शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

शेतकऱ्यांचा मोर्चा ही सरकारला चपराक

By admin | Updated: June 27, 2016 00:56 IST

शिर्डी : कृषी कर्ज, बियाणे व अनेक शेतीविषयक समस्यांसाठी भाजपसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात काढलेला मोर्चा

शिर्डी : कृषी कर्ज, बियाणे व अनेक शेतीविषयक समस्यांसाठी भाजपसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात काढलेला मोर्चा ही सरकारच्या दाव्यांवर सणसणीत चपराक असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली़ किमान आतातरी सरकारने आत्मपरीक्षण करून कारभारात सुधारणा करावी, असा सल्लाही त्यांनी दिला़यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे भाजप आमदार राजेंद्र नजरधने यांच्या महागाव येथील कार्यालयावर रविवारी निघालेल्या मोर्चासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे म्हणाले की, कृषी कर्ज आणि बियाणे मिळत नसल्याच्या मागणीसह इतरही अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महागाव येथे शेतकऱ्यांनी भाजप आमदाराच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यात शेतकरीच नाही तर इतर राजकीय पक्षांसह भाजपाचे कार्यकर्तेही सहभागी झाले. या मोर्चातील भाजपचा सहभाग हा भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारसाठी घरचा आहेर आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचे विरोधी पक्ष, माध्यमे आणि शेतकरी वारंवार सांगत आहेत. मात्र, सरकार सर्वांना खोटे ठरवून आपलीच पाठ थोपटून घेत होते. आता या मोर्चाने सरकारच्या अपयशावर शिक्कामोर्तब झाले आहे़ या मोर्चावर झालेल्या लाठीमाराचा विखे यांनी तीव्र शब्दात निषेध करत चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी केली़ कर्जमाफी, कृषी कर्ज, बियाणे देवू शकत नसाल तर लाठीमार तरी करू नका, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची हौस नाही, त्यांच्यात असंतोष आहे, याची सरकारने वेळीच दखल घ्यावी, असा इशाराही विखेंनी दिला़पुण्यासाठी अजून एका पैशाची तरतूद झालेली नसताना उद्घाटन व जाहिरातबाजीसाठी साडेतीन कोटी रूपये उधळणे संतापजनक आहे. पंतप्रधानांकडे स्मार्ट सिटीसाठी पुण्याचा दौरा करायला वेळ आहे; मात्र दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यासाठी वेळ नाही, हे दुर्दैव आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी दुष्काळाबाबत चकार शब्द काढला नाही. याचाच अर्थ त्यांना शेतकऱ्यांबाबत अजिबात आस्था नाही़ सर्वसामान्य जनता व विरोधकांची मुस्कटदाबी करुन हे सरकार फार काळ चालू शकणार नाही. जलयुक्त शिवार आणि स्मार्ट सिटी व्यतिरिक्त सरकारकडे दुसरा कोणताही कार्यक्रम नाही. स्मार्ट सिटी योजना म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक असून बिल्डरांचे वर्चस्व निर्माण करण्याचाच सरकारचा हेतू असल्याची टीका त्यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)