्वरी,पाटेगाव/हंडाळवाडी,खंडाळा, बहिरोबावाडी, नागमठाण, दिघी, कोभंळी,चापडगाव यांचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये सादर आहेत.कृती आराखड्यात पिण्याच्या पाण्यासाठी लागणाºया सर्व उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. कृती आराखड्यात सुचविलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याबाबत अडचणी येणार नाही याची दक्षता घेतली जाईल.-दत्तात्रय दराडे, गटविकास अधिकारी, कर्जत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत