शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

शहरभर बांधकामाच्या टाकाऊ साहित्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरात ठिकठिकाणी बांधकामाच्या टाकाऊ साहित्याचे ढीग अस्ताव्यस्त पडलेले आहेत. त्यामुळे शहर विद्रूप झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शहरात ठिकठिकाणी बांधकामाच्या टाकाऊ साहित्याचे ढीग अस्ताव्यस्त पडलेले आहेत. त्यामुळे शहर विद्रूप झाले असून, या टाकाऊ वस्तूंचे योग्य व्यवस्थापन करण्याची मागणी हरिभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय ललवाणी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शहर व परिसरात बांधकामाच्या टाकाऊ साहित्य रस्त्याच्या बाजूला पडलेले आहे. जुने बांधकाम पाडून नवीन बांधकामे सुरू आहेत. जुने बांधकाम पाडल्यानंतर टाकाऊ साहित्य सर्रास रस्त्यावर टाकले जात आहे. याकडे शहरातील हरिभूमी प्रतिष्ठानने महापौरांचे लक्ष वेधले आहे. याबाबत प्रतिष्ठानच्या वतीने महापौर बाबासाहेब वाकळे यांना निवेदन देण्यात आले आहे. बांधकामाचे टाकाऊ साहित्य सर्रास रस्त्याच्या बाजूला, ओढ्यात, नदीपात्रात टाकण्यात येत आहे. त्यामुळे शहर विद्रूप झाले असून, या साहित्याचे योग्य व्यवस्थापन करावे. हे साहित्य संकलित करून विलगीकरण करावे. जेणे करून हे साहित्य रस्त्यावर पडणार नाही. सध्या स्वच्छ सर्वेक्षण सुरू असल्याने टाकाऊ साहित्याबाबत धोरण निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.