शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

ही वाळवंटीकरणाच्या दिशेने वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST

अहमदनगर : देशासमोरील भविष्यकालीन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी भूजल व्यवस्थापन व पीक नियोजनाची अत्यंत गरज आहे. आज देशातील १५ राज्यांत ...

अहमदनगर : देशासमोरील भविष्यकालीन पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी भूजल व्यवस्थापन व पीक नियोजनाची अत्यंत गरज आहे. आज देशातील १५ राज्यांत भीषण पाणीटंचाई असून ५२ टक्के भूभाग हा अवर्षणप्रवण क्षेत्रात आहे. विहिरीद्वारे होणारे सिंचन हे वरच्या भूस्तरातून होते. आपण आता खोलवरच्या भूस्तरातून बोअरवेलद्वारे पाणी उपसा करत असून परिणामी दरवर्षी ३० ते ४० हजार बोअरवेल कोरड्या पडत आहेत. ही भविष्यकालीन वाळवंटीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, अशा शब्दांत राज्य आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी भविष्यकालीन संकटाबाबत देशभरातील खासदारांना सूचित केले.

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या ऑनलाइन कार्यशाळेत पवार यांनी शुक्रवारी (दि. २२) देशातील खासदारांना मार्गदर्शन केले. पवार म्हणाले, सर्वात सुपीक भूभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबच्या मातीने भारताची भूक भागविली. तेथेसुद्धा ३०० ते ४०० फूट खोल गेल्याशिवाय पाणी मिळत नाही. त्याचबरोबर राजस्थान, गुजरात, तेलंगणा, तामिळनाडू, ओरिसा या भागातसुद्धा तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे भविष्यकाळात देशासमोर पाणीटंचाईचे सर्वात मोठे आव्हान येत आहे. हिवरे बाजारच्या प्रयोगातून भूजल व्यवस्थापन व पीक नियोजनातून हिरवेगार, पाणीदार, निर्व्यसनी गाव निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. समृद्धीच्या मागे चंगळवाद व व्यसनाधीनता येऊ नये यासाठी तरुणाईला संस्कारक्षम बनविण्याची विशेष गरज आहे. अन्यथा व्यसनाधीन कुटुंब व व्यसनाधीन गावे राष्ट्रासमोर सर्वात मोठे आव्हान असेल.

...................

खासगीकरणातून विषमता निर्माण होईल

आर्थिक क्षमता नसलेल्या घटकांसाठी सरकारी व्यवस्था आहे. परंतु ती व्यवस्था सक्षम करण्याची गरज आहे. अन्यथा खासगीकरणातून नवी विषमता निर्माण होईल, असा सावधगिरीचा सल्ला देत महाराष्ट्रीतील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त अभियान, पाणी फाउंडेशनमार्फत होणारी कामे, जलयुक्त शिवार योजनेतून होणारी कामे, रोजगार हमी योजनेतून होणारी कामे याविषयी पवार यांनी खासदारांना मार्गदर्शन केले.