शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कळसूबाई शिखरावरील लोखंडी शिड्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:24 IST

नवरात्र उत्सवात कळसूबाई शिखरावर पहिल्या माळेपासून ते दहाव्या माळेपर्यंत म्हणजेच दसऱ्यापर्यंत भाविकांची रीघ लागलेली असते. या शिखरावर जाण्यासाठी वनविभागाने ...

नवरात्र उत्सवात कळसूबाई शिखरावर पहिल्या माळेपासून ते दहाव्या माळेपर्यंत म्हणजेच दसऱ्यापर्यंत भाविकांची रीघ लागलेली असते. या शिखरावर जाण्यासाठी वनविभागाने काही ठिकाणी दगडी पायऱ्या बनविल्या होत्या, तर काही अवघड ठिकाणी लोखंडी शिड्या बनविल्या होत्या. या शिड्या बनविण्यात आल्यानंतर काही वर्षांनी या शिड्यांच्या आधारासाठी असणारे लोखंडी रिलिंग तुटले होते. यानंतर २००८-२००९ या कालावधीत या रिलिंगची वनविभागाने लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करून घेतली होती. मात्र अवघ्या दहा ते अकरा वर्ष यांत हे रिलिंग काही ठिकाणी पुन्हा तुटलेले असल्याने कामाचा दर्जा तर दिसून येतोच, पण त्याबरोबर वनविभागाचे याकडे असलेले दुर्लक्षही दिसून येत आहे. बनविण्यात आलेल्या दगडी पायऱ्यांची अवस्थाही काही ठिकाणी बिकट झालेली आहे.

या शिड्यांवरून भाविक आणि पर्यटक चढउतार करत असतात. नवरात्र उत्सवात तर या शिड्यांवर एकाचवेळी चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या भाविक पर्यटकांची गर्दी होत असते. दोन ठिकाणी असणाऱ्या या शिड्यांचे रिलिंग गंजून तुटून गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी नवरात्र उत्सवात होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेता वनविभागाने याकडे दुर्लक्ष केल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातील एका ठिकाणी तर स्थानिकांनी खबरदारी म्हणून लाकडे बांधली आहेत. स्थानिक समितीबरोबरच हजारो भाविक पर्यटकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कळसूबाई शिखरावरील या रिलिंगची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

.........................

कळसूबाई शिखरावर बारी मार्गे जाण्यासाठी दोन ठिकाणी उभारण्यात आलेल्या लोखंडी शिड्यांचे रिलिंग तुटलेले आहे. या शिड्यांवर नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणावर चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या भाविकांची एकाच वेळी गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेता हे दुरुस्तीचे काम तातडीने होणे आवश्यक आहे. याबाबतचा अहवाल आपण वनविभागास सादर करणार आहोत.

- नरेंद्र साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, राजूर