शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यात पीक विम्याचा टक्का घसरला

By admin | Updated: June 2, 2016 23:09 IST

अहमदनगर : सन २०१५ या खरीप हंगामासाठी नगर तालुक्यातील ८ हजार ३४४ शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी ६ कोटी ७८ लाख ५९ हजार रुपये मंजूर झाले आहेत.

अहमदनगर : सन २०१५ या खरीप हंगामासाठी नगर तालुक्यातील ८ हजार ३४४ शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी ६ कोटी ७८ लाख ५९ हजार रुपये मंजूर झाले आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत नगर तालुक्याला कमी पीक विमा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. दुष्काळाशी गेल्या चार वर्षांपासून झुंजणाऱ्या नगर तालुक्याला यंदा कमी पीक विमा मिळाला आहे.गेल्या चार वर्षांपासून पावसाअभावी नगर तालुक्यात खरीप पिकांचा हंगाम कोरडा गेला. यामुळे शेतकरी हवालदिल होते. यापूर्वी माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या विशेष प्रयत्नाने नगर तालुक्याला जिल्ह्यात सर्वाधिक पीक विमा मिळत होता.त्यामुळे दुष्काळात होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा मोठा आधार वाटत होता. शेळके यांच्यासारखे प्रयत्न व पाठपुरावा कमी झाल्याने जिल्ह्याच्या इतर तालुक्यांच्या तुलनेत नगर तालुक्याच्या वाट्याला कमी विमा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. तालुक्यात सर्वाधिक पीक विमा चास मंडलातील १ हजार ८०५ शेतकऱ्यांना २ कोटी ३० लाख ५७ हजार इतका मिळाला. त्या खालोखाल भिंगार मंडलातील १ हजार ५६५ शेतकऱ्यांना १ कोटी ७ लाख १५ हजार, रुईछत्तीसी मंडलातील १ हजार २४१ शेतकऱ्यांना १ कोटी ३ लाख ६६ हजार, केडगाव मंडलातील ७५ शेतकऱ्यांना ७० लाख ६४ हजार, वाळकी मंडलात ६५२ लाभार्थ्यांना ४७ लाख ४७ हजार, चिचोंडी पाटील मंडलातील ७११ शेतकऱ्यांना ४५ लाख १६ हजार, नागापूर मंडलात ७५१ लाभार्थ्यांना ३५ लाख १९ हजार, जेऊर मंडलात ३६६ शेतकऱ्यांना १३ लाख ३८ हजार, कापूरवाडी मंडलात ३८० शेतकऱ्यांना १३ लाख ८ हजार, नालेगाव मंडलातील ७५ शेतकऱ्यांना ३ लाख ४३ हजार रुपये पीक विमा मंजूर झाला आहे.(प्रतिनिधी)