शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

जलसाठे जिल्हाधिका-यांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 10:15 IST

जिल्ह्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणातील पाणीसाठे ताब्यात घेऊन पिण्यासाठी आरक्षित करण्याचा आदेश पालकमंत्री राम शिंदे यांनी महसूल, पाटबंधारे आणि महावितरणच्या अधिका-यांना सोमवारी दिला़ तसेच जिल्ह्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला जाऊ देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर : जिल्ह्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणातील पाणीसाठे ताब्यात घेऊन पिण्यासाठी आरक्षित करण्याचा आदेश पालकमंत्री राम शिंदे यांनी महसूल, पाटबंधारे आणि महावितरणच्या अधिका-यांना सोमवारी दिला़ तसेच जिल्ह्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला जाऊ देणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक पार पडली़ त्यावेळी ते बोलत होते़ खासदार दिलीप गांधी, आ. शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे, विजय औटी, राहुल जगताप, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे आदी बैठकीला उपस्थित होते़ चालूवर्षी सरासरी ६९ टक्के पाऊस पडल्याने बारा तालुक्यांत दुष्काळाची दाहकता अधिक आहे़ मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणात ३६ हजार ८०८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे़ टँकरची संख्या ५४ वर पोहोचली आहे़ पुढील पाच महिने पुरेल, एवढाच चारा उपलब्ध असल्याचे विदारक चित्र प्रशासनाच्या आकडेवारीवरून समोर आल्याने दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन पुढील जुलैपर्यंत पिण्यासाठी किती पाणी लागेल, एवढे पाणी आताच आरक्षित करा, तसा प्रस्ताव द्या, तो मुंबईत होणा-या मंत्रिमंडळात सादर केला जाईल़ कोणत्याही परिस्थितीत धरणातून बेकायदेशीररित्या पाण्याचा उपसा होणार नाही, याची काळजी घ्या़ दुष्काळी उपाययोजनेत कुचराई करणाºयांची गय केली जाणार नाही, असा इशारा शिंदे यांनी प्रशासकीय अधिकाºयांना यावेळी भरला़ समन्यायी पाणी वाटप कायदा जिल्ह्याच्या मानगुटीवर बसलेला आहे़ जिल्ह्याच्या हक्काचे पाणी जायकवाडी धरणात जात असल्याच्या जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी आमदारांनी केलेल्या तक्रारीवर यासंदर्भात लवकरच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे पालकमंत्री शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले़८६८ गावात दुष्काळअकोले व नेवासा वगळता अन्य बारा तालुक्यांतील २६४ गावांतील पाणीपातळी ३ मीटर खोल गेली असून, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील ८६८ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे़हुमणी अळीग्रस्त ऊस उत्पादकांना नुकसान भरपाईजिल्ह्यातील ३७ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊसाला हुमणी अळीने कुरतडलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकºयांचे नुकसान झाले असून, त्यांना बोंड अळीच्या धर्तीवर भरपाई मिळाली पाहिजे, यासाठी मंगळवारी होणा-या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही बाब निदर्शनास आणून देऊन शेतक-यांना मदत मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिंदे म्हणाले.केंद्रीय समितीकडून दुष्काळाची पाहणीपैसेवारी अधिक आल्याने मदत मिळणार नाही, अशी शेतकºयांची भावना झाली आहे़ मात्र दुष्काळी मदतीचे निकष पूर्णपणे बदलले असून, केंद्रीय समितीकडून दुष्काळी भागाची पाहणी केली जाईल़ पाहणी अहवालानुसार गावांना दुष्काळी मदत मिळेल, असे शिंदे यावेळी म्हणाले.टँकरचे अधिकार तहसीलदारांनाजिल्ह्यात भीषण स्थिती निर्माण झाली आहे़ नागरिकांना सहज टँकर उपलब्ध व्हावेत, यासाठी टँकर वाटपाचे अधिकार तालुकास्तरावर तहसीलदारांना देण्याची मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत करणार असल्याचे शिंदे यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय