शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
3
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
4
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
5
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
6
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
8
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
9
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
10
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
11
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
12
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
13
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
14
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
15
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
16
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
17
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
18
Dashavatar: 'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
19
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
20
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

प्रवाशांआधीच विक्रेते एसटीत

By admin | Updated: May 24, 2016 23:47 IST

चंद्रकांत शेळके, अहमदनगर आरोळ्या देत प्रवाशांच्या आधी थेट एसटी प्रवेश करून खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बसस्थानकांत घुसखोरी केल्याचे सर्रास चित्र सर्वच बसस्थानकांत दिसते.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर‘थंडगार पाणीबॉटल, आईस्क्रिम, गरमागरम वडे, चाय, चने-फुटाणे’, अशा आरोळ्या देत प्रवाशांच्या आधी थेट एसटी प्रवेश करून खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बसस्थानकांत घुसखोरी केल्याचे सर्रास चित्र सर्वच बसस्थानकांत दिसते. ‘लोकमत’ने मंगळवारी स्टिंग आॅपरेशन करून यावर प्रकाश टाकला. कोणत्याही विक्रेत्याला थेट एसटीत किंवा एसटीजवळ जाऊन खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी नसताना या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले.एसटी प्रशासनाने ज्या काही स्टॉलधारकांना खाद्यपदार्थ विकण्यासाठी परवाने दिले आहेत, त्यांनी प्लॅटफॉर्म सोडून किंवा एसटीत प्रवेश करून खाद्यपदार्थ विकू नयेत असे आदेश एसटीच्या महाव्यवस्थापकांनी दिलेले आहेत. चालक व वाहकांनी फेरीवाल्यांना बसमध्ये चढण्यास मज्जाव करावा, तसेच असे प्रकार आढळल्यास विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना आगार व्यवस्थापकांना दिल्या असल्या तरी त्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे आढळले. तारकपूर बसस्थानकात पाहणी केली असता फेरीवाले बिनधास्तपणे एसटीत प्रवेश करत होते. एवढेच नव्हे तर प्रवाशांना एसटीत चढ-उतार करण्यास याच विक्रेत्यांमुळे अडथळा होत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. कोणत्याही बसने स्थानकात प्रवेश केला की ही फेरीवाल्यांची झुंड एसटीवर जणू तुटून पडत होती. काहीजण खिडकीतून, तर काहीजण थेट एसटीत चढून प्रवाशांना खाद्यपदार्थ विकत घेण्यास आग्रह करत होते. जोपर्यंत प्रवासी ‘नाही’ म्हणून मान डोलवत नाही, तोपर्यंत कर्णकर्कश आवाजात त्याच्या कानात फेरीवाले ओरडत असल्याचे चित्र होते. बसमध्ये सर्वात आधी प्रवेश करून, चढ-उतार करणाऱ्या प्रवाशांना न जुमानता हे फेरीवाले जोपर्यंत बस निघत नाही तोपर्यंत गोंगाट करत असल्याचे आढळून आले. मुद्दामहून लहान मुलांच्या समोर आईस्क्रिम किंवा खाद्यपदार्थ घेऊन घुटमळणे, कपात चहा ओतून थेट प्रवाशांच्या तोंडापर्यंत नेणे, एखादी थंड पाण्याची बाटली खिडकीतून प्रवाशाच्या दिशेने सोडणे असे प्रकार पहायला मिळाले. मळकटलेले कपडे, दिवसभर धुळीत माखलेले तेलकट खाद्यपदार्थ अशा अस्वच्छतेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान त्रास होऊ शकतो, याचे भानही त्यांना नसते. मुळात ज्या स्टॉलधारकाला खाद्यपदार्थ विकण्याचे परवाने आहेत, त्यांनीच ते विकावे, बसस्थानकात दिवसभर धूळ असल्याने खाद्यपदार्थ उघड्यावर विकू नये, शिळे अन्नपदार्थ दुकानात ठेवू नये, असे आदेश असतानाही हेच स्टॉलधारक या फेरीवाल्यांना कमिशनवर खाद्यपदार्थ विक्रीसाठी नियुक्त करतात. त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.