शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दुष्काळी गावांना पाणी देण्याची भूमिका बजवा : सदाशिव लोखंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:37 IST

२००५ साली समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला नसता तर ११ टीएमसी पाणी खाली गेले नसते. पाण्याचे, दुधाचे महत्त्व असलेल्यांनी हा कायदा करण्याचा निर्णय घेतला.

संगमनेर : २००५ साली समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला नसता तर ११ टीएमसी पाणी खाली गेले नसते. पाण्याचे, दुधाचे महत्त्व असलेल्यांनी हा कायदा करण्याचा निर्णय घेतला. गावांमध्ये कुणीही टॅँकरचे राजकारण करू नये. दुष्काळी गावांना पाणी देण्याची महत्वाची भूमिका तलाठी, ग्रामसेवक यांची आहे. त्यांनी नियुक्ती केलेल्या ठिकाणी त्यांनी राहणे गरजेचे आहे, असे खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले.संगमनेरातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवानातील सभागृहात बुधवारी आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत लोखंडे बोलत होते. व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल, महावितरणचे कार्यकारी अभियंता रमेश घुगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख बाबासाहेब कुटे, शरद थोरात, गुलाब भोसले, जयवंत पवार, आप्पा केसेकर, संजय फड, अरुण इथापे, साहेबराव वलवे, बुवाजी खेमनर, अमित चव्हाण, पप्पू कानकाटे, लखन घोरपडे यांसह नागरिक उपस्थित होते. शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेर म्हणाले, पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू करावा, यासाठी काकडवाडी ग्रामस्थांनी प्रस्ताव दिला होता. मात्र, भीषण पाणी टंचाई असूनही तो सुरू झाला नाही. पारेगाव येथे तलाठी नसल्याने ग्रामस्थांची कामे रखडली आहेत. तेथे तलाठ्याची नेमणूक करावी. अशी मागणी त्यांनी केली.‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनची दखल‘टॅँकर गेले कुण्या गावा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने एकाच दिवशी जिल्ह्यातील ५० गावांमध्ये स्टिंग आॅपरेशन केले होते. याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेर यांनी या आढावा बैठकीत ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमुळेच प्रशासन जागे झाले असल्याचे सांगितले. या वृत्ताची प्रशासनाला दखल घ्यावी लागली असल्याचे आहेर म्हणाले. तसेच इतरांनी देखील या स्टिंग आॅपरेशनचे कौतुक केले.अवैध वाळू उत्खनन, कत्तलखाने बंद कराबैठकीत पाणी टंचाईबरोबरच अवैध वाळू उत्खनन व शहरातील अवैध कत्तलखाना आदी प्रश्न उपस्थितांनी मांडले. अवैध वाळू उत्खननामुळे नदीपात्रातील विहिरींची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याचे उपस्थित असलेल्या अनेकांनी बोलून दाखविले. तर शहरातील अवैध कत्तलखान्यांमध्ये गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. येथील रक्तमिश्रीत पाणी नदीपात्रात सोडले गेल्याने सुकेवाडी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नदीपात्रातील विहिरीत ते उतरल्याचे सुकेवाडी ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे अवैध वाळू उत्खनन व कत्तलखाने बंद व्हावेत, अशी अपेक्षा अनेकांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर