शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

ढोल-ताशांचा गजरात पोलिसांनी केला रिक्षाचालकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:58 IST

वाहतूक नियमांचे पालन करणा-या रिक्षाचालकांचा आज वाहतूक शाखेच्यावतीने ढोल-ताशा वाजवून आणि हार घालून सत्कार करण्यात आला तर नियमांकडे कानाडोळा करणा-या ६० जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

ठळक मुद्देवाहतूक शाखेचा उपक्रम: नियम तोडणाऱ्या ६० चालकांवर कारवाईचा बडगा

अहमदनगर: वाहतूक नियमांचे पालन करणा-या रिक्षाचालकांचा आज वाहतूक शाखेच्यावतीने ढोल-ताशा वाजवून आणि हार घालून सत्कार करण्यात आला तर नियमांकडे कानाडोळा करणा-या ६० जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.प्रवासी वाहतूक करणा-या रिक्षाचालकांसाठी असलेल्या नियमावलीची शनिवारपासून शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक अविनाश मोरे यांनी कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. रिक्षाचालकांना खाकी तर मालकांना सफेद (पांढरा) गणवेश परिधान करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी नुकतेच दिले होते. सर्व रिक्षाचालक व मालकांना नोटीस देऊन पंधरा दिवसांची मुदतही देण्यात आली होती. यामध्ये शासनाने दिलेल्या परवाना कराराप्रमाणेच रिक्षाचालकांनी प्रवासी वाहतूक करावी, रिक्षा चालविताना ठरवून दिलेला गणवेशासह बॅच बिल्ला, वाहनाचे कागदपत्र, परवाना सोबत ठेवावा, जादा प्रवासी बसविण्यासाठी रिक्षात स्पिकर, लोखंडी खुर्ची, प्लास्टिक स्टूल ठेवता येणार नाही. तसेच रिक्षाला कंपनीने दिलेले सीट वाढविता येणार नाही. वाहनाची नोंदणी, परवाना व क्रमांक मिळाल्याशिवाय प्रवासी वाहतूक करता येणार नाही. आदी नियमांचे पालन करणा-याचे आदेश देण्यात आलेले आहेत. शनिवारी मोरे व त्यांच्या पथकाने रिक्षांची तपासणी केली तेव्हा ६० चालकांनी नियम तोडल्याचे आढळून अल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तर नियम पाळणा-यांना वाहतूक शाखेत बोलावून त्यांचा वाद्य वाजवून गौरव करण्यात आला. वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे परवानाधारक रिक्षाचालकांनी स्वागत केले आहे.प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि अस्ताव्यस्त वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जे वाहनचालक पालन करतात त्यांना पोलीस मदत करतात. मात्र कायदा तोडणा-यांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. सर्व रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करून प्रवाशांना योग्य सेवा द्यावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.- अविनाश मोरे, शहर वाहतूक निरिक्षक 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस