शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

शहरभर बांधकामाच्या टाकाऊ साहित्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरात ठिकठिकाणी बांधकामाच्या टाकाऊ साहित्याचे ढीग अस्ताव्यस्त पडलेले आहेत. त्यामुळे शहर विद्रूप झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शहरात ठिकठिकाणी बांधकामाच्या टाकाऊ साहित्याचे ढीग अस्ताव्यस्त पडलेले आहेत. त्यामुळे शहर विद्रूप झाले असून, या टाकाऊ वस्तूंचे योग्य व्यवस्थापन करण्याची मागणी हरिभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभय ललवाणी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

शहर व परिसरात बांधकामाच्या टाकाऊ साहित्य रस्त्याच्या बाजूला पडलेले आहे. जुने बांधकाम पाडून नवीन बांधकामे सुरू आहेत. जुने बांधकाम पाडल्यानंतर टाकाऊ साहित्य सर्रास रस्त्यावर टाकले जात आहे. याकडे शहरातील हरिभूमी प्रतिष्ठानने महापौरांचे लक्ष वेधले आहे. याबाबत प्रतिष्ठानच्या वतीने महापौर बाबासाहेब वाकळे यांना निवेदन देण्यात आले आहे. बांधकामाचे टाकाऊ साहित्य सर्रास रस्त्याच्या बाजूला, ओढ्यात, नदीपात्रात टाकण्यात येत आहे. त्यामुळे शहर विद्रूप झाले असून, या साहित्याचे योग्य व्यवस्थापन करावे. हे साहित्य संकलित करून विलगीकरण करावे. जेणे करून हे साहित्य रस्त्यावर पडणार नाही. सध्या स्वच्छ सर्वेक्षण सुरू असल्याने टाकाऊ साहित्याबाबत धोरण निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.