शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

आईची रक्षा शेतात टाकून केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 11:44 IST

नद्या सुध्दा प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या आहेत. त्याचे मुख्य कारण वाढता मानवाचा हस्तक्षेप आहे. हा वाढता हस्तक्षेप कमी व्हावा, यासाठी दाढ बुद्रुक (ता.राहाता) येथील भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष कॉ. कानिफनाथ तांबे यांनी आपल्या मातोश्री हौसाबाई मोहनीराज तांबे यांच्या निधनानंतर आईची रक्षा नदी प्रवाहात न सोडता शेतात टाकून त्यावर आंबा वृक्षाची लागवड करून गावात नवा पायंडा पाडला आहे.

ठळक मुद्देदाढ बुद्रुक येथे उपक्रम : कानिफनाथ तांबे यांचा पायंडा

यमन पुलाटेलोणी : आज नद्या सुध्दा प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या आहेत. त्याचे मुख्य कारण वाढता मानवाचा हस्तक्षेप आहे. हा वाढता हस्तक्षेप कमी व्हावा, यासाठी दाढ बुद्रुक (ता.राहाता) येथील भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष कॉ. कानिफनाथ तांबे यांनी आपल्या मातोश्री हौसाबाई मोहनीराज तांबे यांच्या निधनानंतर आईची रक्षा नदी प्रवाहात न सोडता शेतात टाकून त्यावर आंबा वृक्षाची लागवड करून गावात नवा पायंडा पाडला आहे.स्व.हौसाबाई मोहिनीराज तांबे यांच्या निधनानंतर त्यांची रक्षा ही विसर्जित करण्याऐवजी किंवा नदीत सोडण्याऐवजी ती शेतात विसर्जन करण्याचा संकल्प कानिफनाथ तांबे यांनी केला होता. त्यावर बंधू शिवनाथ तांबे, सुनील तांबे, मामा दिगंबर चव्हाण, मेव्हणे बाबासाहेब दरेकर, बहिणी लिलाबाई गवांदे, मंदा ताके, नंदा दरेकर, भाचे संतोष गवांदे, राहुल घोगरे, रामेश्वर पानसरे, शांताराम मोरे, चैतन्यकुमार तांबे, तेजस्विनी तांबे, अभयसिंह तांबे व उदयसिंह तांबे, उर्मिला तांबे, रोहिणी तांबे, संतोष वाणी यांच्यासमोर मांडला. त्यांनी देखील होकार दिला. उपस्थितांना पुष्प देवून जगद्गुरू तुकोबांच्या गाथेतील अभंग म्हटले व तद्नंतर जिजाऊ वंदना म्हणून अस्थी विसर्जन करून त्यावर वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिवाजी तांबे, बेबी चिंधे, बाळासाहेब पाळंदे, चणेगावचे पोलीस पाटील लोहाळे, राम भोसले, शैला थोरात, भास्कर ढमक, चंद्रकला दिघे, शोभा गोळे, नानासाहेब तांबे, जॉन पाळंदे, बाळासाहेब साळवे उपस्थित होते.‘लोकमत’मधील लेखाची प्रेरणाआपल्या घरातील माणूस आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्या आठवणी जतन झाल्या पाहिजे, यासाठी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीमध्ये ‘लोकमत’चे आवृृत्ती प्रमुख सुधीर लंके यांचा ‘अस्थिंची फुले’ हा लेख प्रसिद्ध झाला होता़ हा लेख मनात घर करुन गेला. त्यातून आम्ही प्रेरणा घेतली़ सावरगावतळ या गावाचा आदर्श घेण्याची गरज आहे. माझा कर्मकाडांवर विश्वास नाही़ त्यामुळे दशक्रिया विधीत चांगला पायंडा पडावा म्हणून आम्ही पुढाकार घेतला आहे, असे कानिफनाथ तांबे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले