शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

जिल्ह्यात खरिपाचे पावणेसात लाख हेक्टरचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:20 IST

अहमदनगर : हवामान विभागाने यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे पाऊस वेळेवर येण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदाही कृषी विभागाकडून खरीप ...

अहमदनगर : हवामान विभागाने यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे पाऊस वेळेवर येण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे जिल्ह्यात यंदाही कृषी विभागाकडून खरीप हंगामासाठी पावणेसात लाख हेक्टरवर नियोजन करण्यात आले आहे. यात सर्वाधिक दीड लाख हेक्टरवर बाजरीचे नियोजन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीही पर्जन्यमान चांगले होते. जवळपास जिल्ह्यात सरासरीच्या १४८ टक्के पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामाची उच्चांकी पेरणी झाली होती. गेल्या वर्षीसारखाच यंदाही हवामान विभागाने वेळेवर व पुरेसा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे कृषी विभागाने खरीप हंगामागाचे ६ लाख ७४ हजार हेक्टवर पेरणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात पेरणीची सरासरी ४ लाख ४८ हजार हेक्टर असते. मात्र गेल्या दोन वर्षात पेरणी क्षेत्र वाढत आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ८२ हजार ८८६ हेक्टरवर पेरणी झाली होती. सोयाबीन, बाजरी, कांदा बियाणांच्या उगवणीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी हाेत्या. त्या चुका टाळण्यासाठी कृषी विभागाने यंदा विशेष नियोजन केले आहे. शेती मशागत, पेरणीबाबत शेतकऱ्यांना गाव, तालुकास्तरावरून कृषी सहायक, कृषी विस्तार अधिकारी, कृषी मंडलाधिकारी यांच्यामार्फत प्रबोधन केले जात आहे. गाव पातळीवर विविध व्हाॅट‌्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नियोजन केले जात आहे.

---

पीकनिहाय पेरणी क्षेत्र असे

पीक क्षेत्र (हेक्टर)

बाजरी १,५५,०००

कापूस १,३५,०००

सोयाबीन ९५,०००

मका ७०,०००

तूर ६५,०००

मूग ५४,०००

उदीद ५२,०००

भात १९,०००

भुईमूग ९,६०८

----

खते, बियाणांचे नियोजन असे..

खरीप हंगामासाठी कृषी विभागाने २ लाख ५५ हजार मेट्रिक टन वेगवेगळ्या खतांची मागणी केली आहे. त्यातील २ लाख ११ हजार मेट्रिक टन खत मिळाले असून १ लाख टन खते शिल्लक आहेत. या हंगामासाठी कृषी विभागाकडून ६० हजार ३९२ क्विंटलची मागणी करण्यात आली आहे.