शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

आईची रक्षा शेतात टाकून केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 11:44 IST

नद्या सुध्दा प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या आहेत. त्याचे मुख्य कारण वाढता मानवाचा हस्तक्षेप आहे. हा वाढता हस्तक्षेप कमी व्हावा, यासाठी दाढ बुद्रुक (ता.राहाता) येथील भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष कॉ. कानिफनाथ तांबे यांनी आपल्या मातोश्री हौसाबाई मोहनीराज तांबे यांच्या निधनानंतर आईची रक्षा नदी प्रवाहात न सोडता शेतात टाकून त्यावर आंबा वृक्षाची लागवड करून गावात नवा पायंडा पाडला आहे.

ठळक मुद्देदाढ बुद्रुक येथे उपक्रम : कानिफनाथ तांबे यांचा पायंडा

यमन पुलाटेलोणी : आज नद्या सुध्दा प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या आहेत. त्याचे मुख्य कारण वाढता मानवाचा हस्तक्षेप आहे. हा वाढता हस्तक्षेप कमी व्हावा, यासाठी दाढ बुद्रुक (ता.राहाता) येथील भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष कॉ. कानिफनाथ तांबे यांनी आपल्या मातोश्री हौसाबाई मोहनीराज तांबे यांच्या निधनानंतर आईची रक्षा नदी प्रवाहात न सोडता शेतात टाकून त्यावर आंबा वृक्षाची लागवड करून गावात नवा पायंडा पाडला आहे.स्व.हौसाबाई मोहिनीराज तांबे यांच्या निधनानंतर त्यांची रक्षा ही विसर्जित करण्याऐवजी किंवा नदीत सोडण्याऐवजी ती शेतात विसर्जन करण्याचा संकल्प कानिफनाथ तांबे यांनी केला होता. त्यावर बंधू शिवनाथ तांबे, सुनील तांबे, मामा दिगंबर चव्हाण, मेव्हणे बाबासाहेब दरेकर, बहिणी लिलाबाई गवांदे, मंदा ताके, नंदा दरेकर, भाचे संतोष गवांदे, राहुल घोगरे, रामेश्वर पानसरे, शांताराम मोरे, चैतन्यकुमार तांबे, तेजस्विनी तांबे, अभयसिंह तांबे व उदयसिंह तांबे, उर्मिला तांबे, रोहिणी तांबे, संतोष वाणी यांच्यासमोर मांडला. त्यांनी देखील होकार दिला. उपस्थितांना पुष्प देवून जगद्गुरू तुकोबांच्या गाथेतील अभंग म्हटले व तद्नंतर जिजाऊ वंदना म्हणून अस्थी विसर्जन करून त्यावर वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिवाजी तांबे, बेबी चिंधे, बाळासाहेब पाळंदे, चणेगावचे पोलीस पाटील लोहाळे, राम भोसले, शैला थोरात, भास्कर ढमक, चंद्रकला दिघे, शोभा गोळे, नानासाहेब तांबे, जॉन पाळंदे, बाळासाहेब साळवे उपस्थित होते.‘लोकमत’मधील लेखाची प्रेरणाआपल्या घरातील माणूस आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्या आठवणी जतन झाल्या पाहिजे, यासाठी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीमध्ये ‘लोकमत’चे आवृृत्ती प्रमुख सुधीर लंके यांचा ‘अस्थिंची फुले’ हा लेख प्रसिद्ध झाला होता़ हा लेख मनात घर करुन गेला. त्यातून आम्ही प्रेरणा घेतली़ सावरगावतळ या गावाचा आदर्श घेण्याची गरज आहे. माझा कर्मकाडांवर विश्वास नाही़ त्यामुळे दशक्रिया विधीत चांगला पायंडा पडावा म्हणून आम्ही पुढाकार घेतला आहे, असे कानिफनाथ तांबे यांनी सांगितले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले