शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

पाचपुते प्रकरणाकडे पवारांचा कानाडोळा

By admin | Updated: August 9, 2014 23:32 IST

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत असलेली घुसमट, यामुळे नाराज झालेले माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे निश्चित केले.

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होत असलेली घुसमट, यामुळे नाराज झालेले माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे निश्चित केले. त्यावर जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी त्यांची समजूत काढत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कोर्टात हा विषय काढण्याचे आश्वासन दिले. शनिवारच्या पुणे भेटीत खुद्द पवार यांनीच अभंग यांना या विषयांवर नंतर बोलू’ असे सांगत पाचपुते प्रकरणाकडे सपशेल कानाडोळा केला. पाचपुते आता काय भूमिका घेतात याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभवानंतर दक्षिण जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले. पक्ष विरोधी कारवाया केल्याच्या संशयावरून पक्षातून आ. पाचपुते यांची कोंडी करण्यात आली असल्याची चर्चा आहे. यावरून नाराज झालेले पाचपुते थेट पक्ष सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांना याची मानसिकता तयार करून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, पाचपुते यांच्या संभाव्य बंडाबाबत पक्षातून एकाही नेत्याने जाहीरपणे दखल घेतलेली नाही. पक्षीय पातळीवर असणाऱ्या शांततेमुळे पाचपुते सध्यातरी एकाकी पडल्याचे चित्र आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सर्वच विरोधकांकडून पाचपुते यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात येत असून ते पक्षाला इमोशनल ब्लॅकमेल करीत आहेत. त्यांचा नाराजीनामा हा त्यांचा नौटंकीपणा आहे. साईकृपा कारखान्याला कर्ज दिले नसल्याच्या नावाखाली सत्तेची खुर्ची टिकविण्यासाठी त्यांची धडपड आहे. बारामतीसारखा विकास करण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या पाचपुते यांनी घोषणांचा पाऊस पाडला. विकासाऐवजी तालुका भकास केल्याचा आरोप जनसेवा विकास मंडळाचे अध्यक्ष घनशाम शेलार यांंनी केला आहे. नाराजीनाम्यानंतरही पक्षाकडून दखल घेतली गेली नसल्याने पाचपुते शांत आहेत. त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही यामुळे पक्षासह पाचपुते यांनीही आपले पत्ते बंद ठेवले आहेत. (प्रतिनिधी)पुण्यात शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात आपण आ. बबनराव पाचपुते प्रकरण त्यांच्या कानावर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी पवार यांनी या विषयांवर १५ तारखेनंतर सविस्तर चर्चा करू असे स्पष्टपणे सांगितले. -पांडुरंग अभंग, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस