शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अनवाणी पायांनीच ‘खेलो इंडिया’

By साहेबराव नरसाळे | Updated: September 15, 2018 11:15 IST

ना पायात शूज, ना धावण्यासाठी चांगला ट्रॅक, तहानलेले खेळाडू अन् कोरड्या भाकरींवरच पोटाची आग शमवून ‘अडथळ्यांची शर्यत’ रंगलेली असे चित्र शुक्रवारी नगरमधील वाडिया पार्क मैदानावर पहायला मिळाले.

साहेबराव नरसाळेअहमदनगर : ना पायात शूज,  ना धावण्यासाठी चांगला ट्रॅक, तहानलेले खेळाडू अन् कोरड्या भाकरींवरच पोटाची आग शमवून ‘अडथळ्यांची शर्यत’ रंगलेली असे चित्र शुक्रवारी नगरमधील वाडिया पार्क मैदानावर पहायला मिळाले.जिल्हा क्रीडा कार्यालय व महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा शुक्रवारी वाडिया पार्क क्रीडा संकुलात झाल्या. धावणे, उंच उडी, लांब उडी, तिहेरी उडी, थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक, अडथळ्यांची शर्यत अशा स्पर्धांमुळे वाडिया पार्क खेळाडूंनी गजबले होते. जिल्हाभरातून सुमारे ६५० खेळाडू वाडिया पार्कमध्ये दाखल झाले होते. मात्र, शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन वाडिया पार्क क्रीडा संकुलात दाखल झालेल्या खेळाडूंसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.  खेळाडूंच्या जेवणाचीही व्यवस्था प्रशासनाला करता आली नाही. जेथे जागा मिळेल तेथेच बसून मुले आईने दिलेला डबा उघडून खात होते. कोरड्या भाजीबरोबर भाकरी तर काहींच्या डब्यामध्ये भाजीही नव्हती. आपल्या संघासाठी, शाळेसाठी, जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी खेळण्याचे स्वप्न पाहणारी ही मुले कोरड्या भाकरी पोटात ढकलून मैदानात जीव तोडून खेळत होती.प्रारंभी मैदानात पाण्याची व्यवस्था केली. मात्र, ते पाणी संपल्यानंतर पुन्हा पाणी आणण्याची तसदीही कोणी घेतली नाही. जेवायचे म्हटले तरी मुलांना बाहेर जाऊन पाण्याची बाटली आणावी लागत होती. काही मुले घरातून भल्या सकाळीच बाहेर पडली होती. त्यांना डबाही देण्यात आला नव्हता. अशा मुलांनी वाडिया पार्कमध्ये भेळीवरच भूक भागवून मैदान मारले. कोणत्याही स्पर्धेत उतरण्यापूर्वी खेळाडूकडे खेळाच्या पूर्ण सुविधा असल्या पाहिजेत. पण येथे अनेक खेळाडूंच्या पायात साधे बूटही नव्हते. धावताना, उंच उडी मारताना पाया-पोटात गोळा आला तरी त्यावर उपचाराची व्यवस्था नव्हती. अनवाणी धावणाऱ्या एका मुलाला काटा मोडला तर त्याला ट्रॅक सोडावा लागला. कर्जतचा एक मुलगा पायात क्रॅम्प आला म्हणून विव्हळत होता. पण खेळाडूंची साधी कोणाला दखल घ्यावीशी वाटली नाही.स्पर्धेच्या नियोजनासाठी १५ हजार निधीजिल्हास्तरीय स्पर्धेत खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था करण्याची तरतूद नाही. अनेक मुले लांबून येतात. त्यांचा सर्व खर्च हौशी पालक करतात. अनेक शाळांकडेही खेळासाठी निधी नसतो. त्यामुळे मुलांकडूनच पैसे गोळा करुन त्यांना आणले जाते. पूर्वी स्पर्धेच्या आयोजनासाठी अडीच हजार रुपये मिळत होते. आता १५ हजार रुपये मिळत आहेत. त्यातून पंचांच्या चहा, नाष्टा आणि जेवणाची व्यवस्था केली जाते, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली. तालुकास्तरीय स्पर्धेच्या आयोजनासाठी १० हजार रुपये शासनाकडून मिळतात.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय