शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

ढोल-ताशांचा गजरात पोलिसांनी केला रिक्षाचालकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 16:58 IST

वाहतूक नियमांचे पालन करणा-या रिक्षाचालकांचा आज वाहतूक शाखेच्यावतीने ढोल-ताशा वाजवून आणि हार घालून सत्कार करण्यात आला तर नियमांकडे कानाडोळा करणा-या ६० जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

ठळक मुद्देवाहतूक शाखेचा उपक्रम: नियम तोडणाऱ्या ६० चालकांवर कारवाईचा बडगा

अहमदनगर: वाहतूक नियमांचे पालन करणा-या रिक्षाचालकांचा आज वाहतूक शाखेच्यावतीने ढोल-ताशा वाजवून आणि हार घालून सत्कार करण्यात आला तर नियमांकडे कानाडोळा करणा-या ६० जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.प्रवासी वाहतूक करणा-या रिक्षाचालकांसाठी असलेल्या नियमावलीची शनिवारपासून शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक अविनाश मोरे यांनी कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. रिक्षाचालकांना खाकी तर मालकांना सफेद (पांढरा) गणवेश परिधान करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी नुकतेच दिले होते. सर्व रिक्षाचालक व मालकांना नोटीस देऊन पंधरा दिवसांची मुदतही देण्यात आली होती. यामध्ये शासनाने दिलेल्या परवाना कराराप्रमाणेच रिक्षाचालकांनी प्रवासी वाहतूक करावी, रिक्षा चालविताना ठरवून दिलेला गणवेशासह बॅच बिल्ला, वाहनाचे कागदपत्र, परवाना सोबत ठेवावा, जादा प्रवासी बसविण्यासाठी रिक्षात स्पिकर, लोखंडी खुर्ची, प्लास्टिक स्टूल ठेवता येणार नाही. तसेच रिक्षाला कंपनीने दिलेले सीट वाढविता येणार नाही. वाहनाची नोंदणी, परवाना व क्रमांक मिळाल्याशिवाय प्रवासी वाहतूक करता येणार नाही. आदी नियमांचे पालन करणा-याचे आदेश देण्यात आलेले आहेत. शनिवारी मोरे व त्यांच्या पथकाने रिक्षांची तपासणी केली तेव्हा ६० चालकांनी नियम तोडल्याचे आढळून अल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तर नियम पाळणा-यांना वाहतूक शाखेत बोलावून त्यांचा वाद्य वाजवून गौरव करण्यात आला. वाहतूक शाखेच्या या उपक्रमाचे परवानाधारक रिक्षाचालकांनी स्वागत केले आहे.प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि अस्ताव्यस्त वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जे वाहनचालक पालन करतात त्यांना पोलीस मदत करतात. मात्र कायदा तोडणा-यांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. सर्व रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करून प्रवाशांना योग्य सेवा द्यावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.- अविनाश मोरे, शहर वाहतूक निरिक्षक 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस