शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शिष्यवृत्तीची परीक्षा स्थगित करा, अन्यथा बहिष्कार ; शिक्षक भारती संघटनेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 17:33 IST

कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शिक्षक भारतीने शासनाला पत्र देऊन विनंती केली आहे. मात्र शासनाकडून अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही.

अहमदनगर : कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ५ वी आणि ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, यासाठी शिक्षक भारतीने शासनाला पत्र देऊन विनंती केली आहे. मात्र शासनाकडून अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. जर परीक्षा पुढे ढकलली नाही तर शिक्षक भारती परीक्षेवर बहिष्कार टाकेल, अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.

परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षा २३ मे रोजी होणार असल्याचे जाहीर करून त्याची तयारी केली आहे. परीक्षेसाठी पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकांना पत्र पाठवली आहेत. कोरोनामुळे देशपातळीवरील प्रमुख परीक्षा पुढे ढकललेली असताना तसेच विद्यापीठाच्या परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने होत असताना लहान मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षा मात्र ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा अट्टाहास परीक्षा परिषद का करत अहो, असा सवाल शिक्षक भारती संघटनेने विचारला आहे. १४ जून पर्यंत उन्हाळी सुटी असल्यामुळे अनेक पालक व शिक्षक त्यांच्या मूळगावी गेले आहेत. शिवाय कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या काळात लहान मुलांची परीक्षा घेणे धोक्याचे आहे. त्यामुळे ही परीक्षा स्थगित करावी, अन्यथा परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा गाडगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, मोहमंद समी शेख, योगेश हराळे, जितेंद्र आरु, विजय कराळे, बाबासाहेब लोंढे, महेश पाडेकर, किशोर डोंगरे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संजय तमनर, संभाजी चौधरी, नवनाथ घोरपडे, कैलास जाधव, गोरखनाथ गव्हाणे, सोपानराव कळमकर, आशा मगर, विभावरी रोकडे मिनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर आदींनी दिला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरScholarshipशिष्यवृत्ती