शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

साडेतीन कोटींचा पी.एफ. थकविला : नगर तालुका बाजार समिती

By मिलिंदकुमार साळवे | Updated: January 22, 2019 13:10 IST

अहमदनगर कृषी उत्पन बाजार समितीने २००९-१० पासून जवळपास दहा वर्षांचा कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी थकविल्याची बाब उघडकीस आली आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : अहमदनगर कृषी उत्पन बाजार समितीने २००९-१० पासून जवळपास दहा वर्षांचा कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी थकविल्याची बाब उघडकीस आली आहे.बाजार समितीच्या आर्थिक व्यवहार व भविष्य निर्वाह निधीबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी सहकारी संस्थांचे विशेष लेखापरीक्षक वर्ग-२ (फिरते पथक) एस. डी. कुलकर्णी यांना बाजार समितीने कर्मचाºयांच्या वेतनातून कपात केलेल्या भविष्य निर्वाह निधीच्या रकमेबाबतच्या मुद्याची फेरचौकशी करण्यासाठी प्राधिकृत केले होते. कुलकर्णी यांनी याबाबत चौकशी करून आपला अहवाल जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सादर केला आहे.समिती कर्मचाºयांच्या वेतनातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत बचत खाते उघडून त्या खात्यात भरणा करीत आहे. पण ही कपात केलेली रक्कम वेळच्या वेळी भरणा केलेली नाही. सन २००९-१० पासूनची कपात केलेली रक्कम भरणा करणे बाकी आहे. तसेच बाजार समितीच्या हिश्याची रक्कम सन २००३-२००४ पासून तरतूद करून ती देणे दर्शविलेली आहे. ती देखील भरणा करणे बाकी आहे.अहवालातील निष्कर्षअहमदनगर बाजार समितीने कर्मचाºयांच्या पगारातून कपात केलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम तसेच बाजार समितीच्या हिश्याची रक्कम भरणा करणे बाकी आहे. समितीने तिच्या आर्थिक अडचणीमुळे रक्कम थकीत असल्याचे मान्य केलेले आहे. भविष्य निर्वाह निधीच्या व्यवहारात अपहार, अफरातफर,गैरविनियोग झाल्याचे दिसून येत नाही, असा निष्कर्ष विशेष अहवालात नोंदविण्यात आला आहे. तसेच थकीत असलेली रक्कम भरणा करण्याबाबत बाजार समितीस निर्देश देणे आवश्यक राहील,अशी शिफारसही कुलकर्णी यांनी केली आहे.दादा पाटील शेळकेंचा प्रतिसाद नाहीमाजी खासदार दादा पाटील शेळके व इतरांनी याबाबत तक्रार केली होती. तसेच ३ आॅक्टोबर २०१८ रोजी ठिय्या आंदोलन केले होते. तक्रारीबाबत म्हणणे मांडण्यासाठी चौकशी अधिका-यांनी शेळकेंना पत्र पाठविले होते. पण त्यांनी चौकशीस प्रतिसाद दिला नाही.३१ मार्च २०१८ अखेर कर्मचा-यांच्या वेतनातून कपात केलेली रक्कम१ कोटी २० लाख ४६ हजार १७९ रूपयेतसेच बाजार समितीचा भविष्य निर्वाह निधीचा हिस्सा२ कोटी ३० लाख ५८ हजार ११४ रूपयेभरणा करणे बाकी असल्याचे अहवालातून निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर