शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

जिथे इच्छा तिथे मार्ग आपोआप दिसतो-काजल देशमुख; आयईएस परीक्षेत देशात मुलींमध्ये प्रथम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:55 IST

नेवासा शहरातील काजल दीपक देशमुख हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरींग सर्व्हिसेस (आयईएस) परीक्षेत मॅकेनिकल इंजिनिअरिंग परीक्षेत भारतात ८७ जणांची निवड झाली. त्यामध्ये काजल ही  एकमेव. तिने मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळविले आहे. यानिमित्ताने तिच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद.

संडे मुलाखत / सुहास पठाडे नेवासा : सरकारी नोकरी मिळवणे हे एकमेव उद्दिष्ट होते. त्यातच आई-वडिलांनी शिक्षणासाठी दिलेली साथ व मैत्रिणीच्या मार्गदर्शनाच्या जोरावर नेवासा शहरातील काजल दीपक देशमुख हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरींग सर्व्हिसेस (आयईएस) परीक्षेत मॅकेनिकल इंजिनिअरिंग परीक्षेत भारतात ८७ जणांची निवड झाली. त्यामध्ये काजल ही  एकमेव. तिने मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळविले आहे. यानिमित्ताने तिच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद.प्रश्न : तुला प्रेरणा कोणाचीकाजल :वडील दीपक देशमुख हे निवृत्त सैन्य दलातील सैनिक आहेत. आई शोभाताई गृहिणी आहेत. दोन बहिणी व एक भाऊ आहे. वडिलांनी आम्हाला उच्च शिक्षित बनविण्यासाठी मोठे कष्ट घेतले. त्यांचे कष्ट हीच माझी खरी प्रेरणा आहे.प्रश्न : शालेय शिक्षण कुठे झाले?काजल : प्राथमिक शिक्षण नेवासा शहरातील प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण सुंदरबाई कन्या विद्यालय येथे झाले. दहावीत ९५ टक्के गुण मिळवत तालुक्यात पहिली आले. नगर येथील रेसिडेंशीअल स्कूलमध्ये १२ वी परिक्षेत ९० टक्के गुण व सीईटी परीक्षेत १७८ गुण मिळवले. पुणे येथे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग या शासकीय महाविद्यालयात इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर दोन वर्षे वाराणसी येथील आदित्य बिर्ला ग्रुपच्या हिंदलको कंपनीत नोकरी केली. कंपनीत केलेल्या उकृष्ठ कामाबद्दल  ‘एम इंजिनिअर’ हा पुरस्कार मिळाला.प्रश्न : आयईएस परीक्षेकडे कशी वळाली?काजल : सरकारी नोकरीच करायची अशी पहिल्यापासून मनाशी खूणगाठ बांधली होती. आई.इ.एस. परीक्षा देण्यासाठी मैत्रिणीने केलेल्या आग्रहामुळे नोकरीचा राजीनामा देत पुन्हा पुणे गाठले. तेथे आल्यानंतर जेट आणि आईएसचे कोचिंग सुरू केले. वाराणसी येथील कंपनीतील वरिष्ठ मनोज शर्मा व डोंगरगण येथील मैत्रीण प्राची भूतकर हिने मार्गदर्शन केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाची (इंजिनिअर सर्व्हिसेस) जानेवारी महिन्यात प्राथमिक परीक्षा दिली. नंतर अभ्यासासाठी दिल्ली येथे राहणे पसंत केले. जून महिन्यात मुख्य परीक्षेत यश मिळविले. सप्टेंबर महिन्यात मुलाखत झाली. आॅक्टोबरमध्ये  निकाल लागला आणि मुलींमध्ये देशात पहिला येण्याचा मान मिळाला.रेल्वे आवडते क्षेत्ररेल्वे हे माझे आवडते क्षेत्र आहे. तेथे नोकरीच्या संधी मोठ्या आहेत. या परिक्षेमुळे रेल्वेमध्ये काम करण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद आहे. मला मैत्रिणींचा सल्ला मोलाचा ठरला. वडील आर्मीत असल्याने पहिल्यापासून आईवरच आमच्या शिक्षणाची जबाबदारी होती. आईने शिक्षणाच्या बाबतीत सर्व भावंडांकडे लक्ष दिले. इच्छा आणि मेहनत याचा संगम झाला, असे काजल सांगते.आईलाही अभिमानग्रामीण भागात राहत असताना मुलीने यश संपादन केल्याचा आईलाही खूप अभिमान वाटत आहे. मुला-मुलीत भेदभाव न करता ग्रामीण भागातील पालकांनी मुलींनाही उच्च शिक्षण देणे गरजेचे आहे. कुटुंबाबरोबरच नेवाशाचे ही नाव मोठे केले असल्याचा आईला अभिमान वाटत आहे, असे काजल म्हणाली.

‘‘आईने शिक्षणाच्या बाबतीत सर्व भावंडांकडे लक्ष दिल्यानेच हे यश संपादन करू शकले. जिथे इच्छा तिथे मार्ग दिसतो. मी जसे यश संपादन केले, तसे दुसरी कुठलीही मुलगी यश संपादन करू शकते.’’-  काजल देशमुख. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMPSC examएमपीएससी परीक्षा