शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

मुंबई-नागपूर मार्गावर खड्ड्यांची चाळण : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 11:44 IST

तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर जलदगती महामार्गाची मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली आहे. खड्डे चुकविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

रोहित टेकेकोपरगाव : तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर जलदगती महामार्गाची मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली आहे. खड्डे चुकविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे.मुंबई-नागपूर जलदगती महामार्ग हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तयार करून त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम देखील याच महामंडळाच्या औरंगाबाद येथील कार्यालयाच्या माध्यमातून होत असे.कालांतराने या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम हे ज्या त्या कार्यक्षेत्रात येणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले आणि त्याच दिवशी या रस्त्याची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली.सार्वजनिक बांधकाम उपविभाग,कोपरगाव यांच्या अंतर्गत देखभाल दुरुस्तीकरिता अंदाजे १६ किलोमीटर पुणतांबा चौफुली ते तळेगाव मळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या रस्त्यावर खड्ड्याचे एवढे प्रमाण वाढले आहे की वाहने तर सोडाच पायी चालणे देखील अवघड झाले आहे. दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्यांवर मोठमोठी काटेरी झुडपे वाढली आहेत. डांबरी रस्त्याच्या पृष्ठभागावर तर अक्षरश: खड्ड्यांची मालिकाच झाली आहे.त्यामुळे हे खड्डे चुकविण्याच्या नादात आजवर कित्येक अपघात झाले असून वाहने अडवून चोरीच्या घटना घडल्या आहेत.या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. कारण खड्डे चुकविण्याच्या नादात केव्हा एखादे मोठे वाहन कधी धडक देईल हे सांगता येत नाही. या रस्त्याची डागडुजी करण्यासाठी संबंधित विभागाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु खड्ड्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच जात आहे. दुरुस्त केलेले खड्डे देखील काही दिवसातच ‘जैसे थे’ होतात. त्यामुळे रस्त्याचे काम होतानाच त्याची गुणवता तपासल्यास पुन्हा पुन्हा काम करण्याची गरज भासणार नाही.-स्वप्नील वलटे, ग्रामस्थ, दहिगाव बोलका, ता.कोपरगाव.३ जानेवारी २०१७ रोजी भारत सरकारने परिपत्रक काढून राष्ट्रीय महामार्ग (७५२ आय) घोषित केला. परंतु राज्य शासनाने हा मार्ग केंद्राकडे वर्ग करण्यासाठी निविदा काढणे गरजेचे आहे. परंतु ती अद्यापपर्यंत काढली नसल्याने प्रलंबित आहे. परंतु यावर तत्काळ उपाय योजना म्हणून राज्य शासनाकडे विशेष रस्ता दुरुस्तीसाठी ५.५ कोटी मागणीचा प्रस्ताव पाठवला असून निधी मिळाल्यानंतर लगेचच दुरुस्तीचे काम सुरु होईल.-प्रशांत वाकचौरे, सहायक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कोपरगाव.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव