शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जिथे इच्छा तिथे मार्ग आपोआप दिसतो-काजल देशमुख; आयईएस परीक्षेत देशात मुलींमध्ये प्रथम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 12:55 IST

नेवासा शहरातील काजल दीपक देशमुख हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरींग सर्व्हिसेस (आयईएस) परीक्षेत मॅकेनिकल इंजिनिअरिंग परीक्षेत भारतात ८७ जणांची निवड झाली. त्यामध्ये काजल ही  एकमेव. तिने मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळविले आहे. यानिमित्ताने तिच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद.

संडे मुलाखत / सुहास पठाडे नेवासा : सरकारी नोकरी मिळवणे हे एकमेव उद्दिष्ट होते. त्यातच आई-वडिलांनी शिक्षणासाठी दिलेली साथ व मैत्रिणीच्या मार्गदर्शनाच्या जोरावर नेवासा शहरातील काजल दीपक देशमुख हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरींग सर्व्हिसेस (आयईएस) परीक्षेत मॅकेनिकल इंजिनिअरिंग परीक्षेत भारतात ८७ जणांची निवड झाली. त्यामध्ये काजल ही  एकमेव. तिने मुलींमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळविले आहे. यानिमित्ताने तिच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद.प्रश्न : तुला प्रेरणा कोणाचीकाजल :वडील दीपक देशमुख हे निवृत्त सैन्य दलातील सैनिक आहेत. आई शोभाताई गृहिणी आहेत. दोन बहिणी व एक भाऊ आहे. वडिलांनी आम्हाला उच्च शिक्षित बनविण्यासाठी मोठे कष्ट घेतले. त्यांचे कष्ट हीच माझी खरी प्रेरणा आहे.प्रश्न : शालेय शिक्षण कुठे झाले?काजल : प्राथमिक शिक्षण नेवासा शहरातील प्राथमिक शाळेत तर माध्यमिक शिक्षण सुंदरबाई कन्या विद्यालय येथे झाले. दहावीत ९५ टक्के गुण मिळवत तालुक्यात पहिली आले. नगर येथील रेसिडेंशीअल स्कूलमध्ये १२ वी परिक्षेत ९० टक्के गुण व सीईटी परीक्षेत १७८ गुण मिळवले. पुणे येथे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग या शासकीय महाविद्यालयात इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर दोन वर्षे वाराणसी येथील आदित्य बिर्ला ग्रुपच्या हिंदलको कंपनीत नोकरी केली. कंपनीत केलेल्या उकृष्ठ कामाबद्दल  ‘एम इंजिनिअर’ हा पुरस्कार मिळाला.प्रश्न : आयईएस परीक्षेकडे कशी वळाली?काजल : सरकारी नोकरीच करायची अशी पहिल्यापासून मनाशी खूणगाठ बांधली होती. आई.इ.एस. परीक्षा देण्यासाठी मैत्रिणीने केलेल्या आग्रहामुळे नोकरीचा राजीनामा देत पुन्हा पुणे गाठले. तेथे आल्यानंतर जेट आणि आईएसचे कोचिंग सुरू केले. वाराणसी येथील कंपनीतील वरिष्ठ मनोज शर्मा व डोंगरगण येथील मैत्रीण प्राची भूतकर हिने मार्गदर्शन केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाची (इंजिनिअर सर्व्हिसेस) जानेवारी महिन्यात प्राथमिक परीक्षा दिली. नंतर अभ्यासासाठी दिल्ली येथे राहणे पसंत केले. जून महिन्यात मुख्य परीक्षेत यश मिळविले. सप्टेंबर महिन्यात मुलाखत झाली. आॅक्टोबरमध्ये  निकाल लागला आणि मुलींमध्ये देशात पहिला येण्याचा मान मिळाला.रेल्वे आवडते क्षेत्ररेल्वे हे माझे आवडते क्षेत्र आहे. तेथे नोकरीच्या संधी मोठ्या आहेत. या परिक्षेमुळे रेल्वेमध्ये काम करण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद आहे. मला मैत्रिणींचा सल्ला मोलाचा ठरला. वडील आर्मीत असल्याने पहिल्यापासून आईवरच आमच्या शिक्षणाची जबाबदारी होती. आईने शिक्षणाच्या बाबतीत सर्व भावंडांकडे लक्ष दिले. इच्छा आणि मेहनत याचा संगम झाला, असे काजल सांगते.आईलाही अभिमानग्रामीण भागात राहत असताना मुलीने यश संपादन केल्याचा आईलाही खूप अभिमान वाटत आहे. मुला-मुलीत भेदभाव न करता ग्रामीण भागातील पालकांनी मुलींनाही उच्च शिक्षण देणे गरजेचे आहे. कुटुंबाबरोबरच नेवाशाचे ही नाव मोठे केले असल्याचा आईला अभिमान वाटत आहे, असे काजल म्हणाली.

‘‘आईने शिक्षणाच्या बाबतीत सर्व भावंडांकडे लक्ष दिल्यानेच हे यश संपादन करू शकले. जिथे इच्छा तिथे मार्ग दिसतो. मी जसे यश संपादन केले, तसे दुसरी कुठलीही मुलगी यश संपादन करू शकते.’’-  काजल देशमुख. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMPSC examएमपीएससी परीक्षा