शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

नगर तालुक्यात पीक विम्याचा टक्का घसरला

By admin | Updated: June 2, 2016 23:09 IST

अहमदनगर : सन २०१५ या खरीप हंगामासाठी नगर तालुक्यातील ८ हजार ३४४ शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी ६ कोटी ७८ लाख ५९ हजार रुपये मंजूर झाले आहेत.

अहमदनगर : सन २०१५ या खरीप हंगामासाठी नगर तालुक्यातील ८ हजार ३४४ शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी ६ कोटी ७८ लाख ५९ हजार रुपये मंजूर झाले आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत नगर तालुक्याला कमी पीक विमा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. दुष्काळाशी गेल्या चार वर्षांपासून झुंजणाऱ्या नगर तालुक्याला यंदा कमी पीक विमा मिळाला आहे.गेल्या चार वर्षांपासून पावसाअभावी नगर तालुक्यात खरीप पिकांचा हंगाम कोरडा गेला. यामुळे शेतकरी हवालदिल होते. यापूर्वी माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या विशेष प्रयत्नाने नगर तालुक्याला जिल्ह्यात सर्वाधिक पीक विमा मिळत होता.त्यामुळे दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा मोठा आधार वाटत होता. शेळके यांच्यासारखे प्रयत्न व पाठपुरावा कमी झाल्याने जिल्ह्याच्या इतर तालुक्यांच्या तुलनेत नगर तालुक्याच्या वाट्याला कमी विमा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. तालुक्यात सर्वाधिक पीक विमा चास मंडलातील १ हजार ८०५ शेतकऱ्यांना २ कोटी ३० लाख ५७ हजार इतका मिळाला. त्या खालोखाल भिंगार मंडलातील १ हजार ५६५ शेतकऱ्यांना १ कोटी ७ लाख १५ हजार, रुईछत्तीसी मंडलातील १ हजार २४१ शेतकऱ्यांना १ कोटी ३ लाख ६६ हजार, केडगाव मंडलातील ७५ शेतकऱ्यांना ७० लाख ६४ हजार, वाळकी मंडलात ६५२ लाभार्थ्यांना ४७ लाख ४७ हजार, चिचोंडी पाटील मंडलातील ७११ शेतकऱ्यांना ४५ लाख १६ हजार, नागापूर मंडलात ७५१ लाभार्थ्यांना ३५ लाख १९ हजार, जेऊर मंडलात ३६६ शेतकऱ्यांना १३ लाख ३८ हजार, कापूरवाडी मंडलात ३८० शेतकऱ्यांना १३ लाख ८ हजार, नालेगाव मंडलातील ७५ शेतकऱ्यांना ३ लाख ४३ हजार रुपये पीक विमा मंजूर झाला आहे.(प्रतिनिधी)