शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: ३० सप्टेंबरपर्यंत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार, सरकारने लेखी दिले: मनोज जरांगे पाटील
2
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
3
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
4
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
5
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
6
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
7
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
8
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
9
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
10
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
11
'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका
12
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
13
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
14
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
15
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!
16
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
17
Ganesh Visarjan: गौरी-गणपतीच्या निरोपासाठी जय्यत तयारी
18
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
19
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
20
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट

राजकीय वादात नगरसचिवांची उचलबांगडी

By admin | Updated: August 11, 2016 01:11 IST

अहमदनगर : सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील गटनेते नियुक्तीच्या राजकीय वादात महापालिकेचे नगरसचिव मिलिंद वैद्य यांची अखेर नगरसचिवपदावरून उचलबांगडी करण्यात आली.

अहमदनगर : सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील गटनेते नियुक्तीच्या राजकीय वादात महापालिकेचे नगरसचिव मिलिंद वैद्य यांची अखेर नगरसचिवपदावरून उचलबांगडी करण्यात आली. दरम्यान, वैद्य यांनी जाता जाता सुवेंद्र गांधी (भाजप), संपत बारस्कर (राष्ट्रवादी) आणि सुवर्णा कोतकर (काँग्रेस) यांची नियुक्ती करून गटनोंदणीच्या वादाला आणखी फोडणी दिली आहे.महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी झालेल्या विशेष सभेत गटनेतेपदावरून गोंधळ झाला होता. तसेच पक्षीय बलाबलाचाही वाद उपस्थित झाला होता. याच गोंधळात महापौरांनी शिवसेनेला साथ देणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांची स्थायी समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. याविरोधात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. संबंधित पक्षाच्या नगरसेवकांचा दबाव असल्याने स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती करण्याच्यावेळी एकाच रात्रीतून गटनेते बदलण्याचा चमत्कारही वैद्य यांनी केला. नाशिक विभागीय आयुक्तांनी नव्याने गटनोंदणी होत नसल्याचे पत्र महापालिकेला पाठविले, मात्र ते पत्रच वैद्य यांनी गायब केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या पत्रासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी त्यांना पळविले होते. विभागीय आयुक्तांचे पत्र मिळाल्यानंतर वैद्य यांनी संपत बारस्कर, सुवर्णा कोतकर, सुवेंद्र गांधी हेच गटनेते असल्याचे त्यांना पत्र दिले आहे. दरम्यान, गटनेते निवडण्याचा अधिकार नगरसचिवांना नसून गटनेता निवडीचे अधिकार संबंधित पक्षाला असतानाही नव्या गटनेत्यांना नियुक्तीचे पत्र दिल्याने पुन्हा राजकीय वाद रंगण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, वैद्य यांच्या ताब्यातील आवक-जावक रजिस्टरही पळविले होते. याबाबत वरिष्ठांना माहिती न देणे, कार्यालयातून गायब होणे, मोबाईल बंद ठेवणे अशा प्रकारे कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आयुक्तांनी त्यांना कारणे दाखवा नोटिसही बजावली होती.या राजकीय वादामुळे वरिष्ठ अडचणीत आले होते. त्यामुळे वैद्य यांची नगरसचिवपदावरून तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी सावेडीचे प्रभाग अधिकारी एस. बी. तडवी यांची नियुक्ती करण्यात आली. वैद्य यांची माळीवाडा विभागाचे प्रभाग अधिकारी म्हणून तात्पुरती बदली करण्यात आली आहे. सावेडीचे प्रभाग अधिकारी म्हणून जितेंद्र सारसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपायुक्त अजय चारठाणकर यांनी बदलीचे आदेश दिले असून त्याला आयुक्तांनी मान्यता दिली आहे. वैद्य यांच्या बदलीमुळे तडवी आणि सारसर यांचीही बदली करावी लागली.