शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

प्रवाशांआधीच विक्रेते एसटीत

By admin | Updated: May 24, 2016 23:47 IST

चंद्रकांत शेळके, अहमदनगर आरोळ्या देत प्रवाशांच्या आधी थेट एसटी प्रवेश करून खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बसस्थानकांत घुसखोरी केल्याचे सर्रास चित्र सर्वच बसस्थानकांत दिसते.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर‘थंडगार पाणीबॉटल, आईस्क्रिम, गरमागरम वडे, चाय, चने-फुटाणे’, अशा आरोळ्या देत प्रवाशांच्या आधी थेट एसटी प्रवेश करून खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बसस्थानकांत घुसखोरी केल्याचे सर्रास चित्र सर्वच बसस्थानकांत दिसते. ‘लोकमत’ने मंगळवारी स्टिंग आॅपरेशन करून यावर प्रकाश टाकला. कोणत्याही विक्रेत्याला थेट एसटीत किंवा एसटीजवळ जाऊन खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी नसताना या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे समोर आले.एसटी प्रशासनाने ज्या काही स्टॉलधारकांना खाद्यपदार्थ विकण्यासाठी परवाने दिले आहेत, त्यांनी प्लॅटफॉर्म सोडून किंवा एसटीत प्रवेश करून खाद्यपदार्थ विकू नयेत असे आदेश एसटीच्या महाव्यवस्थापकांनी दिलेले आहेत. चालक व वाहकांनी फेरीवाल्यांना बसमध्ये चढण्यास मज्जाव करावा, तसेच असे प्रकार आढळल्यास विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अशा सूचना आगार व्यवस्थापकांना दिल्या असल्या तरी त्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे आढळले. तारकपूर बसस्थानकात पाहणी केली असता फेरीवाले बिनधास्तपणे एसटीत प्रवेश करत होते. एवढेच नव्हे तर प्रवाशांना एसटीत चढ-उतार करण्यास याच विक्रेत्यांमुळे अडथळा होत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. कोणत्याही बसने स्थानकात प्रवेश केला की ही फेरीवाल्यांची झुंड एसटीवर जणू तुटून पडत होती. काहीजण खिडकीतून, तर काहीजण थेट एसटीत चढून प्रवाशांना खाद्यपदार्थ विकत घेण्यास आग्रह करत होते. जोपर्यंत प्रवासी ‘नाही’ म्हणून मान डोलवत नाही, तोपर्यंत कर्णकर्कश आवाजात त्याच्या कानात फेरीवाले ओरडत असल्याचे चित्र होते. बसमध्ये सर्वात आधी प्रवेश करून, चढ-उतार करणाऱ्या प्रवाशांना न जुमानता हे फेरीवाले जोपर्यंत बस निघत नाही तोपर्यंत गोंगाट करत असल्याचे आढळून आले. मुद्दामहून लहान मुलांच्या समोर आईस्क्रिम किंवा खाद्यपदार्थ घेऊन घुटमळणे, कपात चहा ओतून थेट प्रवाशांच्या तोंडापर्यंत नेणे, एखादी थंड पाण्याची बाटली खिडकीतून प्रवाशाच्या दिशेने सोडणे असे प्रकार पहायला मिळाले. मळकटलेले कपडे, दिवसभर धुळीत माखलेले तेलकट खाद्यपदार्थ अशा अस्वच्छतेमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान त्रास होऊ शकतो, याचे भानही त्यांना नसते. मुळात ज्या स्टॉलधारकाला खाद्यपदार्थ विकण्याचे परवाने आहेत, त्यांनीच ते विकावे, बसस्थानकात दिवसभर धूळ असल्याने खाद्यपदार्थ उघड्यावर विकू नये, शिळे अन्नपदार्थ दुकानात ठेवू नये, असे आदेश असतानाही हेच स्टॉलधारक या फेरीवाल्यांना कमिशनवर खाद्यपदार्थ विक्रीसाठी नियुक्त करतात. त्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.