शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अकोले तालुक्यातून डाळिंब होतेय हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:14 IST

अकोले : तालुक्यातील वीरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, पिंपळगाव निपाणी यासह परिसरातील गावचा शिवार डाळिंबाचे आगार म्हणून ओळखला जायचा. मात्र ...

अकोले : तालुक्यातील वीरगाव, हिवरगाव, डोंगरगाव, गणोरे, पिंपळगाव निपाणी यासह परिसरातील गावचा शिवार डाळिंबाचे आगार म्हणून ओळखला जायचा. मात्र गेल्या काही वर्षांत तेल्या रोग आणि चुकीच्या मार्गदर्शनामुळे जवळपास ८२ टक्के डाळिंबाचे क्षेत्र घटले आहे. आता डाळिबांची जागा जागा द्राक्ष, ऊस, कांदा व भाजीपाल्याने घेतली आहे. त्यामुळे तालुक्यातून डाळिंब हद्दपार होऊ लागले आहे.

देश-विदेशातील बाजारपेठेत गुणवत्तेत सरस ठरलेली, निर्यातक्षम तालुक्याची डाळिंब शेती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तेल्या, मर रोग आणि शेतातील बोगस कृषी डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे डाळिंब क्षेत्र कमालीचे घटले आहे. दहा वर्षांपूर्वी तालुक्यात अडीच हजार हेक्टरवर डाळिंब शेती उभी होती. सध्या जेमतेम साडे चारशे हेक्टरवर डाळिंब तग धरून आहे.

राज्यात रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड सुरू होण्यापूर्वी १९८९-९०मध्ये नगण्य प्रमाणावर डाळिंब शेती होती. त्यानंतर फळबाग शेतीबाबत शेतकऱ्यांची वाढलेली सकारात्मकता आणि जागतिकीकरणाच्या धोरणात जगाची बाजारपेठ खुली झाल्याने शाश्वत आणि अधिक उत्पन्नाची हमी डाळिंब पिकामुळे मिळाली. २०१०पर्यंत डाळिंब क्षेत्रात मोठी वाढ झाली.

त्यानंतर हळूहळू तेल्या, मररोग, बुरशीजन्य आजाराने डाळिंब शेतीला झपाटल्याने फळबागा मरणासन्न अवस्थेला गेल्या. रोगांचे अतिक्रमण आणि बागांमध्ये घुसलेले बोगस मार्गदर्शक ही दोन्ही संकटे डाळिंबाच्या मुळावर आली आहेत. सल्ल्यामुळे एकरी उत्पादन खर्च तर वाढतोच, शिवाय पीक संकटात ढकलले जाते.

डाळिंब उत्पादकांना चुकीचे सल्ले मिळत असल्याने तसेच बदललेला निसर्ग, वाढते जागतिक तापमान, रोगांचे आक्रमण यामुळे डाळिंबाचे क्षेत्रफळ घटत चालले आहे.

.......................

गावपारावरील शेतीविषयक सल्लागार चुकीचा सल्ला देतात. त्यामुळे डाळिंब शेतीचे नुकसान झाले आहे. सजग होऊन पिकांवर वेळोवेळी येणारे रोग निवारणासाठी शिकलेल्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. शेतीविषयक कोणतेही संकट आल्यास शेतकऱ्यांनी कृषी खात्याशी संपर्क साधावा. कृषी सहायकांचे मार्गदर्शन घ्यावे.

- प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी

...................

वीरगाव, पिंपळगाव, वडगाव या डाळिंबाच्या आगारात केवळ १८ टक्के डाळिंब पीक तग धरून आहे. भाजीपाला वाढला. आता शेतकऱ्यांनी योग्य मार्गदर्शन न घेतल्यास शेतीचे मोठे नुकसान होऊ शकते.

- ज्ञानेश्वर खुळे, शेतकरी, वीरगाव