शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा मोर्चा ही सरकारला चपराक

By admin | Updated: June 27, 2016 00:56 IST

शिर्डी : कृषी कर्ज, बियाणे व अनेक शेतीविषयक समस्यांसाठी भाजपसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात काढलेला मोर्चा

शिर्डी : कृषी कर्ज, बियाणे व अनेक शेतीविषयक समस्यांसाठी भाजपसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात काढलेला मोर्चा ही सरकारच्या दाव्यांवर सणसणीत चपराक असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली़ किमान आतातरी सरकारने आत्मपरीक्षण करून कारभारात सुधारणा करावी, असा सल्लाही त्यांनी दिला़यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडचे भाजप आमदार राजेंद्र नजरधने यांच्या महागाव येथील कार्यालयावर रविवारी निघालेल्या मोर्चासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे म्हणाले की, कृषी कर्ज आणि बियाणे मिळत नसल्याच्या मागणीसह इतरही अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महागाव येथे शेतकऱ्यांनी भाजप आमदाराच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यात शेतकरीच नाही तर इतर राजकीय पक्षांसह भाजपाचे कार्यकर्तेही सहभागी झाले. या मोर्चातील भाजपचा सहभाग हा भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र व राज्य सरकारसाठी घरचा आहेर आहे. शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचे विरोधी पक्ष, माध्यमे आणि शेतकरी वारंवार सांगत आहेत. मात्र, सरकार सर्वांना खोटे ठरवून आपलीच पाठ थोपटून घेत होते. आता या मोर्चाने सरकारच्या अपयशावर शिक्कामोर्तब झाले आहे़ या मोर्चावर झालेल्या लाठीमाराचा विखे यांनी तीव्र शब्दात निषेध करत चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी केली़ कर्जमाफी, कृषी कर्ज, बियाणे देवू शकत नसाल तर लाठीमार तरी करू नका, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची हौस नाही, त्यांच्यात असंतोष आहे, याची सरकारने वेळीच दखल घ्यावी, असा इशाराही विखेंनी दिला़पुण्यासाठी अजून एका पैशाची तरतूद झालेली नसताना उद्घाटन व जाहिरातबाजीसाठी साडेतीन कोटी रूपये उधळणे संतापजनक आहे. पंतप्रधानांकडे स्मार्ट सिटीसाठी पुण्याचा दौरा करायला वेळ आहे; मात्र दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौऱ्यासाठी वेळ नाही, हे दुर्दैव आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी दुष्काळाबाबत चकार शब्द काढला नाही. याचाच अर्थ त्यांना शेतकऱ्यांबाबत अजिबात आस्था नाही़ सर्वसामान्य जनता व विरोधकांची मुस्कटदाबी करुन हे सरकार फार काळ चालू शकणार नाही. जलयुक्त शिवार आणि स्मार्ट सिटी व्यतिरिक्त सरकारकडे दुसरा कोणताही कार्यक्रम नाही. स्मार्ट सिटी योजना म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक असून बिल्डरांचे वर्चस्व निर्माण करण्याचाच सरकारचा हेतू असल्याची टीका त्यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)