शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी गावांना पाणी देण्याची भूमिका बजवा : सदाशिव लोखंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:37 IST

२००५ साली समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला नसता तर ११ टीएमसी पाणी खाली गेले नसते. पाण्याचे, दुधाचे महत्त्व असलेल्यांनी हा कायदा करण्याचा निर्णय घेतला.

संगमनेर : २००५ साली समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाला नसता तर ११ टीएमसी पाणी खाली गेले नसते. पाण्याचे, दुधाचे महत्त्व असलेल्यांनी हा कायदा करण्याचा निर्णय घेतला. गावांमध्ये कुणीही टॅँकरचे राजकारण करू नये. दुष्काळी गावांना पाणी देण्याची महत्वाची भूमिका तलाठी, ग्रामसेवक यांची आहे. त्यांनी नियुक्ती केलेल्या ठिकाणी त्यांनी राहणे गरजेचे आहे, असे खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले.संगमनेरातील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवानातील सभागृहात बुधवारी आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत लोखंडे बोलत होते. व्यासपीठावर प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल, महावितरणचे कार्यकारी अभियंता रमेश घुगे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, भाजपाचे शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख बाबासाहेब कुटे, शरद थोरात, गुलाब भोसले, जयवंत पवार, आप्पा केसेकर, संजय फड, अरुण इथापे, साहेबराव वलवे, बुवाजी खेमनर, अमित चव्हाण, पप्पू कानकाटे, लखन घोरपडे यांसह नागरिक उपस्थित होते. शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेर म्हणाले, पिण्याच्या पाण्याचा टॅँकर सुरू करावा, यासाठी काकडवाडी ग्रामस्थांनी प्रस्ताव दिला होता. मात्र, भीषण पाणी टंचाई असूनही तो सुरू झाला नाही. पारेगाव येथे तलाठी नसल्याने ग्रामस्थांची कामे रखडली आहेत. तेथे तलाठ्याची नेमणूक करावी. अशी मागणी त्यांनी केली.‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनची दखल‘टॅँकर गेले कुण्या गावा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने एकाच दिवशी जिल्ह्यातील ५० गावांमध्ये स्टिंग आॅपरेशन केले होते. याबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेर यांनी या आढावा बैठकीत ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंगमुळेच प्रशासन जागे झाले असल्याचे सांगितले. या वृत्ताची प्रशासनाला दखल घ्यावी लागली असल्याचे आहेर म्हणाले. तसेच इतरांनी देखील या स्टिंग आॅपरेशनचे कौतुक केले.अवैध वाळू उत्खनन, कत्तलखाने बंद कराबैठकीत पाणी टंचाईबरोबरच अवैध वाळू उत्खनन व शहरातील अवैध कत्तलखाना आदी प्रश्न उपस्थितांनी मांडले. अवैध वाळू उत्खननामुळे नदीपात्रातील विहिरींची पातळी खालावली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याचे उपस्थित असलेल्या अनेकांनी बोलून दाखविले. तर शहरातील अवैध कत्तलखान्यांमध्ये गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केली जाते. येथील रक्तमिश्रीत पाणी नदीपात्रात सोडले गेल्याने सुकेवाडी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नदीपात्रातील विहिरीत ते उतरल्याचे सुकेवाडी ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे अवैध वाळू उत्खनन व कत्तलखाने बंद व्हावेत, अशी अपेक्षा अनेकांनी यावेळी व्यक्त केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर